शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
2
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
3
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

कळमनुरी तालुक्यात बोंडअळीच्या नुकसानीचे पंचनामे सादर न करणार्‍या कर्मचार्‍यांना नोटिसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2018 18:13 IST

कापूस पिकावरील बोंडअळीसह धान पिकावरील तुडतुडे रोगाच्या प्रादुर्भावामुळे नुकसान झालेल्या पिकांचे सर्वेक्षण अहवाल तहसील कार्यालयात सादर न केलेल्या कळमनुरी तालुक्यातील २५ तलाठी सज्जांमधील १०५ तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवकांना नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती तहसीलदार डॉ. प्रतिभा गोरे यांनी दिली.

कळमनुरी (हिंगोली ) : कापूस पिकावरील बोंडअळीसह धान पिकावरील तुडतुडे रोगाच्या प्रादुर्भावामुळे नुकसान झालेल्या पिकांचे सर्वेक्षण अहवाल तहसील कार्यालयात सादर न केलेल्या कळमनुरी तालुक्यातील २५ तलाठी सज्जांमधील १०५ तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवकांना नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती तहसीलदार डॉ. प्रतिभा गोरे यांनी दिली.

कळमनुरी तालुक्यातील कापूस पिकावरील बोंडअळीसह धान पिकावरील रोगांच्या प्रादुर्भावामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश १२ डिसेंबर रोजी तहसीलदारांनी दिले होते. त्यानंतर पिकांवरील नुकसानीच्या पंचनाम्याचे सर्वेक्षण करून हा अहवाल १० दिवसाच्या आत सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु, २५ सज्जाच्या तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायकांनी अद्यापही अहवाल सादर केला नाही.

दरम्यान, २ जानेवारी रोजी तालुक्यातील मसोड, येहळेगाव (गवणी), घोडा, डोंगरगाव पुल, शेवाळा, वारंगा, शिवणी, कान्हेगाव, डोंगरकडा या १० दहा गावांचे अहवाल तहसील कार्यालयास प्राप्त झाले होते. संबंधित शेतकर्‍यांच्या शेतात जाऊन कापूस व धान पिकांचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना देऊन संयुक्त स्वाक्षरीचा अहवाल सादर करण्याचे सांगण्यात आले होते. परंतु, आदेश देऊनही २० दिवसांचा कालावधी लोटला तरीही नुकसानींचे अहवाल सदर कार्यालयास प्राप्त झाले नाहीत. 

त्यानंतर आता तहसीलदार यांनी संबंधित कर्मचार्‍यांना २४ तासांच्या आत केलेल्या पंचनाम्याचे अहवाल सादर करण्याच्या सूचना नोटिसीद्वारे दिल्या असून विलंब झाल्यास प्रशासकीय कार्यवाही करण्यात येणार असल्याचे त्यात नमूद केले आहे.त्याचप्रमाणे वरिष्ठांच्या आदेशाचे पालन होत नाही, सदरची बाब ही गंभीर स्वरूपाची असून ही बाब खेदजनक असल्याचेही नोटिसीत नमूद केले आहे. दरम्यान, नुकसान झालेल्या ३१ गावांतील पंचनाम्याचे अहवाल तहसील कार्यालयात सादर करण्यात असून अजूनही बर्‍याच गावांतील पिकांचे पंचनामे करण्याची कामे सुरू असल्याची माहिती आहे.

पंचनामे तात्काळ सादर करावेतनुकसानीचे पंचनामे तात्काळ सादर करावेत, यासाठी तहसीलदारांनी १३ डिसेंबर रोजी तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायकांनी बैठक घेऊन चार दिवसांच्या आता १८ डिसेंबरपर्यंत नुकसानीचा सर्वे सादर करण्याच्या सूचना तहसीलदारांना दिल्या होत्या. परंतु, १८ डिसेंबर रोजी चार दिवसांचा कालावधी लोटूनही पंचनाम्याचे अहवाल सादर करण्यात आले नसल्याने संबंधितांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

नुकसानीचा सर्वे करताना सातबारावर त्या पिकांची नोंद असणे आवश्यक होते. ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान व त्यापेक्षा कमी नुकसान तसेच क्षेत्र सर्व्हे नं. शेतकर्‍यांसह उभ्या पिकांचा फोटो शेतकर्‍यांची व पंचाची स्वाक्षरी तसेच तलाठी, कृषी सहायक, ग्रामसेवकाच्या संयुक्त स्वाक्षरीने नुकसानीचा सर्व्हे सादर करण्याच्य सूचना देण्यात आल्या होत्या. 

टॅग्स :cottonकापूसHingoliहिंगोलीFarmerशेतकरी