शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

वाळू मिळत नसल्याने ५४२ घरकुलांच्या कामाला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 19:53 IST

लिलावाची प्रक्रिया ठप्प असल्याने वाळूच मिळेना 

ठळक मुद्देतहसीलकडे दिलेली यादी पडूनकामे तशीच प्रलंबित राहणार

हिंगोली : वाळू घाटांच्या लिलावाची प्रक्रिया ठप्प आहे. त्यातच यात शासन नवनवीन सूचना काढत असल्याने आगामी काळात वाळूघाट लिलाव होतील की नाही, याची शाश्वती उरली नाही. मात्र याचा फटका घरकुल बांधकामाच्या लाभार्थ्यांना बसत असून हिंगोलीत ५४२ घरकुलांचे काम यामुळे ठप्प झाले आहे. तर दोनशेवर कामे सुरू करण्यास लाभार्थी धजावत नाहीत.

हिंगोली शहरात प्रधानमंत्री आवास योजनेसह विशेष प्रकल्पांतर्गत १0९८ घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. यापैकी विशेष प्रकल्पात १३९ घरकुलांना काही दिवसांपूर्वीच मंजुरी मिळालेली असल्याने याबाबतची पुढील प्रक्रिया आता कुठे गतिमान झाली आहे. मात्र ९५९ घरकुलांच्या कामांचा कार्यारंभ आदेश दिलेला आहे. यापैकी १७0 घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे. ज्यांची जास्तीची पदरमोड करण्याची कुवत होती, अशांनी ही कामे पूर्ण केली आहेत. मात्र ज्यांना हे शक्य नाही, अशांना वाळूसाठी काम थांबवण्याची वेळ आली आहे. वाळूघाटांचे अधिकृत लिलाव झालेले नसल्याने वाळूचे दर गगनाला भिडले आहेत. शिवाय अशी वाळूही वेळेत मिळतच नसल्याचे चित्र आहे. मिळेल त्या भावात वाळू घेण्याइतपत हे लाभार्थी सक्षम नसल्याने अडचण होत आहे. त्यामुळे ५४२ कामे चालू झालेली असली तरीही वाळूअभावी ठप्प आहेत. तर उर्वरित २४७ कामे लाभार्थी याच कारणाने सुरू करीत नसल्याचे चित्र आहे. या लाभार्थ्यांना इतरांचे हाल पाहून आपण काम सुरू न करण्यातच शहाणपण असल्याचे दिसत आहे. काहींचा या थंडीच्या काळात उघड्यावर संसार सुरू आहे. तर काहींना घरभाडे भरून घडाईपेक्षा मढाई जास्त या उक्तीचा प्रत्यय येत आहे. मिळणाऱ्या अनुदानापेक्षा घरभाड्यातच जास्त रक्कम जात असल्याची ओरड होत आहे. मात्र यावर काही पर्याय निघत नाही.

कामे तशीच प्रलंबित राहणारघरकुलांच्या लाभार्थ्यांना तहसील प्रशासनाने वाळू उपलब्ध करुन द्यावी, असे पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. त्यासाठी तहसीलदार व न.प.लाही पत्र दिले होते. याप्रमाणे हिंगोली न.प.ने ९५९ लाभार्थ्यांची यादीही तहसील प्रशासनाला पाठविली होती. मात्र त्यावर पुढे काहीच कार्यवाही नाही.काही ठिकाणी डस्टचा वापर करण्याची सूचना दिली जात असली तरीही ती सर्वच कामांसाठी वापरता येत नाही, ही अडचण लक्षात घ्यायला कुणीच तयार नाही. शिवाय त्यातही वाळू मिसळावीच लागते. लहानसे काम करणाऱ्यांना हे परवडणारे नसते. त्यामुळे या भानगडीत कोणी पडत नसल्याचे चित्र आहे. प्रशासनानेच यातून मार्ग काढणे गरजेचे आहे. अन्यथा ही कामे अशीच प्रलंबित राहण्याची भीती निर्माण झाली आहे.

टॅग्स :sandवाळूHingoliहिंगोलीHomeघर