शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
4
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
5
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
6
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
7
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
8
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
9
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
10
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
11
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
12
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
13
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
14
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
15
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
16
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
17
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
18
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
19
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
20
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?

आखाड्याला लागलेल्या आगीत नऊ जनावरे होरपळली; उन्हामुळे जनावरांना वेदना झाल्या असह्य

By रमेश वाबळे | Updated: April 18, 2023 17:34 IST

औंढा नागनाथ तालुक्यातील घटना, शेतकऱ्याचे ९ लाख ६० हजारांचे नुकसान

हिंगोली : शेतातील आखाड्याला आग लागल्याने एक बैल, एक गाय, तीन म्हशींसह चार वगार होरपळल्याची घटना औंढा नागनाथ तालुक्यातील सुरवाडी शिवारात १८ एप्रिल रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या आगीत धान्य, शेती उपयोगी अवजारे व एक दुचाकीही भस्मसात झाल्याने शेतकऱ्याचे ९ लाख ६० हजाराचे नुकसान झाले आहे.

निशाणा येथील शेतकरी प्रकाश मालजी सावळे यांचे शेत औंढा नागनाथ तालुक्यातील सुरवाडी शिवारात आहे. त्यांच्या गट क्रमांक १० मध्ये असलेल्या आखाड्याला मंगळवारी दुपारी अचानक आग लागली. आजुबाजुच्या शेतकऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. तसेच हिंगोली नगर पालिकेचे अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले होते. प्रखर उन्हामुळे आगीवर नियंत्रण मिळविणे कठीण होत होते. सुमारे दोन तासानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. या आगीत आखाड्यात बांधलेला एक बैल, एक गाय, तीन म्हशी व चार वगार अशी नऊ जनावरे होरपळली. तसेच आखाड्यावरील १० क्विंटल गहू, ८ क्विंटल ज्वारी, ३० क्विंटल सोयाबीन, २० क्विंटल हरभरासह इतर धान्य, शेतीउपयोगी अवजारांसह श्यामराव रामराव साळवे यांनी आखाड्यात ठेवलेली

दुचाकीही जळून भस्मसात झाली.घटनेची माहिती कळविल्यानंतर महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पंचनामा केला. त्यानुसार शेतकरी प्रकाश सावळे यांचे ९ लाख ६० हजाराचे नुकसान झाले आहे. तर याच आगीत श्यामराव सावळे यांची दुचाकी जळाली. आगीचे कारण मात्र अस्पष्ट आहे.

मुक्या जनावरांचा जीव झाला व्याकूळ...गत पंधरा दिवसांपासून वातावरणात प्रखरता निर्माण झाली आहे. दुपारच्या वेळेला बाहेर पडणेही कठीण झाले असून, दिवसेंदिवस सूर्य आग ओकत आहे. अशातच सुरवाडी शिवारात गोठ्याला आग लागली. त्यावेळी या गोठ्यात बांधलेल्या म्हशींना पळताभुई थोडी झाली. शेतकऱ्यांनी स्वत:चा जीव धोक्यात टाकून मुक्या जनावरांचा जीव वाचविण्यात यश मिळविले. परंतु, प्रखर उन्हामुळे या मुक्या जनावरांना वेदना सहन करावी लागत आहे.

ऐन दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यावर संकट...नैसर्गिक संकटांमुळे यंदा शेतकरी दुष्काळी परिस्थितीचा सामना करीत आहेत. अशा स्थितीत निशाणा येथील प्रकाश मालजी सावळे यांच्या आखाड्याला लागलेल्या आगीत मोठे नुकसान झाले. यामुळे या शेतकऱ्यावर संकट कोसळले असून, प्रशासनाने प्रकाश सावळे यांना मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीAccidentअपघात