शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

नारायण राणेंना मुख्यमंत्री नुसती आश्वासने देतायत, अजित पवारांचा चिमटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2018 20:53 IST

नारायण राणेंना मुख्यमंत्री नुसती आश्वासने देत आहे. दिवाळी जावू दे…दिवाळी गेली आता नवीन वर्षही लागले…संक्रात होवू दे..आत्ता तर त्यांचीच संक्रात झाली.

हिंगोली ( वसमत ) : नारायण राणेंना मुख्यमंत्री नुसती आश्वासने देत आहे. दिवाळी जावू दे…दिवाळी गेली आता नवीन वर्षही लागले…संक्रात होवू दे..आत्ता तर त्यांचीच संक्रात झाली. राज्याचा मुख्यमंत्री राहिलेल्या माणसाला एवढी केविलवाणी अवस्था करुन घ्यावी लागली आहे. हताश झालेले माजी मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांना सांगत आहेत माझ्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. मला मंत्री करा. अशी अवस्था झाली आहे. सभागृहात एवढं वजन असलेला नेता का वाकतोय हेच कळेना अशीही टिका पवार यांनी केली.राज्यातील जनतेसाठी जे जाहीर केले आहे ते माझ्या शेतकऱ्याला मिळवून देण्यासाठी येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सरकारला जाब विचारणार असल्याचेही पवार यांनी सांगितले.  

ते पुढे म्हणाले की, नारायण राणेंची अवस्था ना घर का ना घाट का अशी झाली असून जो राज्याचा मुख्यमंत्री म्हणून राहिलेला माणूस आज हातात कटोरा घेवून उभा आहे आणि दे माय दे माय..मुख्यमंत्री मंत्री कर माय…मुख्यमंत्री मंत्री कर माय…मुख्यमंत्री मात्र थांबा जरा सांगून थांब माझ्या बाळाला आंघोळ घालते…थांब माझ्या बाळाला पावडर लावतो तसं मुख्यमंत्र्यांचं सुरु आहे…असा खेळ राज्यात मुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्र्यांमध्ये सुरु असल्याची घणाघाती टिका विधीमंडळ पक्षनेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वसमतच्या जाहीर सभेत केली. 

सरकार म्हणजे बश्या बैल, यांना रुमण्याचा हिसका दाखवावाच लागेल

शेतकऱ्यांशी आणि शेतीशी या सरकारचा काहीही संबंध नाही. हे सरकार म्हणजे बश्या बैल आहे, यांना वठणीवर आणण्यासाठी एकदा तरी रुमण्याचा हिसका दाखवावाच लागेल, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी नांदेड येथील कालच्या सभेत जनतेला केले होते.  गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसनं मराठवाड्यात हल्लाबोल आंदोलनाला सुरुवात केली आहे. आंदोलनाच्या पाचव्या दिवशी काल  उमरी येथील सभेसाठी अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांनी फडणवीस सरकारवर चांगलेच तोंडसुख घेतले आहे. अजित पवार म्हणाले, शेतीसाठीच्या पाणीपट्टीत वाढ भरमसाट वाढ करण्यात आली आहे, सरकारनं दिलेली कर्जमाफीची घोषणाही फसवीच निघाली. शेतीपंपाचे वीज कनेक्शन तोडण्यासह शेतीला लागणा-या साधन सामग्रीच्या किमतीत वाढ केल्याने शेतक-यांना जीव नकोसा झाला आहे. त्यामुळे हे सरकार शेतकरी विरोधी असल्याचं म्हणत फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNarayan Raneनारायण राणे Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNCPराष्ट्रवादी काँग्रेस