शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
2
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
3
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
4
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
5
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
6
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
7
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
8
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
9
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
10
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
11
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
12
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?
13
6 एअरबॅग्ज, 35 Km मायलेज अन् ADAS सह लवकरच येतेय ही ढासू कॉम्पॅक्ट SUV; आणखी कोण कोणत्या कार होतायेत लॉन्च? बघा लिस्ट
14
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
15
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
16
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
17
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
18
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
19
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
20
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."

शहरात वानरांच्या उड्या सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:32 IST

हिंगोली : शहरात मागील महिनाभरापासून अन्न आणि पाण्याच्या शोधात वानरांची टोळी दाखल झाली आहे. ही वानरे घरांच्या छतावरुन उड्या ...

हिंगोली : शहरात मागील महिनाभरापासून अन्न आणि पाण्याच्या शोधात वानरांची टोळी दाखल झाली आहे. ही वानरे घरांच्या छतावरुन उड्या मारत आहेत. तसेच अंगणात ठेवलेल्या वस्तुंची नासधूसही करीत आहेत. वन विभागाने याची दखल घेऊन वानरांना पकडून त्यांना वनात नेवून सोडावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

रस्त्यांवर खड्डे; वाहनचालक त्रस्त

कळमनुरी: शहरासह ग्रामीण भागातील रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. जागोजागी रस्त्यांवर खड्डे पडल्याने वाहनचालकांना वाहने चालविताना कसरत करावी लागत आहे. दुसरीकडे खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसानही होत आहे. संबंधित विभागाने याची दखल घेऊन रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.

वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी

कळमुनरी: तालुक्यातील ग्रामीण परिसरातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. वीज खंडित होत असल्यामुळे विजेवर चालणारी उपकरणे जळून जात आहेत. महावितरण कंपनीने या बाबीची दखल घेऊन शहरासह परिसरातील वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी ग्राहकांनी केली आहे.

‘पिण्याच्या पाण्याची सोय करावी’

हिंगोली : येथील बसस्थानकात प्रवाशांना पिण्याचे पाणी मिळत नसल्यामुळे बाजूच्या हॉटेलमध्ये जावून पाणी पित आहेत. बसस्थानकात पिण्याच्या पाण्याची सोय करावी, अशी मागणी अनेक वेळा प्रवाशांनी केली आहे. परंतु, महामंडळाने अद्यापतरी लक्ष दिलेले दिसत नाही. आगारप्रमुखांनी याची दखल घेऊन प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची टाकी बांधून द्यावी, अशी मागणी होत आहे.

विरुद्ध दिशेने वाहतूक सुरुच

हिंगोली : शहरातील गांधी चौक, महावीर चौक, इंदिरा चौक आदी भागात गेल्या काही दिवसांपासून विरुद्ध दिशेने वाहतूक सुरुच आहे. यामुळे बहुतांशवेळा वाहतुकीचा खोळंबा होत आहे. शहर वाहतूक शाखेने विरुद्ध दिशेने होणारी वाहतूक थांबवावी, अशी मागणी होत आहे.

‘नाल्यांवर औषध फवारणी करा’

हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथील जेतवननगर, जयभीमनगर, शिवाजीनगर, मिलन चौक आदी भागातील नाल्या अनेक दिवसांपासून साफ करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे नाल्या तुंबल्या आहेत. नाल्यातील पाणी रस्त्यावर येत आहे. परिणामी डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. ग्रामपंचायतीने याची दखल घेऊन नाल्यांची साफसफाई करुन त्यावर औषध फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

कर्मचाऱ्यांचे अपडाऊन सुरुच

हिंगोली : येथील जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषदेमध्ये अधिकारी-कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र यातील बहुतांश कर्मचारी, अधिकारी नांदेड, परभणी आदी ठिकाणावरुन ये-जा करीत आहेत. अनेकवेळा कार्यालयात उशिरा येण्याचे प्रकार घडत आहेत. कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना अधिकारी-कर्मचाऱ्यांची वाट पाहत ताटकळत थांबावे लागत आहे. यात नागिरकांचा वेळही जात आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.