शहरं
Join us  
Trending Stories
1
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
2
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
3
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
4
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
5
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
6
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
7
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
8
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
10
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
11
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
12
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
13
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
14
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
15
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
16
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
17
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
18
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
19
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
20
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं

शहरात वानरांच्या उड्या सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:32 IST

हिंगोली : शहरात मागील महिनाभरापासून अन्न आणि पाण्याच्या शोधात वानरांची टोळी दाखल झाली आहे. ही वानरे घरांच्या छतावरुन उड्या ...

हिंगोली : शहरात मागील महिनाभरापासून अन्न आणि पाण्याच्या शोधात वानरांची टोळी दाखल झाली आहे. ही वानरे घरांच्या छतावरुन उड्या मारत आहेत. तसेच अंगणात ठेवलेल्या वस्तुंची नासधूसही करीत आहेत. वन विभागाने याची दखल घेऊन वानरांना पकडून त्यांना वनात नेवून सोडावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

रस्त्यांवर खड्डे; वाहनचालक त्रस्त

कळमनुरी: शहरासह ग्रामीण भागातील रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. जागोजागी रस्त्यांवर खड्डे पडल्याने वाहनचालकांना वाहने चालविताना कसरत करावी लागत आहे. दुसरीकडे खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसानही होत आहे. संबंधित विभागाने याची दखल घेऊन रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.

वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी

कळमुनरी: तालुक्यातील ग्रामीण परिसरातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. वीज खंडित होत असल्यामुळे विजेवर चालणारी उपकरणे जळून जात आहेत. महावितरण कंपनीने या बाबीची दखल घेऊन शहरासह परिसरातील वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी ग्राहकांनी केली आहे.

‘पिण्याच्या पाण्याची सोय करावी’

हिंगोली : येथील बसस्थानकात प्रवाशांना पिण्याचे पाणी मिळत नसल्यामुळे बाजूच्या हॉटेलमध्ये जावून पाणी पित आहेत. बसस्थानकात पिण्याच्या पाण्याची सोय करावी, अशी मागणी अनेक वेळा प्रवाशांनी केली आहे. परंतु, महामंडळाने अद्यापतरी लक्ष दिलेले दिसत नाही. आगारप्रमुखांनी याची दखल घेऊन प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची टाकी बांधून द्यावी, अशी मागणी होत आहे.

विरुद्ध दिशेने वाहतूक सुरुच

हिंगोली : शहरातील गांधी चौक, महावीर चौक, इंदिरा चौक आदी भागात गेल्या काही दिवसांपासून विरुद्ध दिशेने वाहतूक सुरुच आहे. यामुळे बहुतांशवेळा वाहतुकीचा खोळंबा होत आहे. शहर वाहतूक शाखेने विरुद्ध दिशेने होणारी वाहतूक थांबवावी, अशी मागणी होत आहे.

‘नाल्यांवर औषध फवारणी करा’

हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथील जेतवननगर, जयभीमनगर, शिवाजीनगर, मिलन चौक आदी भागातील नाल्या अनेक दिवसांपासून साफ करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे नाल्या तुंबल्या आहेत. नाल्यातील पाणी रस्त्यावर येत आहे. परिणामी डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. ग्रामपंचायतीने याची दखल घेऊन नाल्यांची साफसफाई करुन त्यावर औषध फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

कर्मचाऱ्यांचे अपडाऊन सुरुच

हिंगोली : येथील जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषदेमध्ये अधिकारी-कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र यातील बहुतांश कर्मचारी, अधिकारी नांदेड, परभणी आदी ठिकाणावरुन ये-जा करीत आहेत. अनेकवेळा कार्यालयात उशिरा येण्याचे प्रकार घडत आहेत. कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना अधिकारी-कर्मचाऱ्यांची वाट पाहत ताटकळत थांबावे लागत आहे. यात नागिरकांचा वेळही जात आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.