शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

वानरांनी शेंगा खाल्ल्या; नुसतं काडं ठेवून काय करू? शेतकऱ्यांचा संतप्त सवाल

By रमेश वाबळे | Updated: August 24, 2023 18:17 IST

माळरानाच्या काठच्या शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांपासून पीक वाचिवण्यासाठी रात्रंदिवस राखण करण्याची वेळ येत आहे.

हिंगोली : कधी पावसाची दडी तर कधी अतिवृष्टी अशा एकापाठोपाठ येणाऱ्या संकटांना तोंड देताना शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यातच आता वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांपुढे नवे संकट उभे राहिले आहे. रात्रंदिवस पिकांची राखण करूनही पिकांचे संरक्षण करणे शक्य होत नसल्याचे चित्र तालुक्यात पाहावयास मिळत आहे. बोराळा शिवारातील शेतकऱ्यांचा मूग वानरांसह हरीण, निलगायींनी खाल्ल्यामुळे शेतात केवळ काड शिल्लक राहिले. तर, दुसरीकडे मात्र वन विभाग तक्रारी करूनही प्राण्यांचा बंदोबस्त करत नसल्याने पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे.

हिंगोली तालुक्यातील भांडेगाव, साटंबा, जामठी, पांगरी, बोराळा, थोरजवळा, बोराळवाडी या भागात वानरं, हरीण, निलगायी, रानडुकरांचा वावर वाढला आहे. गतवर्षीच्या तुलनेत जवळपास तीन ते चार पटीने वन्यप्राण्यांची संख्या वाढल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. ऐन भरात असलेली पिके प्राणी फस्त करीत आहेत. तसेच अनेक वेळा प्राणी पिकातून सैरावैरा पळत असल्यामुळे नासाडी होत आहे. या भागात सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, हळद आदी पिके समाधानकारक स्थितीत आहेत. परंतु, वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांपुढे संकट उभे राहिले आहे. माळरानाच्या काठच्या शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांपासून पीक वाचिवण्यासाठी रात्रंदिवस राखण करण्याची वेळ येत आहे.बोराळा येथील शेतकरी विजय वाबळे, बद्री वाबळे, गजानन वाबळे यांनी आपल्या शेतात पेरलेल्या मुगाच्या शेंगा वानरांनी फस्त केल्या. फुले, कोवळ्या शेंगा खाल्ल्यामुळे शेतात केवळ काडंच राहिले. काडं ठेवून तरी काय करावे म्हणून शेतकऱ्यांना ऐन भरात असलेला मूग उपटून फेकावा लागला. यात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

प्राण्यांचा बंदोबस्त होईना...यंदा खरिपाच्या प्रारंभापासून वन्यप्राण्यांचा उपद्रव वाढला आहे. ऐन भरात असलेल्या पिकांची प्राणी नासाडी करीत असल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. वन विभागाने या प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत असली तरी त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचा आरोप शेतकऱ्यांतून होत आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीHingoliहिंगोलीMonkeyमाकड