शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
6
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
7
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
8
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
9
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
10
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
11
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
12
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
13
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
14
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
15
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
16
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
17
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
18
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
19
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
20
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास

वानरांनी शेंगा खाल्ल्या; नुसतं काडं ठेवून काय करू? शेतकऱ्यांचा संतप्त सवाल

By रमेश वाबळे | Updated: August 24, 2023 18:17 IST

माळरानाच्या काठच्या शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांपासून पीक वाचिवण्यासाठी रात्रंदिवस राखण करण्याची वेळ येत आहे.

हिंगोली : कधी पावसाची दडी तर कधी अतिवृष्टी अशा एकापाठोपाठ येणाऱ्या संकटांना तोंड देताना शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यातच आता वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांपुढे नवे संकट उभे राहिले आहे. रात्रंदिवस पिकांची राखण करूनही पिकांचे संरक्षण करणे शक्य होत नसल्याचे चित्र तालुक्यात पाहावयास मिळत आहे. बोराळा शिवारातील शेतकऱ्यांचा मूग वानरांसह हरीण, निलगायींनी खाल्ल्यामुळे शेतात केवळ काड शिल्लक राहिले. तर, दुसरीकडे मात्र वन विभाग तक्रारी करूनही प्राण्यांचा बंदोबस्त करत नसल्याने पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे.

हिंगोली तालुक्यातील भांडेगाव, साटंबा, जामठी, पांगरी, बोराळा, थोरजवळा, बोराळवाडी या भागात वानरं, हरीण, निलगायी, रानडुकरांचा वावर वाढला आहे. गतवर्षीच्या तुलनेत जवळपास तीन ते चार पटीने वन्यप्राण्यांची संख्या वाढल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. ऐन भरात असलेली पिके प्राणी फस्त करीत आहेत. तसेच अनेक वेळा प्राणी पिकातून सैरावैरा पळत असल्यामुळे नासाडी होत आहे. या भागात सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, हळद आदी पिके समाधानकारक स्थितीत आहेत. परंतु, वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांपुढे संकट उभे राहिले आहे. माळरानाच्या काठच्या शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांपासून पीक वाचिवण्यासाठी रात्रंदिवस राखण करण्याची वेळ येत आहे.बोराळा येथील शेतकरी विजय वाबळे, बद्री वाबळे, गजानन वाबळे यांनी आपल्या शेतात पेरलेल्या मुगाच्या शेंगा वानरांनी फस्त केल्या. फुले, कोवळ्या शेंगा खाल्ल्यामुळे शेतात केवळ काडंच राहिले. काडं ठेवून तरी काय करावे म्हणून शेतकऱ्यांना ऐन भरात असलेला मूग उपटून फेकावा लागला. यात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

प्राण्यांचा बंदोबस्त होईना...यंदा खरिपाच्या प्रारंभापासून वन्यप्राण्यांचा उपद्रव वाढला आहे. ऐन भरात असलेल्या पिकांची प्राणी नासाडी करीत असल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. वन विभागाने या प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत असली तरी त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचा आरोप शेतकऱ्यांतून होत आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीHingoliहिंगोलीMonkeyमाकड