शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

वानरांनी शेंगा खाल्ल्या; नुसतं काडं ठेवून काय करू? शेतकऱ्यांचा संतप्त सवाल

By रमेश वाबळे | Updated: August 24, 2023 18:17 IST

माळरानाच्या काठच्या शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांपासून पीक वाचिवण्यासाठी रात्रंदिवस राखण करण्याची वेळ येत आहे.

हिंगोली : कधी पावसाची दडी तर कधी अतिवृष्टी अशा एकापाठोपाठ येणाऱ्या संकटांना तोंड देताना शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यातच आता वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांपुढे नवे संकट उभे राहिले आहे. रात्रंदिवस पिकांची राखण करूनही पिकांचे संरक्षण करणे शक्य होत नसल्याचे चित्र तालुक्यात पाहावयास मिळत आहे. बोराळा शिवारातील शेतकऱ्यांचा मूग वानरांसह हरीण, निलगायींनी खाल्ल्यामुळे शेतात केवळ काड शिल्लक राहिले. तर, दुसरीकडे मात्र वन विभाग तक्रारी करूनही प्राण्यांचा बंदोबस्त करत नसल्याने पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे.

हिंगोली तालुक्यातील भांडेगाव, साटंबा, जामठी, पांगरी, बोराळा, थोरजवळा, बोराळवाडी या भागात वानरं, हरीण, निलगायी, रानडुकरांचा वावर वाढला आहे. गतवर्षीच्या तुलनेत जवळपास तीन ते चार पटीने वन्यप्राण्यांची संख्या वाढल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. ऐन भरात असलेली पिके प्राणी फस्त करीत आहेत. तसेच अनेक वेळा प्राणी पिकातून सैरावैरा पळत असल्यामुळे नासाडी होत आहे. या भागात सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, हळद आदी पिके समाधानकारक स्थितीत आहेत. परंतु, वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांपुढे संकट उभे राहिले आहे. माळरानाच्या काठच्या शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांपासून पीक वाचिवण्यासाठी रात्रंदिवस राखण करण्याची वेळ येत आहे.बोराळा येथील शेतकरी विजय वाबळे, बद्री वाबळे, गजानन वाबळे यांनी आपल्या शेतात पेरलेल्या मुगाच्या शेंगा वानरांनी फस्त केल्या. फुले, कोवळ्या शेंगा खाल्ल्यामुळे शेतात केवळ काडंच राहिले. काडं ठेवून तरी काय करावे म्हणून शेतकऱ्यांना ऐन भरात असलेला मूग उपटून फेकावा लागला. यात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

प्राण्यांचा बंदोबस्त होईना...यंदा खरिपाच्या प्रारंभापासून वन्यप्राण्यांचा उपद्रव वाढला आहे. ऐन भरात असलेल्या पिकांची प्राणी नासाडी करीत असल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. वन विभागाने या प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत असली तरी त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचा आरोप शेतकऱ्यांतून होत आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीHingoliहिंगोलीMonkeyमाकड