शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

मुख्याध्यापकांच्या मानधनाचे लाखो रूपये बँकेत पडूनच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 19:57 IST

शासनाकडून उपलब्ध झालेला तांदूळ, धान्यादी माल व इतर माहितीच्या रेकॉर्डची कामे मुख्याध्यापक करतात. सदर कामासाठी मुख्याध्यापकांना दरमहा १०० रुपये म्हणजेच अंदाजे वार्षिक १ हजार रुपये मानधन दिले जाते.

ठळक मुद्देवर्षाकाठी मिळतात एक हजार रुपये  जिल्हाभरात जि. प. च्या शाळांमध्ये जवळपास ८०० च्यावर मुख्याध्यापक कार्यरत आहेत.

हिंगोली : जिल्हा परिषद शाळांतील मुख्याध्यापकांच्या मानधनाचा प्रश्न अद्याप कायम आहे. मागील दोन वर्षांचे मानधन अजूनही रखडलेलेच आहे. त्यामुळे शासनाकडून शिक्षण विभागाला मानधनाचा प्राप्त झालेला निधी बँकेत पडून आहे. तुटपुंजी रक्कम असल्याने याबाबत कोणी अधिकाऱ्यांकडे तक्रारही करत नाही. त्यामुळे मात्र शासनाचा लाखो रूपयांचा निधी बँकेत पडूनच आहे.

शिक्षण विभागाचा कारभार  दिवसेंदिवस ढेपाळत चालला आहे. विविध योजने अंतर्गत जि. प. शाळांच्या विकासकामांचा निधी वाटपाची प्रक्रिया असो की इतर योजना; त्या प्रभावीपणे राबविण्याचे नियोजन कोलमडत चालले आहे. शालेय पोषण आहार योजनेचे जमा खर्च यासह इतर लेखाजोखा लिहिण्यासाठी मुख्याध्यापकांना महिन्याला १०० रूपये म्हणजेच वार्षिक १ हजार रूपये मानधन देण्याची तरतूद आहे. परंतु दोन वर्षांपासून ही रक्कम मुख्याध्यापकांच्या हाती पडली नाही. २०१७-१८ चे मानधन मिळाले असले तरी अद्याप २०१६-१८ आणि २०१८-१९ मधील मानधन मिळाले नाही. विशेष म्हणजे बँककडे धनादेश देऊनही रक्कम अद्याप संबंधित मुख्याध्यापकांच्या खात्यात जमा झाली नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. शालेय पोषण आहार योजनेच्या रेकॉर्डची कामे करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर असते. या कामासाठी मुख्याध्यापकांना दरमहा १०० रूपये याप्रमाणे वर्षाकाठी १ हजार रूपये मानधन दिले जाते. परंतु मुख्याध्यापकांच्या खात्यावर मानधनच जमाच झाले नाही. जिल्ह्यात शालेय पोषण आहार योजनेच्या कामात अनियमता हा नेहमीचाच विषय आहे. 

विशेष म्हणजे जिल्ह्यातील जवळपास ३५ शाळांचा शालेय पोषण आहाराचा मोबदला रखडला आहे. त्यामुळे मुख्याध्यापकांतून संताप व्यक्त केला जात आहे. शासनाच्या महत्त्वाच्या पोषण आहार योजनेचे नियोजन वारंवार कोलमडते. याकामी दिरंगाई करणाऱ्या संबंधित यंत्रणेवरही अधिकाऱ्यांचा वचक नसतो. त्यामुळे पोषण आहार योजना बारगळली जाते. इंधन, भाजीपाला, खिचडी शिजवून देणाऱ्या बचत गटांचे मानधनही मिळाले नाही. 

योजनेच्या लेखा-जोखाची माहिती संकलितजिल्हाभरात जि. प. च्या शाळांमध्ये जवळपास ८०० च्यावर मुख्याध्यापक कार्यरत आहेत. या सर्व शाळेमध्ये शालेय पोषण आहार योजना राबविली जाते. सदर योजनेची लेखा-जोखा ठेवण्याच्या कामाची जबाबदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांवर आहे. शासनाकडून उपलब्ध झालेला तांदूळ, धान्यादी माल व इतर माहितीच्या रेकॉर्डची कामे मुख्याध्यापक करतात. सदर कामासाठी मुख्याध्यापकांना दरमहा १०० रुपये म्हणजेच अंदाजे वार्षिक १ हजार रुपये मानधन दिले जाते. परंतु शासनाकडून निधी उपलब्ध होऊनही त्यांच्या खात्यावर सदर रक्कम कधीच वेळेत जमा केली जात नाहीत. याबाबत विविध संघटनांकडून वेळोवेळी पाठपुरावाही केला जातो. परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जाते. मागील काही महिन्यांपासून शिक्षण विभागातील संबंधित यंत्रणेकडून शालेय पोषण आहार योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नसल्याच्या तक्रारी शिक्षणाधिकाऱ्यांकडे प्राप्त आहेत. परंतु याबाबत ठोस कारवाई केली जात नाही. त्यामुळे याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीTeacherशिक्षकfundsनिधी