शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

शेतकऱ्यांनी उभारली दुधाची बाजारपेठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 00:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क आखाडा बाळापूर : शेतीला काहीतरी जोडधंदा उभा करुन उत्पन्न मिळवण्याची इच्छा प्रत्येक शेतकºयाची असते, मात्र त्यासाठी ...

लोकमत न्यूज नेटवर्कआखाडा बाळापूर : शेतीला काहीतरी जोडधंदा उभा करुन उत्पन्न मिळवण्याची इच्छा प्रत्येक शेतकºयाची असते, मात्र त्यासाठी बाजारपेठ उपलब्ध नसल्याने अनेकांचा हिरमोड होतो. हे ग्रामीण भागातील वास्तव आहे. परंतु यावर मात करून कांडली येथील शेतकºयाने दूध विक्रीची बाजारपेठ बाळापुरात उभी केली आहे. ग्राहकांचा विश्वास मिळवला. अर्ध्या तासातच दूध विकून रोख रक्कम मिळत असल्याने आता परिसरातील शेतकरी या बाजारपेठेकडे आकर्षित झाले आहेत. नव्या बाजारपेठेचा फंडा जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे.शेती हा तोट्याचा व्यवसाय आहे. शेतकºयांना या नुकसानीतून बाहेर येण्यासाठी शेतीपूरक जोडधंदा करावा, असा सल्ला सर्वजण देतात. मात्र जोडधंदा करूनही दारिद्र्य दूर होईना हा सर्वांचाच अनुभव आहे. कळमनुरी तालुक्यातील शेतकरी यशवंत नरवाडे यांना सहा एकर शेती आहे. जोडधंदा म्हणून त्यांना म्हशी राखल्या दररोज ८ ते १० लिटर एकवेळ दूध येई. ते डेअरीला दूध देत, परंतु डेअरीवाले दूध फुटले या कारणाने आठवड्यातून एक दिवस तरी खाडा धरायचे त्यामुळे फायदा व्हायचा नाही. या बाबीला वैतागून त्यांनी बाळापुरातच दूध विकण्याचा निर्णय घेतला. शेवाळा रोड चौकात एका टेबलवर दुधाची कॅन ठेवून बसत. परंतु ग्राहक मिळेना. त्यांचे बसणे हा टिंगलीचा विषय बनला. अनेकवेळा दूध परत न्यावे लागले. हॉटेलवाले इतर दूध विक्रेते भाव पाडून मागायचे; पण या कशालाच दाद न देता त्यांनी नियमीत बसणे सुरू ठेवले. हळूहळू या निक्क्या दुधाची चर्चा सुरू झाली. पाण्याचा थेंबही न मिसळलेले दूध अशी ख्याती झाली. चांगले दूध मिळवण्यासाठी ग्राहक थेट चौकात येवू लागले. मोठ्या कष्टाने, धीराने ग्राहकांना विश्वास देवून ही बाजारपेठ निर्माण केली. हळूहळू ग्राहक वाढले. दूध कमी पडू लागल्याने इतर शेतकºयांना बोलावले. शेतकरी वाढले. आता बाळापूर, कांडली, बऊर, आडा येथील शेतकरी दूध विकतात. अर्ध्या तासातच १५० ते २०० लिटर दूध नगदीने विकले जाते. ५० रुपये लिटरप्रमाणे रोख पैसा काही मिनिटातच शेतकºयांच्या खिशात पडतो.परिसरातील पाच ते सहा शेतकºयांच्या १५० ते २०० लिटर दुधाची दररोज विक्री होते. शेतकºयांना दररोज रोख पैसे यातून मिळतात. गेल्या दीड वर्षांपासून ही थेट बाजारपेठ तयार झाली. शेतकरी या बाजारपेठेकडे आकर्षित झाल्याने येथील डेअरी बंद करावी लागली आहे.ही थेट बाजारपेठ जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे.मला केवळ ६ एकर शेती आहे. १२ म्हशी, ८ बछडे आहेत. दररोज एक वेळा २० लिटर असे ४० लिटर दूध निघते. पण डेअरीवाल्यांची चलाखी आम्हाला नफा मिळू देत नव्हती. म्हणून थेट ग्राहकांशीच नाळ जोडली. २ ते ३ महिने नुकसान झाले. पण ग्राहकांना विश्वास पटला. आता रोज १ हजार २०० ते १ हजार ५०० रुपये रोख मिळतात. विश्वासावरच हा व्यवसाय उभारला. ग्राहकांना डेअरी किंवा पॅकिंगच्या दुधापेक्षा चांगले दूध मिळत असल्याने ग्राहक इकडे आकर्षित झाले आहेत, असे कांडली येथील सदर शेतकरी यशवंत नरवाडे यांनी सांगितले.आधी डेअरीला जाणारे दूध शेतकरी आता या बाजारपेठेत विकत असल्याने डेअरीला दूध जाणे बंद झाले. शिवाय ग्राहकही इकडे वळल्याने डेअरीचा व्यवसाय बंद पडल्याचे दिसून येत आहे.

 

 

शेतीला काहीतरी जोडधंदा उभा करुन उत्पन्न मिळवण्याची इच्छा प्रत्येक शेतकऱ्याची असते, मात्र त्यासाठी बाजारपेठ उपलब्ध नसल्याने अनेकांचा हिरमोड होतो.

टॅग्स :Hingoliहिंगोलीmilkदूध