शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा 
2
रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी...
3
ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट
4
भाजपाच्या मित्रपक्षांमध्ये वाद, NDA सरकारमध्ये वाढली डोकेदुखी; बंद दाराआड बैठक घेणार
5
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये या अभिनेत्याची एन्ट्री, साकारणार रावणाच्या जवळच्या व्यक्तीची भूमिका
6
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
7
पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून पती फरार; तिहेरी हत्याकांडांने दिल्ली हादरली
8
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?
9
ICICI Bank Minimum Balance: आता ₹१०००० नाही, बचत खात्यात ₹५०००० चा मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार, 'या' दिवसापासून नियम लागू होणार
10
मर्मबंध! आईच्या दुधाचा स्वाद, ब्रेस्ट मिल्क फ्लेव्हर्ड आईस्क्रीमची तुफान चर्चा, पण हे आहे तरी काय?
11
हृदयद्रावक! रक्षाबंधनासाठी येणाऱ्या भावासोबत आक्रित घडलं, वाट पाहत होत्या बहिणी पण...
12
लफडं! पतीचे हात तोडले अन् १० वर्ष लहान भाच्यासोबत पळाली मामी; नात्याला काळीमा फासणारी कहाणी
13
पाकिस्तानात मोठ्या राजकीय घडामोडी...! संसदेच्या विरोधी पक्षनेत्याला पदावरून काढले, पीटीआयचे अनेक नेते अडचणीत
14
स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत अद्याप आघाडी नाही; मविआबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, 'मनसे' युतीचे संकेत
15
अमूल, पार्ले-जी, गोदरेज... अमेरिकेच्या टॅक्सपासून वाचण्यासाठी भारतीय कंपन्यांचा 'जुगाड', उचलू शकतात 'हे' पाऊल
16
"तिला कितीदा समजावले, तरीही दुसऱ्या मुलांशी बोलत राहिली"; संतापलेल्या प्रियकराने असा काढला राग अन्...
17
बलात्काराची खोटी तक्रार; माजी महिला बँक कर्मचाऱ्याला अटक
18
...तर अमेरिकेत १९२९ सारखी महामंदी येईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेलाच दिली धमकी
19
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹३०,२२८ रुपयांचं फिक्स व्याज, पाहा स्कीमच्या डिटेल्स
20
रक्षाबंधनाच्या दिवशी दोन जवान धारातीर्थी पडले; कुलगाममध्ये एक दहशतवादी ठार, मोठी चकमक सुरु

शेतकऱ्यांनी उभारली दुधाची बाजारपेठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 00:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क आखाडा बाळापूर : शेतीला काहीतरी जोडधंदा उभा करुन उत्पन्न मिळवण्याची इच्छा प्रत्येक शेतकºयाची असते, मात्र त्यासाठी ...

लोकमत न्यूज नेटवर्कआखाडा बाळापूर : शेतीला काहीतरी जोडधंदा उभा करुन उत्पन्न मिळवण्याची इच्छा प्रत्येक शेतकºयाची असते, मात्र त्यासाठी बाजारपेठ उपलब्ध नसल्याने अनेकांचा हिरमोड होतो. हे ग्रामीण भागातील वास्तव आहे. परंतु यावर मात करून कांडली येथील शेतकºयाने दूध विक्रीची बाजारपेठ बाळापुरात उभी केली आहे. ग्राहकांचा विश्वास मिळवला. अर्ध्या तासातच दूध विकून रोख रक्कम मिळत असल्याने आता परिसरातील शेतकरी या बाजारपेठेकडे आकर्षित झाले आहेत. नव्या बाजारपेठेचा फंडा जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे.शेती हा तोट्याचा व्यवसाय आहे. शेतकºयांना या नुकसानीतून बाहेर येण्यासाठी शेतीपूरक जोडधंदा करावा, असा सल्ला सर्वजण देतात. मात्र जोडधंदा करूनही दारिद्र्य दूर होईना हा सर्वांचाच अनुभव आहे. कळमनुरी तालुक्यातील शेतकरी यशवंत नरवाडे यांना सहा एकर शेती आहे. जोडधंदा म्हणून त्यांना म्हशी राखल्या दररोज ८ ते १० लिटर एकवेळ दूध येई. ते डेअरीला दूध देत, परंतु डेअरीवाले दूध फुटले या कारणाने आठवड्यातून एक दिवस तरी खाडा धरायचे त्यामुळे फायदा व्हायचा नाही. या बाबीला वैतागून त्यांनी बाळापुरातच दूध विकण्याचा निर्णय घेतला. शेवाळा रोड चौकात एका टेबलवर दुधाची कॅन ठेवून बसत. परंतु ग्राहक मिळेना. त्यांचे बसणे हा टिंगलीचा विषय बनला. अनेकवेळा दूध परत न्यावे लागले. हॉटेलवाले इतर दूध विक्रेते भाव पाडून मागायचे; पण या कशालाच दाद न देता त्यांनी नियमीत बसणे सुरू ठेवले. हळूहळू या निक्क्या दुधाची चर्चा सुरू झाली. पाण्याचा थेंबही न मिसळलेले दूध अशी ख्याती झाली. चांगले दूध मिळवण्यासाठी ग्राहक थेट चौकात येवू लागले. मोठ्या कष्टाने, धीराने ग्राहकांना विश्वास देवून ही बाजारपेठ निर्माण केली. हळूहळू ग्राहक वाढले. दूध कमी पडू लागल्याने इतर शेतकºयांना बोलावले. शेतकरी वाढले. आता बाळापूर, कांडली, बऊर, आडा येथील शेतकरी दूध विकतात. अर्ध्या तासातच १५० ते २०० लिटर दूध नगदीने विकले जाते. ५० रुपये लिटरप्रमाणे रोख पैसा काही मिनिटातच शेतकºयांच्या खिशात पडतो.परिसरातील पाच ते सहा शेतकºयांच्या १५० ते २०० लिटर दुधाची दररोज विक्री होते. शेतकºयांना दररोज रोख पैसे यातून मिळतात. गेल्या दीड वर्षांपासून ही थेट बाजारपेठ तयार झाली. शेतकरी या बाजारपेठेकडे आकर्षित झाल्याने येथील डेअरी बंद करावी लागली आहे.ही थेट बाजारपेठ जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे.मला केवळ ६ एकर शेती आहे. १२ म्हशी, ८ बछडे आहेत. दररोज एक वेळा २० लिटर असे ४० लिटर दूध निघते. पण डेअरीवाल्यांची चलाखी आम्हाला नफा मिळू देत नव्हती. म्हणून थेट ग्राहकांशीच नाळ जोडली. २ ते ३ महिने नुकसान झाले. पण ग्राहकांना विश्वास पटला. आता रोज १ हजार २०० ते १ हजार ५०० रुपये रोख मिळतात. विश्वासावरच हा व्यवसाय उभारला. ग्राहकांना डेअरी किंवा पॅकिंगच्या दुधापेक्षा चांगले दूध मिळत असल्याने ग्राहक इकडे आकर्षित झाले आहेत, असे कांडली येथील सदर शेतकरी यशवंत नरवाडे यांनी सांगितले.आधी डेअरीला जाणारे दूध शेतकरी आता या बाजारपेठेत विकत असल्याने डेअरीला दूध जाणे बंद झाले. शिवाय ग्राहकही इकडे वळल्याने डेअरीचा व्यवसाय बंद पडल्याचे दिसून येत आहे.

 

 

शेतीला काहीतरी जोडधंदा उभा करुन उत्पन्न मिळवण्याची इच्छा प्रत्येक शेतकऱ्याची असते, मात्र त्यासाठी बाजारपेठ उपलब्ध नसल्याने अनेकांचा हिरमोड होतो.

टॅग्स :Hingoliहिंगोलीmilkदूध