शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
2
झालं... युपीआय बॅलन्स चेकवर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
3
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
4
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
5
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
6
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
7
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
8
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
9
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
10
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
11
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
12
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
13
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
14
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
15
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
16
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
17
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
18
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
19
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय

पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांच्या प्रगतिपत्रकावर 'वर्गोन्नत' उल्लेख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:31 IST

हिंगोली : कोरोनामुळे पहिली ते चौथीच्या शाळा सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे अकारिक व संकलित मूल्यमापन करणे शक्य झाले ...

हिंगोली : कोरोनामुळे पहिली ते चौथीच्या शाळा सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे अकारिक व संकलित मूल्यमापन करणे शक्य झाले नाही. अशा विद्यार्थ्यांना बालकाच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण अधिकार कायद्यानुसार पुढील वर्गात ‘वर्गोन्नत’ करण्यात आले आहे. त्यांच्या प्रगतिपत्रकावरही ‘वर्गोन्नत’ असल्याचा उल्लेख करण्यात येत आहे.

कोरोनामुळे शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये इयत्ता पहिली ते चौथीच्या शाळा सुरू करता आल्या नाहीत. इयत्ता १ ली ते ४ थीच्या वर्गांना प्रत्यक्ष वर्गात अध्यापन करणे शक्य झाले नसले तरी दीक्षा ॲप, शाळा बंद ...पण शिक्षण आहे, टिलीमिली, ज्ञानगंगा आदींच्या माध्यमातून शिक्षण देण्याचा शासन व शाळांनी प्रयत्न केला; परंतु, अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे अकारिक व संकलित मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण झाली नाही. त्यामुळे इयत्ता १ ली ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना वर्गोन्नत करण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्या विद्यार्थ्यांचे केवळ अकारिक मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण झाली, अशा विद्यार्थ्यांची संपादणूक लक्षात घेता त्यांचे रूपांतर १०० गुणांमध्ये करावे, त्यानंतर त्यांची श्रेणी निर्धारित करावी, तसेच ज्या विद्यार्थ्यांचे अकारिक व संकलित मूल्यमापन करणे शक्य झाले नाही, अशा विद्यार्थ्यांना आरटीई २००९ अंतर्गंत च्या कलम १६ नुसार विद्यार्थ्यांना पुढील वर्गात वर्गोन्नत करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे विद्यार्थी परीक्षा न देताच उतीर्ण करण्यात आले आहेत. मात्र, त्यांच्या प्रगतिपत्रकावर आरटीई ॲक्ट २००९ नुसार ‘वर्गोन्नत’ असा उल्लेख येत आहे.

प्रगतिपत्रकच बदलणार

इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचे अकारिक व संकलित मूल्यमापन न झालेल्या विद्यार्थ्यांना आरटीई अंतर्गंत पुढील वर्गात वर्गोन्नत करण्यात आले आहे. त्यामुळे प्रगतिपत्रकावरही विषयांसमोर आरटीई ॲक्ट २००९ नुसार ‘वर्गोन्नत’ असा उल्लेख करण्यात येत आहे. त्यावर विद्यार्थ्याचे नाव, शाळेचे नाव, इयत्ता, तुकडी, रजि. नं. जन्मदिनांकांचा उल्लेख असणार आहे.

मुले घरात कंटाळली

मागील वर्षभरापासून शाळा सुरू झाली नाही. ऑनलाईन शिक्षण सुरू असले तरी घराबाहेर पडता आले नाही. शाळा सुरू असत्या तर विविध स्पर्धेत सहभागी होता आले असते. आता शाळा लवकर सुरू व्हाव्यात.

- अश्विनी रामदास खराटे, कौठा

शाळा बंद असल्या तरी पुढील वर्गात प्रवेश मिळणार आहे. परंतु, शाळा सुरू असत्या तर मित्रांबरोबर खेळता आले असते. घरात सारखं राहून कंटाळा आला आहे. शाळा लवकर सुरू कराव्यात.

- धीरज ज्ञानेश्वर हमाने, कडोळी

परीक्षा न देताच पास झाले आहे. मात्र, घरात राहून कंटाळा आला आहे. शाळा सुरू झाल्यास वर्गात बसून शिक्षण घेता येईल तसेच विविध स्पर्धेत सहभागी होता येईल.

-अमृता शिवप्रसाद मुलगीर, पोत्रा

शैक्षणिक नुकसान भरून काढणार

कोरोनामुळे शैक्षणिक सत्र २०२०-२१ मध्ये विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्याकरिता २०२१-२२ मध्ये शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने कृती कार्यक्रम विकसित करण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

पहिलीतील विद्यार्थी - २२८५२

दुसरीतील विद्यार्थी - २३१८७

तिसरीतील विद्यार्थी - २२११२

चौथीतील विद्यार्थी - २१८७४