शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

कयाधू नदी पुनरुज्जीवित करण्यासाठी बैठका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 23:54 IST

भाजप नेते रामरतन शिंदे यांनी कयाधूच्या पुनर्जीवनासाठी पुढाकार घेतला आहे. नदीकाठातील ४८ गावांत ३१ दिवस पाहणी करणार आहेत. आतापर्यंत सात ते आठ गावांत बैठका झाल्या. रूंदीकरण व खोलीकरणासाठी एकजुटीने सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : भाजप नेते रामरतन शिंदे यांनी कयाधूच्या पुनर्जीवनासाठी पुढाकार घेतला आहे. नदीकाठातील ४८ गावांत ३१ दिवस पाहणी करणार आहेत. आतापर्यंत सात ते आठ गावांत बैठका झाल्या. रूंदीकरण व खोलीकरणासाठी एकजुटीने सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.सेनगाव तालुक्यातील कयाधू नदी काठावरील गावाला रामरतन शिंदे यांनी भेटी दिल्या. पार्डी पोहकर येथे ग्रामस्थांना बोलतांना शिंदे म्हणाले की, समाजाभिमुख चळवळीत तरूण, ज्येष्ठांनी पुढाकार घ्यावा. समाजातील दानशूर व्यक्तींच्या मदतीने या ठिकाणी जेसीबी लावण्यात येणार आहे. ज्यांना जे शक्य असेल त्यांनी ती मदत यासाठी करावी. जनजागृती कार्यक्रमानंतर प्रत्यक्ष कामाला सुरूवात करण्यात येणार असून, नदीकाठातील ४७ गावे ३१ दिवस आपला सहभाग नोंदविणार आहेत. पैनगंगा नदीसारखी रूंदी आणि खोली कयाधूची करण्याचा मानस आहे. शेवटी शिंदे यांनी सर्व ग्रामस्थांना शपथ दिली की, आम्ही ३१ दिवस कयाधू नदीच्या पुनर्जीवनासाठी नि:स्वार्थीपणे श्रमदान करेल, अतिशय उत्साहाने उपस्थित सर्व ग्रामस्थांनी ही शपथ घेतली. शिंदे यांनी सुरू केलेली कयाधू नदीच्या पुनर्जीवनाच्या चळवळीचा वाढता प्रतिसाद पाहता लवकरच लोकचळवळ होणार आहे. रूंदीकरण व खोलीकरणात सर्वांनी एकजुटीने सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.सेनगाव तालुक्यातील कारेगाव येथे सायंकाळी ७ वाजता तर नागा सिनगी येथे ७.३० वाजता कयाधू नदी पूनर्जीवनासाठी जनजागृतीपर बैठक झाली. बैठकीस सर्व ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी उपस्थित राहून संकल्पना, समस्या मांडल्याचे रामरतन शिंदे यांनी सांगितल.

टॅग्स :Hingoliहिंगोलीriverनदी