शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

श्रद्धेची चिकित्सा करा म्हणजे तिचे अंधश्रद्धेत रुपांतर होणार नाही - श्याम मानव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 15:34 IST

बुवा-बाबांच्या चमत्कारावर विश्वास न ठेवता प्रत्येकाने डोळस श्रद्धा ठेवावी. शिवाय श्रद्धेची चिकित्साही करणे तितकेच महत्त्वाचे असून श्रद्धेचे अंधश्रद्धेत रूपांतरण होऊ देऊ नका असे मत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संघटक प्रा. श्याम मानव यांनी सोमवारी आयोजित व्याख्यानात व्यक्त केले.

ठळक मुद्देयावेळी प्रा. श्याम मानव यांनी वृक्ष तेथे छाया, बुवा तेथे बाया या विषयावर उपस्थितांना व्याख्यानातून मार्गदर्शन केले.

हिंगोली : बुवा-बाबांच्या चमत्कारावर विश्वास न ठेवता प्रत्येकाने डोळस श्रद्धा ठेवावी. शिवाय श्रद्धेची चिकित्साही करणे तितकेच महत्त्वाचे असून श्रद्धेचे अंधश्रद्धेत रूपांतरण होऊ देऊ नका असे मत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संघटक प्रा. श्याम मानव यांनी सोमवारी आयोजित व्याख्यानात व्यक्त केले. यावेळी सुरेश जुरमुरे, पुरूषोत्तम आवारे, मनोज आखरे, पोनि मारोती थोरात, जयाजी पाईकराव, विजय कांबळे, प्रकाश मगरे, शरद वानखेडे, महमंद मजहर, धम्मपाल कांबळे, दत्ता तपासे, मोरे यांच्यासह मान्यवर व समितीचे पदाधिकारी तसेच हिंगोली शहरासह ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने श्रोते उपस्थित होते. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती हिंगोली शाखेचे वतीने सोमवारी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी प्रा. श्याम मानव यांनी ' वृक्ष तेथे छाया, बुवा तेथे बाया ' या विषयावर उपस्थितांना व्याख्यानातून मार्गदर्शन केले. प्रा. मानव म्हणाले आचार्य अत्रे यांच्या शिर्षकाखाली म्हणजेच वृक्ष तेथे छाया व बुवा तेथे बाया हे वाक्य आजच्या काळात शंभर टक्के लागू होत आहे. अंधश्रद्धेतून सर्वसामान्यांची लुबाडणूक होत आहे. श्रद्धेच्या नावाखाली आंधळे भक्त बुवाबाबांच्या नादी लागत आहेत. त्यामुळे अनेक नव-नवीन बाबांचा अवतार निर्माण होताना दिसत आहे. गुलाबबाबा, शुकदास महाराज, सत्यसाईबाबा यासह अनेक महाराज व बाबांची खरी माहिती उघड करून ते कशाप्रकारे चमत्कार करत असत हे त्यांनी प्रात्येक्षिकासह करून दाखविले. त्यामुळे श्रोतेही आवाक् झाले होते. हवेत हात फिरवून चमत्कार करून सोन्याच्या वस्तू आकाशातून आणणा-या ढोंगी बाबांच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री, पंतप्रधान जातात ही मोठी शोकांतिका असल्याचे मानव म्हणाले. 

चमत्कार करा, २५ लाखांचे बक्षीस मिळवा देवा-धर्माच्या नावावर महिलांचे शोषण केले जाते. त्यांचा उपभोग बाबा व महाराज घेत असून याला आळा बसावा व फसवेगिरी करणा-यांविरूद्ध अंनिस भारतभर जादुटोणाविरोधी कायद्याची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहचवित आहे. समितीसमोर कोणीही चमत्कार करून दाखवावा व २५ लाखांचे बक्षीस घेऊन जावे, असे आव्हान  दिले होते. परंतु कुणीही आमच्यासमोर आला नाही, चमत्कार करण्याचे धाडस केले नाही. कारण तोच फसवेगिरी करून समाजाला लुबाडणारा होता. त्यामुळे अंधश्रद्धेला बळी न पडता श्रद्धेची चिकित्सा करण्याचे आवाहन यावेळी मानव यांनी केले.