शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
4
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
5
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
6
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
7
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
8
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
9
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
10
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
11
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
12
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
13
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
14
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
15
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
17
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
18
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
19
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
20
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!

CAA : हिंगोलीत नागरिकत्व दुरूस्ती कायद्याच्या समर्थनार्थ भव्य मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 1:55 PM

राष्ट्रप्रेमी नागरीक कृती समितीच्या वतीने नागरीकत्व संशोधन कायद्याचे समर्थनासाठी मोर्चा

हिंगोली : शहरातील गांधी चौकातून २४ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता नागरिकत्व दुरूस्ती कायद्याच्या समर्थनार्थ शांततेत भव्य मोर्चा काढण्यात आला. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना नागरिकांच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने महिला, पुरूष, युवक सहभागी झाले होते. यावेळी पोलीस प्रशासनातर्फे कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारताच्या संसदेच्या दोन्ही सभागृहात बहुमताने मंजूर केलेल्या नागरीकता संशोधन कायदा २०१९ नुसार बांगलादेश, आफगाणीस्तान आणि पाकीस्तान या तीन शेजारील देशात राहणाऱ्या हिंदू, ख्रिश्चन, पारशी, जैन, बौद्ध या नागरीकांना तेथे केवळ धर्माच्या आधारावर अत्याचारामुळे प्रताडीत होऊन भारताच्या आश्रयाला आल्यानंतर भारताचे नागरीकत्व स्वीकारता येईल. भारतीय नागरीकत्व स्वीकारण्यासंदर्भात १९५५ मध्ये जो कायदा करण्यात आला होता त्यात दुरूस्ती करण्यात आली आहे. कायद्यानुसार भारतीय नागरीक होण्यासाठी भारतात ११ वर्ष आधिवास आवश्यक होता. या नागरिकत्व संशोधन कायद्यानुसार ११ वर्षाची अट ६ वर्षापर्यंत कमी करण्यात आली आहे. पाकिस्तान, बांगला देशा आणि अफगाणीस्तान या तीन देशातील मुस्लिमेत्तर नागरिकांनी भारतात ५ वर्ष वास्तव्य केले असेल तर त्यांना भारतीय नागरीकत्वासाठी पात्र समजल्या जाणार आहे. तसेच या कायद्यामुळे या देशात एकही घुसखोर शिल्लक राहणार नसल्याची हमी केंद्रीय गृहमंत्र्यांनी दिली आहे.

हिंगोली येथील राष्ट्रप्रेमी नागरीक कृती समितीच्या वतीने नागरीकत्व संशोधन कायद्याचे समर्थन करीत मोर्चा काढला. तसेच या कायद्याच्या विरोधात देशविरोधी कारवायांच्या माध्यमातून देशात तणाव निर्माण केला जात आहे. या तणाव निर्माण करणाऱ्यांचा कृती समितीच्या वतीने निवेदनाद्वारे निषेध व्यक्त करण्यात आला. 

मोर्चाला परवानगी नव्हतीहिंगोली शहरातील राष्ट्रप्रेमी नागरीक कृती समितीच्या वतीने मोर्चाला परवानगी द्यावी याबाबत हिंगोली शहर ठाण्यात अर्ज केला होता.मात्र पोलीस प्रशासनातर्फे या मोर्चाला परवानगी मिळाली नाही. तरीही कृती समितीच्या वतीने मोर्चा काढण्यात आल्याने हा चर्चेचा विषय बनला होता.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकHingoliहिंगोलीMorchaमोर्चा