शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

जागेचा शोध घेता घेता बाजार समिती थकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 00:30 IST

येथील बाजार समितीत हळदीची आवक वाढल्याने नाफेडच्या हरभरा खरेदीसाठी जागेचा शोध घेऊनही ती मिळाली नाही. गोरेगावसह कनेरगाव येथील जागेचा प्रस्ताव जिल्हा व्यवस्थापक कार्यालयाकडे पाठवूनही नकार मिळाला.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : येथील बाजार समितीत हळदीची आवक वाढल्याने नाफेडच्या हरभरा खरेदीसाठी जागेचा शोध घेऊनही ती मिळाली नाही. गोरेगावसह कनेरगाव येथील जागेचा प्रस्ताव जिल्हा व्यवस्थापक कार्यालयाकडे पाठवूनही नकार मिळाला. त्यामुळे शेवटी अपुऱ्या जागेतच हरभरा खरेदी करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. त्यातच एक नवीन खुशखबर म्हणजे नोंदणी झालेल्या शेतकºयांची तूर १५ मे पर्यंत खरेदी करण्यास वाढीव मुदत मिळाली आहे.येथील बाजार समितीकडे जवळपास ८०० शेतकºयांची हरभरा विक्रीसाठी तर ६५० शेतकºयांची तूर विक्रीसाठी नोंद आहे. मात्र वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करत बाजार समितीने नोंदणी झालेल्या शेतकºयांच्या तुरीची खरेदी न करताच केंद्राने गाशा गुंडाळला. त्यामुळे हिंगोली तालुक्यातील शेतकºयांनी काही गोंधळ केलेला नसला तरीही सेनगाव तालुक्यात केलेल्या गोंधळाने तूर खरेदीला वाढीव मुदत मिळाली आहे. तर हरभरा खरेदीलाही इतर ठिकाणावर गती आलेली असताना मात्र हिंगोलीतील बाजार समितीला हरभरा खरेदीसाठी अजून तरी जागा मिळालेली नाही. त्यामुळे बाजार समितीने आपले बस्तान जुन्या मोंढ्यातील एका अपुºया जागेत मांडण्याची वेळ आली आहे. तेथेही केवळ हरभराच खरेदी नव्हे; तर तुरीचीही खरेदी केली जाणार आहे. त्यामुळे हरभरा अन् तूर एकत्र खरेदी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच त्या ठिकाणी वाहने जाण्यासही जागा अपुरी असल्याने वाहने थांबविण्याचाही प्रश्न गंभीर बनल्याशिवाय राहणार नाही.हिंगोली बाजार समितीकडे तुरीची खरेदी आली तेव्हापासून शांततेत खरेदी सुरु असली तरीही या ठिकाणी मात्र हरभरा आणि तूर खरेदीसाठी वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तुरीला वाढीव दिलेली मुदत कायम राहते की खरेदीच बंद ठेवण्याची वेळ येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.बाजार समितीकडे नोंदणी झालेल्या ८०० शेतकºयांपैकी सोमवारी १५ शेतकºयांना एसएमएस पाठवून हरभरा विक्रीस आणण्याचे सांगितले आहे. मात्र मंगळवारीही कोणत्याही शेतकºयाने हरभरा विक्रीस आणला नव्हता. त्यामुळे खरेदी केंद्राचे उद्घाटनही करता आले नाही, हे विशेष !तुरीची नोंदणी झालेले शेतकरी मात्र तूर खरेदीचा आढावा घेऊन निघून जात होते. मात्र कोणीच तूर घेऊन न आल्याने दुपारी उशिरापर्यंत तुरीचीही खरेदी झालेली नव्हती. त्यामुळे बाजार समितीला आता शेतकºयांच्या मालाची प्रतीक्षा लागली आहे.लोकमतने वारंवार पाठपुरावा केल्यामुळे मंगळवारी हरभरा खरेदेचा मुहुर्त मिळाला आहे. कोणतेही शेतकरी हरभर विक्रीस आले नसले तरीही मार्केट कमेटीने खरेदीस प्रारंभ झाल्याचे जाहिर केले.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डFarmerशेतकरी