शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

जागेचा शोध घेता घेता बाजार समिती थकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 00:30 IST

येथील बाजार समितीत हळदीची आवक वाढल्याने नाफेडच्या हरभरा खरेदीसाठी जागेचा शोध घेऊनही ती मिळाली नाही. गोरेगावसह कनेरगाव येथील जागेचा प्रस्ताव जिल्हा व्यवस्थापक कार्यालयाकडे पाठवूनही नकार मिळाला.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : येथील बाजार समितीत हळदीची आवक वाढल्याने नाफेडच्या हरभरा खरेदीसाठी जागेचा शोध घेऊनही ती मिळाली नाही. गोरेगावसह कनेरगाव येथील जागेचा प्रस्ताव जिल्हा व्यवस्थापक कार्यालयाकडे पाठवूनही नकार मिळाला. त्यामुळे शेवटी अपुऱ्या जागेतच हरभरा खरेदी करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. त्यातच एक नवीन खुशखबर म्हणजे नोंदणी झालेल्या शेतकºयांची तूर १५ मे पर्यंत खरेदी करण्यास वाढीव मुदत मिळाली आहे.येथील बाजार समितीकडे जवळपास ८०० शेतकºयांची हरभरा विक्रीसाठी तर ६५० शेतकºयांची तूर विक्रीसाठी नोंद आहे. मात्र वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करत बाजार समितीने नोंदणी झालेल्या शेतकºयांच्या तुरीची खरेदी न करताच केंद्राने गाशा गुंडाळला. त्यामुळे हिंगोली तालुक्यातील शेतकºयांनी काही गोंधळ केलेला नसला तरीही सेनगाव तालुक्यात केलेल्या गोंधळाने तूर खरेदीला वाढीव मुदत मिळाली आहे. तर हरभरा खरेदीलाही इतर ठिकाणावर गती आलेली असताना मात्र हिंगोलीतील बाजार समितीला हरभरा खरेदीसाठी अजून तरी जागा मिळालेली नाही. त्यामुळे बाजार समितीने आपले बस्तान जुन्या मोंढ्यातील एका अपुºया जागेत मांडण्याची वेळ आली आहे. तेथेही केवळ हरभराच खरेदी नव्हे; तर तुरीचीही खरेदी केली जाणार आहे. त्यामुळे हरभरा अन् तूर एकत्र खरेदी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच त्या ठिकाणी वाहने जाण्यासही जागा अपुरी असल्याने वाहने थांबविण्याचाही प्रश्न गंभीर बनल्याशिवाय राहणार नाही.हिंगोली बाजार समितीकडे तुरीची खरेदी आली तेव्हापासून शांततेत खरेदी सुरु असली तरीही या ठिकाणी मात्र हरभरा आणि तूर खरेदीसाठी वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तुरीला वाढीव दिलेली मुदत कायम राहते की खरेदीच बंद ठेवण्याची वेळ येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.बाजार समितीकडे नोंदणी झालेल्या ८०० शेतकºयांपैकी सोमवारी १५ शेतकºयांना एसएमएस पाठवून हरभरा विक्रीस आणण्याचे सांगितले आहे. मात्र मंगळवारीही कोणत्याही शेतकºयाने हरभरा विक्रीस आणला नव्हता. त्यामुळे खरेदी केंद्राचे उद्घाटनही करता आले नाही, हे विशेष !तुरीची नोंदणी झालेले शेतकरी मात्र तूर खरेदीचा आढावा घेऊन निघून जात होते. मात्र कोणीच तूर घेऊन न आल्याने दुपारी उशिरापर्यंत तुरीचीही खरेदी झालेली नव्हती. त्यामुळे बाजार समितीला आता शेतकºयांच्या मालाची प्रतीक्षा लागली आहे.लोकमतने वारंवार पाठपुरावा केल्यामुळे मंगळवारी हरभरा खरेदेचा मुहुर्त मिळाला आहे. कोणतेही शेतकरी हरभर विक्रीस आले नसले तरीही मार्केट कमेटीने खरेदीस प्रारंभ झाल्याचे जाहिर केले.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डFarmerशेतकरी