शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
4
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
5
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
6
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
7
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
8
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
9
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
10
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
11
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
12
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
13
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
14
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
15
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
16
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
17
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
18
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
19
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
20
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा

'वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करा'; भर पावसात शेतकऱ्यांचा विभागीय वनअधिकारी कार्यालयावर मोर्चा

By रमेश वाबळे | Updated: July 21, 2023 18:37 IST

बहुतांश भागात वन्य प्राण्याचा उपद्रव वाढला आहे. त्यामुळे पिकांची नासाडी होत असून शेतकऱ्यांवर वन्य प्राणी हल्ला करीत आहेत.

हिंगोली : वन्य प्राण्यांच्या उपद्रवाने पिकांची नासाडी होत असून या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा, पिकांच्या संरक्षणासाठी तार कुंपन उपलब्ध करून द्यावे, या व इतर मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने विभागीय वन अधिकारी कार्यालयावर २१ जुलै रोजी स्वाभिमानी शेती बचाओ एल्गार मोर्चा काढण्यात आला. भर पावसात हजारो शेतकरी मोर्चात सहभागी होते. 

जिल्ह्यातील बहुतांश भागात वन्य प्राण्याचा उपद्रव वाढला आहे. त्यामुळे पिकांची नासाडी होत असून शेतकऱ्यांवर वन्य प्राणी हल्ला करीत आहेत. शेतकरी व पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना तारकुंपन, सौर उर्जा कुंपन उपलब्ध करून द्यावे, या व इतर मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रविकांत तुपकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेश पाटील गोरेगावकर, गजानन कावरखे, दामूअण्णा इंगोले, नामदेव पतंगे, गोविंद भवर आदींच्या उपस्थितीत शुक्रवारी विभागीय वन अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. दुपारी छत्रपती शिवाजी महाराज पुर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करून मोर्चास प्रारंभ झाला. हा मोर्चा इंदिरा चौक, नांदेड नाका, जिल्हाधिकारी कार्यालय मार्गे रेल्वे उड्डाणपुलावरून विभागीय वन अधिकारी कार्यालयावर धडकला. रिमझिम पावसातही हजारो शेतकरी सहभागी झाले होते. वन अधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर प्रमुख नेत्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर वन अधिकाऱ्यासोबत चर्चा करून त्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

तगडा पोलिस बंदोबस्तयावेळी पोलिस प्रशासनच्या वतीने तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रूग्ण वाहिका, अग्निशमन बंब यासह ठिकठिकाणी पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. 

तार कुंपन मिळालेच पाहिजे...मोर्चात सहभागी पदाधिकारी, शेतकऱ्यांनी पिकांच्या संरक्षणासाठी तारकुंपन मिळावे,  शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय असो आदी घोषणा सहभागी मोर्चेकऱ्यांकडून देण्यात येत होत्या.

टॅग्स :forestजंगलFarmerशेतकरीHingoliहिंगोली