शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
4
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
5
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
6
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
7
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
8
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
9
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
10
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
11
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
12
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
13
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
14
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
15
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
16
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
17
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
18
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
19
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
20
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?

'वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करा'; भर पावसात शेतकऱ्यांचा विभागीय वनअधिकारी कार्यालयावर मोर्चा

By रमेश वाबळे | Updated: July 21, 2023 18:37 IST

बहुतांश भागात वन्य प्राण्याचा उपद्रव वाढला आहे. त्यामुळे पिकांची नासाडी होत असून शेतकऱ्यांवर वन्य प्राणी हल्ला करीत आहेत.

हिंगोली : वन्य प्राण्यांच्या उपद्रवाने पिकांची नासाडी होत असून या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा, पिकांच्या संरक्षणासाठी तार कुंपन उपलब्ध करून द्यावे, या व इतर मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने विभागीय वन अधिकारी कार्यालयावर २१ जुलै रोजी स्वाभिमानी शेती बचाओ एल्गार मोर्चा काढण्यात आला. भर पावसात हजारो शेतकरी मोर्चात सहभागी होते. 

जिल्ह्यातील बहुतांश भागात वन्य प्राण्याचा उपद्रव वाढला आहे. त्यामुळे पिकांची नासाडी होत असून शेतकऱ्यांवर वन्य प्राणी हल्ला करीत आहेत. शेतकरी व पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना तारकुंपन, सौर उर्जा कुंपन उपलब्ध करून द्यावे, या व इतर मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रविकांत तुपकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेश पाटील गोरेगावकर, गजानन कावरखे, दामूअण्णा इंगोले, नामदेव पतंगे, गोविंद भवर आदींच्या उपस्थितीत शुक्रवारी विभागीय वन अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. दुपारी छत्रपती शिवाजी महाराज पुर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करून मोर्चास प्रारंभ झाला. हा मोर्चा इंदिरा चौक, नांदेड नाका, जिल्हाधिकारी कार्यालय मार्गे रेल्वे उड्डाणपुलावरून विभागीय वन अधिकारी कार्यालयावर धडकला. रिमझिम पावसातही हजारो शेतकरी सहभागी झाले होते. वन अधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर प्रमुख नेत्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर वन अधिकाऱ्यासोबत चर्चा करून त्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

तगडा पोलिस बंदोबस्तयावेळी पोलिस प्रशासनच्या वतीने तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रूग्ण वाहिका, अग्निशमन बंब यासह ठिकठिकाणी पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. 

तार कुंपन मिळालेच पाहिजे...मोर्चात सहभागी पदाधिकारी, शेतकऱ्यांनी पिकांच्या संरक्षणासाठी तारकुंपन मिळावे,  शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय असो आदी घोषणा सहभागी मोर्चेकऱ्यांकडून देण्यात येत होत्या.

टॅग्स :forestजंगलFarmerशेतकरीHingoliहिंगोली