शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

बिघाडी! ठाकरेसेनेच्या खासदार नागेश आष्टीकरांनी केली कॉँग्रेसच्या प्रज्ञा सातवांची तक्रार

By विजय पाटील | Updated: June 28, 2024 16:57 IST

हिंगोली जिल्ह्यात काँग्रेस व शिवसेना उबाठा गटात मागील काही दिवसांपासून वादाची ठिणगी पडल्याचे चित्र आहे.

हिंगोली : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून लढल्यानतंर विजयाचा मार्ग सुकर झाला होता. थोड्याबहुत असलेल्या कुरबुरी आता मात्र वादात रुपांतरित होणार असल्याचे दिसत आहे. काँग्रेसच्या आ.प्रज्ञा सातव यांनी लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीच्या विरोधात काम केल्याची तक्रार खा.नागेश आष्टीकर यांनी काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांच्याकडे केली आहे.

हिंगोली जिल्ह्यात काँग्रेस व शिवसेना उबाठा गटात मागील काही दिवसांपासून वादाची ठिणगी पडल्याचे चित्र आहे. हिंगोली लोकसभेवर काँग्रेसने दावा केला होता. मात्र काँग्रेसला ही जागा सोडवून घेता आली नाही. त्यामुळे विधान परिषदेच्या आ.प्रज्ञा सातव यांनी लोकसभा निवडणुकीत अलिप्तवादी भूमिका घेतली हेाती. त्या प्रचार कार्यात सहभागी झाल्या नव्हत्या. लोकसभा निवडणूकही झाली. इंडिया आघाडीचे आष्टीकर निवडूनही आले. आता पुन्हा सातव यांचा कळमनुरी विधानसभेवर डोळा आहे. त्या काँग्रेससाठी हा मतदारसंघ सोडण्याची मागणी करू लागल्या आहेत. तर तो न मिळाल्यास अपक्षही उभ्या राहू शकतील, अशी चर्चा रंगत आहे. त्यानंतर शिवसेना उबाठा गटाकडूनही जोरदार हालचाली सुरू झाल्या. कळमनुरीत डझनभर नेते असतानाही सक्रिय नसल्यासारखी वाटणारी शिवसेना अतिशय आक्रमकपणे पुढे येत आहे. मात्र या मार्गात सातव यांचा अडसर होवू नये, यासाठी आता खा.आष्टीकर यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू झाल्याचे दिसत आहे.

खा.आष्टीकर यांनी प्रज्ञा सातव यांच्या विरोधात थेट पक्षाच्या सरचिटणीसांकडे तक्रार केली आहे. सातव यांनी कळमनुरी विधानसभा मतदारसंघात पक्षाच्या विरोधात भूमिका घेत इंडिया आघाडीच्या विरोधात प्रचार केल्याचा आरोप केला. सातव यांनी काँग्रेस पक्षाचे निर्देश डावलून वंचित बहुजन आघाडी व महायुतीच्या उमेदवाराचे काम केले. सातव यांच्या या भूमिकेमुळे पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. शिवाय सातव यांनी आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी एकाही सार्वजनिक कार्यक्रमात सहभाग घेतला नाही. त्यामुळे या प्रकाराची चौकशी करून इंडिया आघाडीच धर्म टिकविण्यासाठी शिस्तविषयक कारवाईची मागणी केली

टॅग्स :hingoli-pcहिंगोलीShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडी