शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray : ​​​​​​​"...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी
2
अबतक २००००! हिटमॅन रोहित शर्मानं रचला इतिहास; आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये गाठला मैलाचा पल्ला
3
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सादर होतील हजारो कोटींच्या पुरवणी मागण्या; ८ डिसेंबरपासून अधिवेशनाला सुरवात
4
IND vs SA : कुलदीप KL राहुलकडे DRS चा हट्ट धरायला गेला, मग हिटमॅन रोहित 'कॅप्टन' झाला अन्... (VIDEO)
5
एलॉन मस्क यांच्या 'X' ला तब्बल १०८० कोटींचा दंड ! 'ब्लू टीक' संदर्भातील प्रकरणात बसला दणका
6
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: ‘या’ ५ गोष्टी अवश्य अर्पण करा; गणपतीची कायम कृपा मिळवा!
7
'बिनशर्त माफी मागा, अन्यथा पाच कोटींचा दावा ठोकणार' महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माजी मंत्री सुलेखा कुंभारे यांना नोटीस
8
Aaditya Thackeray : "साधुग्राम, तपोवन हवा पण भाजपाच्या बिल्डर मित्रांची दादागिरी नाही", आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
9
२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा!
10
महामानवाला अभिवादन! CM फडणवीसांनी केली सरणत्तयं प्रार्थना; PM मोदींनीही वाहिली आदरांजली
11
समस्या संपत नाहीत, पैसा राहत नाही? गणेशाचे प्रभावी स्तोत्र ११ वेळा म्हणा; अद्भूत अनुभव घ्या!
12
America Visa : सोशल मीडियावर एक चूक कराल, तर तुमच्यासाठी बंद होतील अमेरिकेचे दरवाजे! काय आहे नियम?
13
२०२५ ची शेवटची संकष्ट चतुर्थी: ५ उपाय अवश्य करा, चिंतामुक्त व्हा; बाप्पाची अपार कृपा लाभेल!
14
Video - "मी नवरदेव आहे, पण स्वतःच्या लग्नालाच..."; इंडिगोमुळे अडकले प्रवासी, मांडली व्यथा
15
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: विशेष व्रत करा; वर्षभर पुण्य-लाभ, विनायक कल्याण-मंगल करेल!
16
"आमच्या बॅगा कुठायत? घराची चावी त्यात आहे, भिकारी वाटलो का..."; मुंबई एअरपोर्टवर तुफान राडा
17
'रुपयाबद्दल जास्त काळजी करण्याची गरज नाही..,' घसरत्या चलनावर निर्मला सीतारमण काय म्हणाल्या?
18
हुमायूं कबीर यांनी मुर्शिदाबादमध्ये केली बाबरी मशिदीची पायाभरणी, भाजपा-तृणमूलचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप  
19
IND vs SA : जड्डूच्या गोलंदाजीवर फसला बावुमा! कॅच घेतल्यावर कोहलीनं अशी घेतली मजा (VIDEO)
20
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; कॅन्सरसह 'या' आजारांचा धोका, आताच बदला सवय
Daily Top 2Weekly Top 5

विश्वचषक जिंकूनही महाराष्ट्राच्या कन्येला उपेक्षा; दिव्यांग उपकर्णधार गंगा कदमला शासनाकडून 'शून्य' मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 15:30 IST

जिद्दीचा विश्वविजय, तरी उपेक्षा का? इतर राज्यांच्या खेळाडूंना बक्षिसे, पण महाराष्ट्राच्या एकमेव प्रतिनिधीला फक्त कौतुकाचे शब्द.

- विश्वास साळुंकेवारंगा फाटा (जि. हिंगोली) : भारताच्या महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकल्यानंतर बक्षिसांचा आणि अभिनंदनाचा वर्षाव झाला. मात्र, भारताच्या महिला दिव्यांग क्रिकेट संघाने विश्वचषकावर नाव कोरल्यानंतर या संघाची उपकर्णधार आणि महाराष्ट्रातील एकमेव खेळाडू असलेल्या गंगा संभाजी कदम हिच्या कामगिरीची शासन, प्रशासनाकडून उपेक्षा झाल्याची भावना निर्माण होत आहे.

कोलंबो श्रीलंका येथे पी. सारा ओव्हल मैदानावर टी-२० दिव्यांग विश्वचषक क्रिकेट स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत भारताच्या दिव्यांग महिला क्रिकेट संघाने नेपाळच्या संघावर ऐतिहासिक विजय मिळवला. उल्लेखनीय बाब म्हणजे कळमनुरी तालुक्यातील फुटाणा या गावची गंगा संभाजी कदम ही भारतीय संघाची उपकर्णधार होती. तसेच संघात असणारी ती महाराष्ट्रातील एकमेव खेळाडू होती.

कळमनुरी तालुक्यातील फुटाणा गावची ही कन्या. प्राथमिक शिक्षण फुटाण्यात पूर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी ती सोलापूरला गेली आणि तेथेच तिच्या क्रिकेट प्रवासाला सुरुवात झाली. प्रशिक्षक राजू शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली गंगाने क्रिकेटचे धडे गिरवले आणि दिव्यांग क्रिकेटमधील ती एक तेजस्वी नाव म्हणून उदयास आली.

श्रीलंकेत पार पडलेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने नेपाळचा पराभव करीत विजेतेपदावर आपली छाप उमटवली. या स्पर्धेत गंगा कदमने उपकर्णधार म्हणून महत्त्वाची भूमिका बजावत संघाला भक्कम पाठबळ दिले. तिच्या खेळाचे आणि जिद्दीचे देशभर कौतुक होत आहे.

महिला संघावर बक्षिसांचा वर्षावभारताच्या महिला संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्यांदाच विश्वचषक जिंकल्यावर त्या खेळाडूंवर कोट्यवधी रुपयांच्या बक्षिसांचा वर्षाव झाला. मात्र, दिव्यांग क्रिकेट संघात महाराष्ट्राची एकमेव प्रतिनिधी असलेल्या गंगा कदमच्या वाट्याला केवळ कौतुकाचे शब्दच आले.

इतर राज्यांनी दिली बक्षिसेभारतीय दिव्यांग महिला क्रिकेट संघातील इतर राज्यांतील खेळाडूंना त्यांच्या राज्य सरकारने आर्थिक बक्षिसे आणि नोकरीची आश्वासने दिली आहेत; परंतु महाराष्ट्र शासनाकडून किंवा अन्य कुणाकडूनही अद्याप कोणतेही आश्वासन मिळालेले नाही.- गंगा कदम, उपकर्णधार, भारतीय क्रिकेट संघ

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra's Ganga Kadam, Women's Cricket World Cup Winner, Faces Neglect

Web Summary : Despite winning the World Cup, Maharashtra's Ganga Kadam, vice-captain of the Indian women's disabled cricket team, faces government neglect. Other states rewarded players, but Kadam received nothing from Maharashtra.
टॅग्स :Hingoliहिंगोली