शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
4
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
5
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
6
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
7
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
8
World Cup FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
9
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
10
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
11
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
12
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
13
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
14
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
15
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
16
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
17
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
18
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
19
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर
20
Prabodhini Ekadashi 2025: विष्णूंची योगनिद्रा संपताच सलग २१ दिवस करा ही 'प्रभावी उपासना

Lok Sabha Election 2019 : निवडणूक कर्मचाऱ्यांचा जेवणावरून गोंधळ, ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 12:03 IST

सेनगाव तालुक्यातील साबलखेडा येथील मतदान केंद्रावर मुक्कामी मद्यधुंद कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांची हरगळ केल्यामुळे ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता.

ठळक मुद्देसेनगाव तालुक्यातील साबलखेडा येथील मतदान केंद्रावर मुक्कामी मद्यधुंद कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांची हरगळ केल्यामुळे ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला.निवडणुकीच्या कामासाठी गावात मुक्कामी असलेल्या कर्मचाऱ्यांनी 17 एप्रिलच्या रात्री जेवणाच्या कारणावरुन ग्रामस्थांना शिवीगाळ करत गोंधळ घातला. संतप्त ग्रामस्थांनी कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी करत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा प्रवित्रा घेतला होता.

गोरेगाव (जि. हिंगोली) - सेनगाव तालुक्यातील साबलखेडा येथील मतदान केंद्रावर मुक्कामी मद्यधुंद कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांची हरगळ केल्यामुळे ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर ग्रामस्थांनी निर्णय मागे घेतला आहे.

निवडणुकीच्या कामासाठी गावात मुक्कामी असलेल्या कर्मचाऱ्यांनी 17 एप्रिलच्या रात्री जेवणाच्या कारणावरुन ग्रामस्थांना शिवीगाळ करत गोंधळ घातला. या प्रकारामुळे संतप्त ग्रामस्थांनी कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी करत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा प्रवित्रा घेतला होता. सावखेडा येथे लोकसभा निवडणुकीसाठी चार शिक्षक व एक पोलीस असे एकूण पाच कर्मचारी नियुक्त केले होते. कर्मचारी 17 एप्रिल रोजी साबलखेडा येथे मुक्कामी गेले होते. गावातील रेशन दुकानदार संतोष देवराव भिसे यांनी कर्मचाऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था केली होती. वरण-भात-भाजी-पोळी असा पाच कर्मचाºयांचा डबा स्वत: नेऊन दिला होता. परंतु मद्यधुंद अवस्थेत असलेल्या तीन कर्मचाऱ्यांनी जेवणाची व्यवस्था झाले नसल्याचे पोलीस ठाण्याला कळवले होते. 

पोलिसांनी सावखेडा येथील समीर भिसे यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. सरपंच पती समीर भिसे यांनी संतोष भिसे यांना जेवणाच्या व्यवस्थेबाबत विचारले असता जेवणाचे डबे रात्री 8.30 वाजताच दिल्याचे सांगितले. तसेच आणखी काही अडचण असेल तर चक्कर करून बघतो, असे सांगितले नंतर संतोष भिसे सेवक चीनकुजी खरात, मारुती दत्तराव भिसे सह काही ग्रामस्थ विचारपूस करण्यासाठी गेले असता मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्यासह दोन शिक्षक कर्मचाऱ्यांनी दिलेल्या साध्या जेवणाबाबत नाराजी व्यक्त करीत कोंबडीच्या मटणाची भाजी आणि दारूची व्यवस्था का केली नाही? असे म्हणून नशेत तर्र असलेल्या कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांना शिवीगाळ केली. त्यानंतर 18 एप्रिल रोजी सकाळी मतदान कक्षात गेलेल्या बुथ एजंटना सुद्धा काय भाजीपाला न्यायला आले काय? तुमच्या गावाचे काय खरे नाही. असे म्हणत कर्मचाऱ्यांनी टोमणे मारले अशी माहिती समीर भिसे यांनी दिली. 

रात्री घडलेल्या सदर प्रकारामुळे सावरखेडा येथील ग्रामस्थांनी सकाळी मद्यधुंद अवस्थेत शिवीगाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई होईपर्यंत मतदान न करण्याचा पवित्रा घेत मतदानावर बहिष्कार टाकला होता. याची माहिती गोरेगाव पोलीस ठाण्याचे सपोनि सुधाकर आढे, सेनगावचे नायब तहसीलदार भोजने यांना मिळताच त्यांनी मतदान केंद्राला भेट दिली. ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला तसेच तक्रार असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यास गोरेगाव येथे पाठवून दुसऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला साबलखेडा येथे नियुक्त केले. तसेच लेखी तक्रार करा यानंतर निवडणूक आयोग कर्मचाऱ्यावर कारवाई करील असे सांगून ग्रामस्थांची समजूत काढली. त्यानंतर तब्बल सव्वा दोन तासानंतर 9.15 वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकhingoli-pcहिंगोलीPoliceपोलिसVotingमतदान