शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

Lok Sabha Election 2019 : निवडणूक कर्मचाऱ्यांचा जेवणावरून गोंधळ, ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 12:03 IST

सेनगाव तालुक्यातील साबलखेडा येथील मतदान केंद्रावर मुक्कामी मद्यधुंद कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांची हरगळ केल्यामुळे ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता.

ठळक मुद्देसेनगाव तालुक्यातील साबलखेडा येथील मतदान केंद्रावर मुक्कामी मद्यधुंद कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांची हरगळ केल्यामुळे ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला.निवडणुकीच्या कामासाठी गावात मुक्कामी असलेल्या कर्मचाऱ्यांनी 17 एप्रिलच्या रात्री जेवणाच्या कारणावरुन ग्रामस्थांना शिवीगाळ करत गोंधळ घातला. संतप्त ग्रामस्थांनी कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी करत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा प्रवित्रा घेतला होता.

गोरेगाव (जि. हिंगोली) - सेनगाव तालुक्यातील साबलखेडा येथील मतदान केंद्रावर मुक्कामी मद्यधुंद कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांची हरगळ केल्यामुळे ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर ग्रामस्थांनी निर्णय मागे घेतला आहे.

निवडणुकीच्या कामासाठी गावात मुक्कामी असलेल्या कर्मचाऱ्यांनी 17 एप्रिलच्या रात्री जेवणाच्या कारणावरुन ग्रामस्थांना शिवीगाळ करत गोंधळ घातला. या प्रकारामुळे संतप्त ग्रामस्थांनी कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी करत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा प्रवित्रा घेतला होता. सावखेडा येथे लोकसभा निवडणुकीसाठी चार शिक्षक व एक पोलीस असे एकूण पाच कर्मचारी नियुक्त केले होते. कर्मचारी 17 एप्रिल रोजी साबलखेडा येथे मुक्कामी गेले होते. गावातील रेशन दुकानदार संतोष देवराव भिसे यांनी कर्मचाऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था केली होती. वरण-भात-भाजी-पोळी असा पाच कर्मचाºयांचा डबा स्वत: नेऊन दिला होता. परंतु मद्यधुंद अवस्थेत असलेल्या तीन कर्मचाऱ्यांनी जेवणाची व्यवस्था झाले नसल्याचे पोलीस ठाण्याला कळवले होते. 

पोलिसांनी सावखेडा येथील समीर भिसे यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. सरपंच पती समीर भिसे यांनी संतोष भिसे यांना जेवणाच्या व्यवस्थेबाबत विचारले असता जेवणाचे डबे रात्री 8.30 वाजताच दिल्याचे सांगितले. तसेच आणखी काही अडचण असेल तर चक्कर करून बघतो, असे सांगितले नंतर संतोष भिसे सेवक चीनकुजी खरात, मारुती दत्तराव भिसे सह काही ग्रामस्थ विचारपूस करण्यासाठी गेले असता मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्यासह दोन शिक्षक कर्मचाऱ्यांनी दिलेल्या साध्या जेवणाबाबत नाराजी व्यक्त करीत कोंबडीच्या मटणाची भाजी आणि दारूची व्यवस्था का केली नाही? असे म्हणून नशेत तर्र असलेल्या कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांना शिवीगाळ केली. त्यानंतर 18 एप्रिल रोजी सकाळी मतदान कक्षात गेलेल्या बुथ एजंटना सुद्धा काय भाजीपाला न्यायला आले काय? तुमच्या गावाचे काय खरे नाही. असे म्हणत कर्मचाऱ्यांनी टोमणे मारले अशी माहिती समीर भिसे यांनी दिली. 

रात्री घडलेल्या सदर प्रकारामुळे सावरखेडा येथील ग्रामस्थांनी सकाळी मद्यधुंद अवस्थेत शिवीगाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई होईपर्यंत मतदान न करण्याचा पवित्रा घेत मतदानावर बहिष्कार टाकला होता. याची माहिती गोरेगाव पोलीस ठाण्याचे सपोनि सुधाकर आढे, सेनगावचे नायब तहसीलदार भोजने यांना मिळताच त्यांनी मतदान केंद्राला भेट दिली. ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला तसेच तक्रार असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यास गोरेगाव येथे पाठवून दुसऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला साबलखेडा येथे नियुक्त केले. तसेच लेखी तक्रार करा यानंतर निवडणूक आयोग कर्मचाऱ्यावर कारवाई करील असे सांगून ग्रामस्थांची समजूत काढली. त्यानंतर तब्बल सव्वा दोन तासानंतर 9.15 वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकhingoli-pcहिंगोलीPoliceपोलिसVotingमतदान