शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "अजित पवार, सगळ्यांचा नाद करायचा, पण..."; भाजपा नेते राजन पाटलांच्या मुलाचं थेट चॅलेंज
2
भारताला 'हिंदू राष्ट्र' घोषित करण्याची गरज नाही, हिंदू म्हणजे अशी व्यक्ती जी...- मोहन भागवत
3
"मुलाच्या मनात माझा आदर वाढेल"; डिनर पार्टीत ट्रम्प यांनी रोनाल्डोसोबत शेअर केला घरातला खास किस्सा
4
Mumbai Airport: मुंबई विमानतळ २० नोव्हेंबर रोजी ६ तास बंद राहणार, कारण काय?
5
अनगरात 'सही'चा खेळ! अर्ज बाद होताच उज्ज्वला थिटेंचा आरोप, 'मुलगा सोबत असूनही सही राहिलीच कशी?
6
FD-RD विसरा! सुरक्षित गुंतवणूक हवी असल्यास FMP ठरेल स्मार्ट चॅाईस, लो रिस्क हाय रिटर्नचा स्मार्ट कॅाम्बो
7
भाजपाची घराणेशाही! एकाच कुटुंबातील ६ जणांना तिकीट; पत्नी, भाऊ, वहिनी, मेहुणा... सगळेच रिंगणात
8
Mahayuti: भाजप- शिंदे गटात माजी नगरसेवक फोडण्याची स्पर्धा, निवडणुकीपूर्वी महायुतीत अंतर्गत वाद शिगेला!
9
शेअर बाजारात आजही घसरण, २५,९०० च्या खाली निफ्टी; IT Stocks मध्ये मोठी खरेदी
10
Video: "लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम..."; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा घणाघात, भाजपावर निशाणा
11
Delhi Blast: युनूस सरकारचा दावा खोटा; अटकेत असलेला इख्तियार बांगलादेशचा पर्दाफाश करणार !
12
आजचे राशीभविष्य - १९ नोव्हेंबर २०२५, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्ती इत्यादीसाठी आजचा दिवस अनुकूल
13
Politics: "मला आणि माझा मुलाला मारण्याचा कट" भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्याचा शिंदेसेनेवर गंभीर आरोप!
14
Supreme Court: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार, आरक्षणाच्या मर्यादेवर आज सुनावणी!
15
Mumbai Airport: विमानतळ परिसरातील मार्ग आजपासून २ दिवस बंद; 'या' पर्यायी मार्गाचा करा वापर!
16
CNG Supply: मुंबईकरांना मोठा दिलासा! ३ दिवसांनंतर सीएनजी पुरवठा पूर्ववत, प्रवाशांनी सोडला सुटकेचा निःश्वास
17
Farmers Relief: मुसळधार पाऊस किंवा वन्य प्राण्यांनी पीक तुडवले, नुकसान भरपाई मिळणार,  पण एक अट!
18
Mahayuti: एकमेकांचे माजी नगरसेवक, पदाधिकारी पळवण्यावरून महायुतीत घमासान! 
19
Government Decision: 'नोटरी'वर झालेले जमीन व्यवहारही आता कायदेशीर; ३ कोटी नागरिकांना मोठा दिलासा
20
एकाचवेळा तीन बिबट्यांच्या घराला घिरट्या; शिकारीच्या शोधात आलेले सीसीटीव्ही कॅमेरात कैद 
Daily Top 2Weekly Top 5

lok sabha election 2019 : मुख्य पक्षांमधून उमेदवारी निश्चित होत नसल्याने अस्थिरता कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 20:43 IST

भाजपकडून इच्छुकांना अजूनही हा मतदारसंघ श्रेष्ठी सोडवून घेतील, असे वाटत आहे.

- विजय पाटील  

हिंगोली : लोकसभा मतदारसंघातील उमेदवारच निश्चित होत नसल्याने सर्वच पक्षांना घोर लागलेला आहे. काँग्रेस व शिवसेनेत लढत होणार की एखादा पक्ष ही जागा दुसऱ्याला सोडणार, हा कळीचा मुद्दा बनला आहे. 

हिंगोली लोकसभा मतदारसंघात विद्यमान खा. राजीव सातव यांनी अजूनही त्यांच्या उमेदवारीचे पत्ते उघड केलेले नाहीत.  मध्यंतरी आ. संतोष टारफे यांनीही चाचपणी फेरी केल्याने या संभ्रमावस्थेत अधिकच भर पडली होती. दुसरीकडे शिवसेनेकडून मागच्या वेळी पराभूत झालेले सुभाष वानखेडे आता भाजपमध्ये आहेत. तर सेनेला येथे नवा चेहरा द्यावा लागणार आहे. तो निवडणेच अवघड बनले आहे. आ.जयप्रकाश मुंदडा, आ.हेमंत पाटील व आ.नागेश पाटील आष्टीकर हे तिघे इच्छुक आघाडीवर आहेत. यापैकी कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडेल, याच्या चर्चा झडत आहेत. मात्र निर्णय होताना दिसत नाही. काँग्रेस व शिवसेनेचे कार्यकर्ते यामुळे अस्वस्थ आहेत. मागच्या वेळी तब्बल २३ जण रिंगणात होते. यंदा थेट लढतीचीच चिन्हे आहेत. 

वावड्याभाजपकडून इच्छुकांना अजूनही हा मतदारसंघ श्रेष्ठी सोडवून घेतील, असे वाटत आहे. कधी भिवंडी तर कधी कुठल्या तरी मतदारसंघाचे नाव सांगून कार्यकर्त्यांना ‘जागे’ ठेवले जात आहे. दुसरीकडे शिवराज पाटील चाकूरकरांसाठी उस्मानाबाद काँग्रेस सोडवून घेणार असल्याचे सांगून हिंगोली राष्ट्रवादीला परत केला जाणार असल्याच्या नव्या वावड्यांना तोंड फुटले आहे. सूर्यकांता पाटील पुन्हा राकाँत येऊन लढणार असल्याचे सांगितले जाते. उमेदवाऱ्या जाहीर करेपर्यंत या वावड्या उठतच राहणार असल्याचे दिसते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकHingoliहिंगोलीBJPभाजपाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेस