शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

Lockdown : ...तर आता थेट गुन्हा दाखल केला जाईल; लपून-छपून दुकाने सुरू ठेवणाऱ्यांवर हिंगोलीत कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 20:16 IST

हिंगोली शहरातील दुकानचालक, भाजीपाला विक्रेते व पानटपरीचालकांना दंड

ठळक मुद्देहिंगोली जिल्ह्यात संचारबंदी लागू असली तरी ग्रामीण भागात आठवडी बाजार भरत आहेत.

हिंगोली : ‘संचारबंदी नावालाच लपून-छपून दुकाने सुरूच’ या मथळ्याखाली लोकमत ने १२ आॅगस्ट रोजी वृत्त प्रकाशित करताच महसूल व न. प. प्रशासनाच्या वतीने आता संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर धडक कारवाईचा सपाटा लावला आहे. पथकामार्फत शहरात  १३ आॅगस्ट रोजी दुकाने सुरू ठेवणाऱ्या ११ जणांवर कारवाई करून एकूण ११ हजार ५०० रूपये दंड वसूल केला.

हिंगोली जिल्ह्यात संचारबंदी लागू असली तरी ग्रामीण भागात आठवडी बाजार भरत आहेत. शिवाय  हिंगोली शहरातही विविध ठिकाणी किराणा दुकान, शूजसेंटर, हॉटेल, झेरॉक्स मशिन, फळ व भाजीपाले विक्रेतेही लपून-छपून दुकाने सुरू ठेवित आहेत. या दुकानचालकांवर आता पथकाद्वारे धडक कारवाई करण्यात येत आहे. गुरूवारी पथकातर्फे कारवाई सुरू असल्याचे पाहून काही मास विक्रेत्यांनी दुकाने बंद करून धूम ठोकली. तसेच शहरात विनामास्क फिरणाऱ्यांनाही दंड ठोठावण्यात आला अशी माहिती पथकप्रमुख डी. पी. शिंदे यांनी दिली.

हिंगोली जिल्ह्यात कोरोना संसर्ग टाळता यावा म्हणून जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी ६ ते १९ आॅगस्ट या कालावधीत कडक संचारबंदीचे आदेश काढले आहेत़ परंतु संचारबंदी काळातही हिंगोली शहरात तसेच ग्रामीण भागातही नागरिकांची गर्दी होत असून लपून-छपून दुकाने सुरू ठेवली जात आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आता विशेष मोहीम हाती घेतली आहे़ संचारबंदीतही वारंवार दुकाने सुरू ठेवली जात असल्यामुळे पथकातर्फे दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे़ यापूर्वीही भाजी विक्रेते, किराणा दुकान चालक, पानटपरीधारक यासह इतर व्यवसायिकावरही टिम ने कारवाई केली होती़ परंतु वेळोवळी सूचना देवूनही नियमांचे उल्लंघन केले जात आहे.

त्यामुळे आता प्रथम दंडात्मक कारवाई केली जात असून त्यानंतर थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे़ हिंगोली शहरात मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात येत आहे. १३ आॅगस्ट रोजी पथकातील तहसीलदार गजानन शिंदे, उपमुख्याधिकारी उमेश हेंबाडे, टीम ११ चे पथक प्रमुख डी़पी़शिंदे, सहायक पंडीत मस्के, शिवाजी घुगे, गजानन आठवले, नितीन पहिणकर, संदीप घुगे, गजानन बांगर, कैलास थिट्टे आदींनी कारवाई केली.

... तर आता थेट  गुन्हा दाखल केला जाईलहिंगोली शहरातील दुकान चालकांनी लॉकडाऊन काळात जिल्हा प्रशासनाच्या नियमाचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे़ अन्यथा संबंधिताविरूध्द दंडात्मक व फौजदारी कारवाईचा इशारा ऩप़मुख्याधिकारी डॉ़ अजय कुरवाडे यांनी दिला. त्यामुळे संचारबंदी नियमांचे प्रत्येकांनी पालन करावे व प्रशासनास सहकार्य करावे असेही ते म्हणाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHingoliहिंगोलीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस