शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचं टार्गेट किलिंग! ५ मिलियन डॉलरचे इनाम असलेला टॉप कमांडर बेरूतमध्ये हवाई हल्ल्यात उडवला
2
शेख हसीनांच्या प्रत्यार्पणासाठी बांगलादेशची भारताला थेट मागणी; फाशीच्या शिक्षेमुळे वाढले टेन्शन!
3
Wing Commander Namansh Syal :'भारत माता की जय'च्या घोषणा, हजारो नागरिकांच्या उपस्थितीत वीरपत्नीचा 'तो' अखेरचा सॅल्यूट...
4
India ODI Squad vs SA: भारतीय वनडे संघाची घोषणा! KL राहुल कॅप्टन; ऋतुराजलाही मिळाली संधी
5
Travel : भारतातील ५ सुंदर गावं, जिथे फिरायला जाल तर इटली अन् पॅरिसही विसराल! पाहा कुठे आहेत...
6
अल-फलाह डॉक्टरांच्या अटकेनंतर सर्च ऑपरेशन सुरू; मशिदीतून संशयास्पद पावडरसह विदेशी दारूही जप्त!
7
“स्वामी समर्थांनी सांगितले, आळशी माणसाचे तोंड पाहू नका”; शिंदेंचा नाव न घेता ठाकरेंना टोला
8
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ११ दिवस सेवा करा, नक्की फल मिळेल; काळजी सोडा, स्वामी शुभच करतील!
9
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
10
बिबट्या पुण्याच्या वेशीवर; पहाटे पहाटे औंधमध्ये  बिबट्याचे दर्शन; पुणे शहरात खळबळ, वनविभाग आणि RESQ सतर्क
11
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
12
IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
13
६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
14
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
15
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
16
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
17
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
18
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
19
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
20
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
Daily Top 2Weekly Top 5

सुका मेवा खरेदीस ग्राहकांतून अल्प प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 00:34 IST

थंडीची चाहूल लागताच घरो-घरी डिंकाचे लाडू तयार करण्यात महिला व्यस्त असतात. सुकामेवा बाजारात दाखल झाला असला तरी, मात्र कडाक्याची थंडी नाही. त्यामुळे सुकामेवा खरेदीसाठी ग्राहकांतून अल्पप्रतिसाद मिळत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : थंडीची चाहूल लागताच घरो-घरी डिंकाचे लाडू तयार करण्यात महिला व्यस्त असतात. सुकामेवा बाजारात दाखल झाला असला तरी, मात्र कडाक्याची थंडी नाही. त्यामुळे सुकामेवा खरेदीसाठी ग्राहकांतून अल्पप्रतिसाद मिळत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.हिवाळ्यात पौष्टिक आहार म्हणून सुकामेव्याला मोठी मागणी असते. हिंगोली शहरात सुकामेव्याची ठिक-ठिकाणी दुकाने थाटली आहेत. परंतु यंदा कडाक्याची थंडी अजूनही पडली नाही. त्यामुळे यावर्षी नोव्हेंबर महिन्याची पंधरा तारीख उलटली असली तरी ग्राहकांची सुकामेवा खरेदीसाठी मोठी गर्दी नाही. शहरासह ग्रामीण भागातून अल्पप्रतिसाद मिळत असल्याचे सुकामेवा विक्रेत्यांतून सांगण्यात आले. जस-जशी थंडी वाढत जाईल तशी ग्राहकांची गर्दी वाढेल. परंतु मागील दोन दिवसांपासून बाजारात सुकामेवा खरेदीसाठी तुरळक गर्दी होताना दिसून येत आहे. डिंकाचे तयार लाडूंना दिवसेंदिवस मागणी वाढत आहे. हिवाळा म्हटला की, सकस आहार, डिकांचे लाडू व सुकामेवा तसेच व्यायामाकडे तरूणाईचा कल असतो.सुकामेवा गिरण्यांवरही गर्दी नाही..हिंगोली शहरातील आरामशिन परिसरात सुकामेवा बारीक करण्यासाठी गिरणीवर हिवाळ्यात मोठी गर्दी होते. परंतु यंदा थंडी कमी पडल्याने मात्र सुकामेवा बारीक करून घेण्यासाठी गर्दी नसल्याचे गिरणीचालक मिराबाई गव्हाणकर यांनी सांगितले. दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात कडाक्याची थंडी असते. त्यामुळे सुकामेवा बारीक करून घेण्यासाठी गिरणीवर गर्दी होते. यंदा मात्र अल्पप्रतिसाद आहे.शहरासह ग्रामीण भागातून गिरणीवर गर्दी होते. दहा रूपये प्रतिकिलोग्रॅमने सुकामेवा दळून दिला जातो. परंतु यंदा थंडीच नसल्याने दिवसांतून चार ते पाच ग्राहक येत आहेत, असे गिरणीचालक गणेश गव्हाणकर यांनी सांगितले. थंडी वाढल्यानंतर मात्र शहरासह ग्रामीण भागातील ग्राहकांची गिरणीवर गर्दी होईल, अशी अपेक्षा गव्हाणकर यांनी व्यक्त केली.हिंगोली येथील बाजारात सुकामेवा दाखल झाला आहे. बदाम ७६० ते ८०० रूपये किलो दराने विक्री होत आहे. तसेच काजू ९०० ते १ हजार रूपये किलो, खोबरा १६० तर राजापुरी खोबरा २०० रूपये किलो, चाराची गोडंबी १ हजार रूपये किलो, बिबाची गोडंबी ५०० ते ५५० रूपये किलो, अमरावती व बलीया साखर ६० रूपये किलो, अंजीर १२०० रूपये किलो, जरदाळु ८०० ते १ हजार रूपये, तूप ५०० ते ६०० रूपये किलो दराने विक्री होत आहे. परंतु यंदा कडाक्याची थंडी नसल्याने ग्राहकांतून अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे सुकामेवा विक्रेते नितीन अग्रवाल यांनी सांगितले. ग्रामीण भगातूनही तुरळक गर्दी आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीMarket Yardमार्केट यार्ड