शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
2
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
3
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
4
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
5
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
6
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
7
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
8
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
9
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
10
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
11
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
12
तुळजाभवानी मंदिरात देणगी दर्शन पासच्या शुल्कात दुप्पट वाढ, मात्र अभिषेकाची संख्या वाढवली
13
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
14
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
15
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
16
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
17
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
18
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
19
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
20
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...

सुका मेवा खरेदीस ग्राहकांतून अल्प प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 00:34 IST

थंडीची चाहूल लागताच घरो-घरी डिंकाचे लाडू तयार करण्यात महिला व्यस्त असतात. सुकामेवा बाजारात दाखल झाला असला तरी, मात्र कडाक्याची थंडी नाही. त्यामुळे सुकामेवा खरेदीसाठी ग्राहकांतून अल्पप्रतिसाद मिळत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : थंडीची चाहूल लागताच घरो-घरी डिंकाचे लाडू तयार करण्यात महिला व्यस्त असतात. सुकामेवा बाजारात दाखल झाला असला तरी, मात्र कडाक्याची थंडी नाही. त्यामुळे सुकामेवा खरेदीसाठी ग्राहकांतून अल्पप्रतिसाद मिळत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.हिवाळ्यात पौष्टिक आहार म्हणून सुकामेव्याला मोठी मागणी असते. हिंगोली शहरात सुकामेव्याची ठिक-ठिकाणी दुकाने थाटली आहेत. परंतु यंदा कडाक्याची थंडी अजूनही पडली नाही. त्यामुळे यावर्षी नोव्हेंबर महिन्याची पंधरा तारीख उलटली असली तरी ग्राहकांची सुकामेवा खरेदीसाठी मोठी गर्दी नाही. शहरासह ग्रामीण भागातून अल्पप्रतिसाद मिळत असल्याचे सुकामेवा विक्रेत्यांतून सांगण्यात आले. जस-जशी थंडी वाढत जाईल तशी ग्राहकांची गर्दी वाढेल. परंतु मागील दोन दिवसांपासून बाजारात सुकामेवा खरेदीसाठी तुरळक गर्दी होताना दिसून येत आहे. डिंकाचे तयार लाडूंना दिवसेंदिवस मागणी वाढत आहे. हिवाळा म्हटला की, सकस आहार, डिकांचे लाडू व सुकामेवा तसेच व्यायामाकडे तरूणाईचा कल असतो.सुकामेवा गिरण्यांवरही गर्दी नाही..हिंगोली शहरातील आरामशिन परिसरात सुकामेवा बारीक करण्यासाठी गिरणीवर हिवाळ्यात मोठी गर्दी होते. परंतु यंदा थंडी कमी पडल्याने मात्र सुकामेवा बारीक करून घेण्यासाठी गर्दी नसल्याचे गिरणीचालक मिराबाई गव्हाणकर यांनी सांगितले. दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात कडाक्याची थंडी असते. त्यामुळे सुकामेवा बारीक करून घेण्यासाठी गिरणीवर गर्दी होते. यंदा मात्र अल्पप्रतिसाद आहे.शहरासह ग्रामीण भागातून गिरणीवर गर्दी होते. दहा रूपये प्रतिकिलोग्रॅमने सुकामेवा दळून दिला जातो. परंतु यंदा थंडीच नसल्याने दिवसांतून चार ते पाच ग्राहक येत आहेत, असे गिरणीचालक गणेश गव्हाणकर यांनी सांगितले. थंडी वाढल्यानंतर मात्र शहरासह ग्रामीण भागातील ग्राहकांची गिरणीवर गर्दी होईल, अशी अपेक्षा गव्हाणकर यांनी व्यक्त केली.हिंगोली येथील बाजारात सुकामेवा दाखल झाला आहे. बदाम ७६० ते ८०० रूपये किलो दराने विक्री होत आहे. तसेच काजू ९०० ते १ हजार रूपये किलो, खोबरा १६० तर राजापुरी खोबरा २०० रूपये किलो, चाराची गोडंबी १ हजार रूपये किलो, बिबाची गोडंबी ५०० ते ५५० रूपये किलो, अमरावती व बलीया साखर ६० रूपये किलो, अंजीर १२०० रूपये किलो, जरदाळु ८०० ते १ हजार रूपये, तूप ५०० ते ६०० रूपये किलो दराने विक्री होत आहे. परंतु यंदा कडाक्याची थंडी नसल्याने ग्राहकांतून अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे सुकामेवा विक्रेते नितीन अग्रवाल यांनी सांगितले. ग्रामीण भगातूनही तुरळक गर्दी आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीMarket Yardमार्केट यार्ड