शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

सुका मेवा खरेदीस ग्राहकांतून अल्प प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 00:34 IST

थंडीची चाहूल लागताच घरो-घरी डिंकाचे लाडू तयार करण्यात महिला व्यस्त असतात. सुकामेवा बाजारात दाखल झाला असला तरी, मात्र कडाक्याची थंडी नाही. त्यामुळे सुकामेवा खरेदीसाठी ग्राहकांतून अल्पप्रतिसाद मिळत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : थंडीची चाहूल लागताच घरो-घरी डिंकाचे लाडू तयार करण्यात महिला व्यस्त असतात. सुकामेवा बाजारात दाखल झाला असला तरी, मात्र कडाक्याची थंडी नाही. त्यामुळे सुकामेवा खरेदीसाठी ग्राहकांतून अल्पप्रतिसाद मिळत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.हिवाळ्यात पौष्टिक आहार म्हणून सुकामेव्याला मोठी मागणी असते. हिंगोली शहरात सुकामेव्याची ठिक-ठिकाणी दुकाने थाटली आहेत. परंतु यंदा कडाक्याची थंडी अजूनही पडली नाही. त्यामुळे यावर्षी नोव्हेंबर महिन्याची पंधरा तारीख उलटली असली तरी ग्राहकांची सुकामेवा खरेदीसाठी मोठी गर्दी नाही. शहरासह ग्रामीण भागातून अल्पप्रतिसाद मिळत असल्याचे सुकामेवा विक्रेत्यांतून सांगण्यात आले. जस-जशी थंडी वाढत जाईल तशी ग्राहकांची गर्दी वाढेल. परंतु मागील दोन दिवसांपासून बाजारात सुकामेवा खरेदीसाठी तुरळक गर्दी होताना दिसून येत आहे. डिंकाचे तयार लाडूंना दिवसेंदिवस मागणी वाढत आहे. हिवाळा म्हटला की, सकस आहार, डिकांचे लाडू व सुकामेवा तसेच व्यायामाकडे तरूणाईचा कल असतो.सुकामेवा गिरण्यांवरही गर्दी नाही..हिंगोली शहरातील आरामशिन परिसरात सुकामेवा बारीक करण्यासाठी गिरणीवर हिवाळ्यात मोठी गर्दी होते. परंतु यंदा थंडी कमी पडल्याने मात्र सुकामेवा बारीक करून घेण्यासाठी गर्दी नसल्याचे गिरणीचालक मिराबाई गव्हाणकर यांनी सांगितले. दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात कडाक्याची थंडी असते. त्यामुळे सुकामेवा बारीक करून घेण्यासाठी गिरणीवर गर्दी होते. यंदा मात्र अल्पप्रतिसाद आहे.शहरासह ग्रामीण भागातून गिरणीवर गर्दी होते. दहा रूपये प्रतिकिलोग्रॅमने सुकामेवा दळून दिला जातो. परंतु यंदा थंडीच नसल्याने दिवसांतून चार ते पाच ग्राहक येत आहेत, असे गिरणीचालक गणेश गव्हाणकर यांनी सांगितले. थंडी वाढल्यानंतर मात्र शहरासह ग्रामीण भागातील ग्राहकांची गिरणीवर गर्दी होईल, अशी अपेक्षा गव्हाणकर यांनी व्यक्त केली.हिंगोली येथील बाजारात सुकामेवा दाखल झाला आहे. बदाम ७६० ते ८०० रूपये किलो दराने विक्री होत आहे. तसेच काजू ९०० ते १ हजार रूपये किलो, खोबरा १६० तर राजापुरी खोबरा २०० रूपये किलो, चाराची गोडंबी १ हजार रूपये किलो, बिबाची गोडंबी ५०० ते ५५० रूपये किलो, अमरावती व बलीया साखर ६० रूपये किलो, अंजीर १२०० रूपये किलो, जरदाळु ८०० ते १ हजार रूपये, तूप ५०० ते ६०० रूपये किलो दराने विक्री होत आहे. परंतु यंदा कडाक्याची थंडी नसल्याने ग्राहकांतून अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे सुकामेवा विक्रेते नितीन अग्रवाल यांनी सांगितले. ग्रामीण भगातूनही तुरळक गर्दी आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीMarket Yardमार्केट यार्ड