शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

भाषिक संकोच अन् विरोध वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 00:16 IST

ज्याची सत्ता त्याची भाषा, जनमानसात रुजविण्याची परंपरा भारतात पुर्वापार चालत आली. म्हणूनच मराठी भाषा देशाच्या ७५ टक्के भागात पोहोचली होती. परंतु भाषावार प्रांतरचनेनंतर भाषिक संकोच वाढला आणि त्याचे रुपांतर भाषिक विरोधात झाले. आता त्याने उग्ररुप धारण केले आहे. असे प्रतिपादन मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : ज्याची सत्ता त्याची भाषा, जनमानसात रुजविण्याची परंपरा भारतात पुर्वापार चालत आली. म्हणूनच मराठी भाषा देशाच्या ७५ टक्के भागात पोहोचली होती. परंतु भाषावार प्रांतरचनेनंतर भाषिक संकोच वाढला आणि त्याचे रुपांतर भाषिक विरोधात झाले. आता त्याने उग्ररुप धारण केले आहे. असे प्रतिपादन मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी केले आहे.उच्च व तंत्रशिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, हिंगोली यांच्यामार्फत येथील नगर परिषदेच्या कल्याण मंडपम् येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘हिंगोली ग्रंथोत्सव-२०१८’च्या उद्घाटनाप्रसंगी उद्घाटक म्हणून कौतिकराव ठाले पाटील बोलत होते. या उद्घाटन सत्राचे अध्यक्ष जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी होते. तर प्रमुख पाहूणे म्हणून मराठवाडा साहित्य परिषदेचे सदस्य तथा नियोजित मराठवाडा साहित्य समेल्लनांचे अध्यक्ष, समिक्षक प्रा. डॉ. ऋषिकेश कांबळे, सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनील हुसे, जिल्हा ग्रंथालय संघ हिंगोलीचे अध्यक्ष खंडेराव सरनाईक, प्रा. विलास वैद्य, अशोक अधार्पुरकर, कुंडलिकराव अतकरे आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी मिलींद सोनकांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी ठाले पाटील पुढे म्हणाले की, मातृभाषेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. मराठवाड्यामध्ये निजामाचे सत्ता असल्यामुळे भाषिक मागासलेपण व शैक्षणिक मागासलेपण कायम राहिले. त्यामुळेच मराठवाड्यात वाचन संस्कृती म्हणावी त्या प्रमाणात रुजली नाही. हिंगोली जिल्ह्यात सांस्कृतिक वातावरण निर्मितीसाठी विशेष परिश्रम करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी म्हणाले की, वाचनसंस्कृती वाढावी यासाठी शासनाने सुरु केलेला ग्रंथोत्सव हा उपक्रम स्तुत्य आहे. युवा पिढीमध्ये वाचनाची आवड निर्माण करुन समाजात वाचन संस्कृती रुजविण्यासाठी व ती टिकून राहण्यासाठी ग्रंथोत्सवासारखे उपक्रम अतिशय महत्त्वाचे आहेत. प्रा. डॉ. ऋषिकेश कांबळे, विलास वैद्य यांची समोयोचित भाषणे झाली. प्रास्ताविक सहाय्यक संचालक सुनील हुसे यांनी केले. प्रारंभी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या हस्ते ग्रंथोत्सवानिमित्त आयोजित ग्रंथ विक्री व प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी साहित्यिक, वाचनप्रेमी, नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सूत्रसंचालन अश्विनी आसेगावकर यांनी केले. तर जिल्हा ग्रंथालय अधिकारी मिलींद सोनकांबळे यांनी आभार मानले.पुर्वीच्या शिक्षकांमध्ये परोपकाराचा संस्कार करण्याची मानसिकता होती. त्यांच्यात जात दडली नव्हती. परंतु सध्याचे सामाजिक पर्यावरण फार दूषित झाले आहे. आता नजरेतून जात दिसत नाही; परंतु वर्तनातून मात्र जात स्पष्ट दिसते. यावर एकच उतारा असून ग्रंथच माणसाच्या वर्तणुकीच्या उत्क्रांतीसाठी प्रेरक ठरू शकतात. माणुुसकीच्या वर्तनाचा, वागणुकीचा पुन्हा पुन्हा ग्रंथच विचार करायला लावतात. नव्या संवेदना व स्वाभिमानाच्या जाणिवा ग्रंथ देतात. त्यामुळे ग्रंथ माणुसकीसाठी वरदान ठरतात, असे उत्सव माणुसकीसाठी पुन्हा-पुन्हा भरले पाहिजेत.हिंगोली ग्रंथोत्सवाची सुरुवात सकाळी ग्रंथ दिंडीने झाली. अप्पर जिल्हाधिकरी जगदिश मिनियार यांच्या हस्ते ग्रंथ दिंडी शुभारंभ झाला. जि.प.बहुविध प्रशाला ते कल्याण मंडपम्पर्यंत दिंडी काढली. विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी या ग्रंथ दिंडीमध्ये सहभाग घेतला होता.

टॅग्स :HingoliहिंगोलीSocialसामाजिक