शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

हिंगोलीत व्यवस्थापनाचा प्रतिसाद नसल्याने राष्ट्रवादीचा युवासंवाद बारगळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 14:25 IST

आदर्श महाविद्यालयात युवासंवाद कार्यक्रमासाठी खा.अमोल कोल्हे गेली अन् तेथे त्यांना साधा सेवकही भेटला नाही.

ठळक मुद्देकोल्हे यांनी तेथून बाहेर पडण्यातच धन्यता मानली.

हिंगोली  :  विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर राष्ट्रवादी काँग्रेसने काढलेल्या शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने युवकांशी संवाद साधण्यात येत आहे. मात्र हिंगोली येथे आदर्श महाविद्यालयात आयोजित या कार्यक्रमास व्यवस्थापनाने प्रतिसाद न दिल्याने हा कार्यक्रमच बारगळला.

हिंगोलीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यकर्ते कमी अन् नेतेच जास्त अशी परिस्थिती आहे. याचा परिणाम नव्याने पक्षात दाखल झालेल्यांवरही अल्पावधीतच होतो. प्रत्येकजण नेत्याच्या तोऱ्यातच वावरतो. २१ रोजी रात्री हिंगोली मुक्कामी आलेल्या राकाँ नेत्यांनी २२ रोजी सकाळीच पक्षातील मंडळींची झाडाझडती घेतली. नेते अजित पवार यांनी राकाँ नगरसेवकांतील कुरबुरीची आपल्या खास शैलीत विचारणा केली. त्यावरून जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण व आ.रामराव वडकुते यांच्यातच जुंपली होती. मात्र पवारांनी दोघांचीही बोलती बंद करीत यापेक्षा संघटना बळकट करण्यासाठी काम करण्याचा सल्ला दिला.

विशेष म्हणजे अशा नगरसेवकांची नाराजी असेल तर ती दूर करण्यासाठी बोलावणे पाठवण्यास सांगूनही तसे काही कोणी प्रयत्न केले की नाही, हे कळाले नाही. यापैकी कोणीच तेथे हजर झाला नाही. त्यानंतर युवासंवाद कार्यक्रमाचे नियोजनच नसल्याने कधी विश्रामगृह तर कधी एखाद्या महाविद्यालयात हा कार्यक्रम घेण्यात येईल, असे सांगितले जात होते. शेवटी आदर्श महाविद्यालयात युवासंवाद कार्यक्रमासाठी खा.अमोल कोल्हे गेली अन् तेथे त्यांना साधा सेवकही भेटला नाही. प्राचार्यांच्या केबिनलाही कुलूपच होते. त्यामुळे या महाविद्यालयाला कोणी कळविले होते की नाही, असा प्रश्न होता. कोल्हे यांनी तेथून बाहेर पडण्यातच धन्यता मानली.

हिंगोली विधानसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्याची मागणी केली जात आहे. मात्र येथेही काँग्रेसप्रमाणेच गट-तटांचे राजकारण फोफावत आहे. मग येथून काँग्रेस लढली काय अन् राष्ट्रवादी, फायदा होईल असे गणित मांडायचे कसे?

टॅग्स :HingoliहिंगोलीNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवार