शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
2
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
3
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
4
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
6
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
7
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
8
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
9
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
10
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
11
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
12
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
13
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
14
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
15
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
16
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
17
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
18
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
19
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
20
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग

हिंगोलीची जीवनवाहिनी असलेली कयाधू नदी कचरा व सांडपाण्यामुळे बनलीय गटारगंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 11:48 IST

हिंगोली शहरानजीकच या नदीचे पात्र कचरा व गाळामुळे उथळ होत चालले आहे.

ठळक मुद्देतालुक्याचीच नव्हे, तर अर्ध्या जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेल्या कयाधू नदी सध्या मरणयातना भोगत आहे. या नदीवर मायनर बॅरेजेस होणार असले तरीही ते होईपर्यंत असेच बेहाल राहण्याची चिन्हे आहेत.

हिंगोली : तालुक्याचीच नव्हे, तर अर्ध्या जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेल्या कयाधू नदी सध्या मरणयातना भोगत आहे. हिंगोली शहरानजीकच या नदीचे पात्र कचरा व गाळामुळे उथळ होत चालले आहे. या नदीवर मायनर बॅरेजेस होणार असले तरीही ते होईपर्यंत असेच बेहाल राहण्याची चिन्हे आहेत.

हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव, हिंगोली व कळमनुरी या तीन तालुक्यांतून कयाधू वाहते. या नदीच्या पाणलोट क्षेत्रातील पाणी पावसाळ्यात आले तसे वाहून जाते. या नदीवर एक-दोन कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे आहेत. मात्र डोंगरगाव पूल येथे तेवढे पाणी साठलेले दिसते. इतर बंधाºयांचा फारसा उपयोग पाणी साठविण्यास किंवा शेतीसाठीही होत नाही. हिंगोलीनजीक तर ही नदी म्हणजे कोरडे पात्रच असते. हिंगोली शहरातील सांडपाण्यामुळे मात्र जणू नाल्यासारखी ती वाहती असल्याचे चित्र दिसून येते. मात्र शहरानजीकच्या भागात या नदीचे पात्र उथळ होत चालले आहे. 

कधीकाळी या भागातून आम्ही गाढवावरून वाळू वाहतूक करायचे, असे जुने जाणकार अनेक जण  सांगतात. सध्या मात्र येथे माती व प्लास्टिकयुक्त कचरा साठल्याने पात्रात बेट तयार झाले आहेत. त्यावर हिरवळ दाटत आहे. त्यामुळे नदीला पूर आला तरीही हा गाळ वाहून जात नसल्याचे चित्र आहे. यावर काही प्रमाणात गुरांची गुजराण होत असली तरीही त्यामुळे नदी मात्र मृतप्राय झाल्यात जमा झाली आहे. आ.तान्हाजी मुटकुळे यांनी अनुशेषाचा मुद्दा निकाली लावल्यात जमा आहे. मात्र एकदा मिनी बॅरेजेस झाले तरीही हिंगोली शहरानजीकच्या घाट विकासाचा कार्यक्रमही हाती घ्यावा लागणार आहे. लोकसहभागातून तरी हा गाळ काढणे गरजेचे आहे.

शहरवासियांसह पालिकेने पुढाकार घ्यावाहिंगोलीनजीक कयाधूच्या पात्रातील गाळ काढण्याचे काम करून त्यात सांडपाणी जाणार नाही, याची काळजी घेतली जाणे गरजेचे आहे. शिवाय या नदीपात्रातील गाळ काढून घेतल्यास निदान पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात वनराई बंधा-यासारखी व्यवस्था केली तरीही चांगला पाणीसाठा होणे शक्य आहे. त्याचा शहर परिसरातील पाणीपातळीसह आजूबाजूच्या शेतक-यांनाही चांगला फायदा होऊ शकतो. तर पात्रातून दूषित पाण्याची दुर्गंधी येण्याची समस्याही दूर होणार आहे.

टॅग्स :riverनदी