शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

१९ मंडळांमध्ये अतिवृष्टी; कळमनुरी, वसमतला पाच दिवसात दुसऱ्यांदा अतिवृष्टीचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2022 15:56 IST

रिपरिप सुरूच, सलग सहाव्या दिवशी जनजीवन विस्कळीत

हिंगोली : जिल्ह्यातील वसमत व कळमनुरी तालुक्याला पाच दिवसात दुसऱ्यांदा अतिवृष्टीचा फटका बसला असून यावेळी औंढा तालुक्यातही अतिवृष्टी झाली. जिल्ह्यातील एकूण ३० पैकी १९ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. तर पुलावरून पाणी वाहत असल्याने २० ते २५ गावांचा संपर्क तुटला आहे.

हिंगोली जिल्ह्यात मागील सहा दिवसांतच मान्सूनमधील एकूण सरासरीच्या ५० टक्के पर्जन्यमान झाले आहे. सुरुवातीला पाऊस पडत नसल्याने पेरण्या लांबल्या होत्या. आता पाऊस थांबायला तयार नाही. बुधवारी सकाळी ८ वाजेपूर्वीच्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ८४.९० मिमी पावसाची नोंद झाली आहे. यात सर्वाधिक १३२.६० मिमी पर्जन्य एकट्या कळमनुरी तालुक्यात झाले. हिंगोली ६१.४० मिमी, वसमत ९९.५० मिमी, औंढा ७४.५० मिमी, सेनगाव ५४.४० मिमी अशी नोंद झाली आहे. जिल्ह्यात एकूण ४०९ मिमी पर्जन्य आतापर्यंत झाले. मान्सूनमधील सरासरीच्या ५१.५१ टक्के, तर ऑक्टोबरपर्यंतच्या सरासरीच्या ४७.६६ टक्के एवढे पर्जन्यमान झाले आहे.

मंडळनिहाय पर्जन्यमानमंडळनिहाय हिंगोली ५६.८ मिमी, नर्सी नामदेव ५३.३, सिरसम १०७.३, बासंबा ५४.१, डिग्रस कऱ्हाळे ५७.८, माळहिवरा ४७.३, खांबाळा ५३.३, कळमनुरी ७८.८, वाकोडी ९२.३, नांदापूर ७९.५, आखाडा बाळापूर २१०.५, डोंगरकडा १२४, वारंगा फाटा २१०.५, वसमत ११०.८, आंबा ९७.८, हयातनगर १२५.३, गिरगाव ९६.८, हट्टा ७९.८, टेंभूर्णी ९२.५, कुरुंदा ९३.८, औंढा ७३.३, येहळेगाव ७२, साळणा ७३.३, जवळा बाजार ७९.५, सेनगाव ५६.५, गोरेगाव ५१.३, आजेगाव ५५.३, साखरा ४७.३, पानकनेरगाव ४०.३ तर हत्ता मंडळात ७५.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. ६५ मिमीपेक्षा जास्त पाऊस ३० पैकी १९ मंडळांत झाला आहे.

 

टॅग्स :RainपाऊसHingoliहिंगोली