शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
3
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
4
"रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?" मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
5
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
6
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
7
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
8
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
10
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती
11
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
12
25 वर्षांच्या प्रियकराकडून 36 वर्षीय प्रेयसीची हत्या; दोन दिवसांनंतर हॉटेलमध्ये सापडला मृतदेह
13
आपल्याच कंपनीत अधिकाऱ्यांपेक्षाही कमी सॅलरी घेतात गौतम अदानी, पाहा किती आहे त्यांचं वेतन?
14
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
15
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
16
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
17
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
18
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
19
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
20
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!

ज्येष्ठ म्हणून नुसताच मान; साधी पाण्याचीही सोय नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:30 IST

हिंगोली : जिल्हा सामान्य रुग्णालयातील डीईआयसी विभागात आरोग्य कर्मचारी, तसेच ज्येष्ठांना लस दिली जाते. परंतु, या ठिकाणी साधी ...

हिंगोली : जिल्हा सामान्य रुग्णालयातील डीईआयसी विभागात आरोग्य कर्मचारी, तसेच ज्येष्ठांना लस दिली जाते. परंतु, या ठिकाणी साधी पाण्याची व्यवस्थाही नसल्यामुळे प्रखर उन्हात ज्येष्ठांना ताटकळत रांगेत उभे राहावे लागते.

जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण प्रत्येक दिवसाला वाढत आहेत. त्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण पसरले आहे. १ एप्रिलपासून ज्येष्ठांना लस देण्याची मोहीम शासनाने आखली आहे. त्याप्रमाणे ज्येष्ठ मंडळी नित्यनेमाने लसीकरण करून घेत आहेत. परंतु, त्यांना रांगेत उभे राहण्याची वेळ आली आहे.

उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने ज्येष्ठ मंडळी सकाळी-सकाळी लसीकरण करून घेत आहेत. डीईआयसी विभागात पाण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी ज्येष्ठांनी केली. परंतु, अद्यापही जिल्हा रुग्णालयाने पाण्याची व्यवस्था काही केली नाही. ज्येष्ठांना घरूनच पाणी सोबत आणावे लागत आहे. लसीकरण विभागात बाकडे आहेत; पण तेही दोनच आहेत. त्यामुळे काही ज्येष्ठांना कोपऱ्यात बसण्याची वेळ येते.

उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढल्याने तहानेने जीव व्याकूळ होत आहे. लसीकरणासाठी रांगेत उभे राहावे लागत असल्यामुळे बाहेर जाऊन पाणी आणणे शक्य होत नाही. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील संबंधित विभागाने लसीकरणाच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय करणे गरजेचे आहे.

आरटीपीसीआर आणि अँटिजन जागा बदलावी

जिल्हा रुग्णालयातील डीईआयसी विभागात लसीकरण होते. याच बाजूला अँटिजन व आरटीपीसीआर चाचण्या होत आहेत. या चाचणीसाठी आलेले रुग्ण लसीकरण विभागात भेटायला येत आहेत. खरे पाहिले तर लसीकरण विभाग हा स्वतंत्र असायला हवा. परंतु, अजून तरी तज्ज्ञ डॉक्टर मंडळींच्या लक्षात हे कसे आले नाही? हाच मोठा यक्ष प्रश्न आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आरटीपीसीआर आणि अँटिजन तपासणी या दुसऱ्या ठिकाणी व्हायला पाहिजे, तशा सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत. परंतु, अद्यापही याचा विचार केला नाही.