शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
5
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
6
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
7
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
8
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
9
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
10
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
11
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
12
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
13
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
14
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
16
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
17
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
18
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
19
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
20
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!

निरागस बालके हक्कापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 00:53 IST

आजही अनेक निरागस बालके त्यांच्या हक्कापासून वंचित आहेत. तर काहींचे बालपनच पालावर हरवत चालल्याने या चिमुकल्यांना शिक्षणाचा गंधही नाही. त्यामुळे बालदिन साजरा करावा की नाही? हा प्रश्नच आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : आजही अनेक निरागस बालके त्यांच्या हक्कापासून वंचित आहेत. तर काहींचे बालपनच पालावर हरवत चालल्याने या चिमुकल्यांना शिक्षणाचा गंधही नाही. त्यामुळे बालदिन साजरा करावा की नाही? हा प्रश्नच आहे.दरवर्षी १४ नोव्हेंबर हा दिवस देशभर बालदिन म्हणून मोठ्या थाटात साजरा केला जातो. बालकांचे हक्क, त्यांचे अधिकार त्यांना खरंच मिळतात का? हा मात्र मोठा प्रश्न आहे. त्यातच पालावर राहून पोटाची खळगी भरणाऱ्या कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न तर गंभीर आहेच शिवाय आरोग्यही धोक्यात सापडत चालले आहे. जिल्ह्यात आजही शेकडो बालके शिक्षणाच्या अधिकारापासून वंचित आहेत. या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाकडून उपाय-योजना सुरू असल्या तरी प्रत्येक्षात मात्र योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नाही. शिक्षण विभागातर्फे सध्या जिल्ह्यात बालरक्षकामार्फत शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. जि. प. प्रशासन व शिक्षणाधिकाºयांनी याबाबत नुकत्याच संबधित यंत्रणेस सूचनाही दिल्या आहेत. जिल्ह्यात ७८८ बालके हे कधीच शाळेत न जाणारे असल्याचे आढळुन आल्याने याबाबत दखल घेत तात्काळ त्यांना शाळेत प्रवेशित करून घेण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाºयांनी दिल्या होत्या. जिल्हाभरात असे शेकडो बालके आजही शिक्षणाच्या अधिकारापासून वंचित आहेत. त्यांना शाळेत दाखल करून शिक्षणाच्या प्रवाहात आणणे ही प्रत्येकांचीच जबाबादारी आहे, शिवाय त्यांना शाळेत टिकवून ठेवणेही तितकेच महत्त्वाचे आहे.जिल्ह्यात मागील पाच ते सहा वर्षांपासून बालमजूरीविरोधी धाडसत्र नाही. त्यामुळे अजूनही जिल्ह्यात अनेक बालके बालकामगार म्हणून राबत असल्याचे चित्र आहे. कामगार अधिकारी कार्यालयाकडून मात्र याबाबत दखल घेतली जात नाही. विशेष म्हणजे प्रभारी कामगार अधिकारीही परभणी येथून कारभार पाहतात. कार्यालयास आठवड्यातून एकदा भेट देतात. बालमजूरी विरोधी धाडसत्राबाबत केवळ नियोजन सुरू आहे असे सोपस्कार उत्तर अधिकारी देऊन मोकळे होतात. त्यामुळे जिल्ह्यातील बालकामगारांचा प्रश्न गंभीर असून दुर्लक्षित आहे.एखाद्या दिवसाचे औचित्य साधून किंवा बालकामगार विरोधी मोहिमेसाठी शहरात एखाद्या ठिकाणी कार्यक्रम घेत, बॅनरबाजी करत जनजागृती केली जाते. बस... असा सोपस्कार कार्यक्रम पार पाडला जातो.

टॅग्स :Hingoliहिंगोलीchildren's dayबालदिन