शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

हिंगोलीच्या मार्केट यार्डात हळद दीड हजाराने घसरली, आवकही मंदावली

By रमेश वाबळे | Updated: August 18, 2023 16:09 IST

मागील चार दिवसांत दरात पाचशे ते दीड हजार रूपयांपर्यंत घसरण झाली आहे.

हिंगोली : येथील बाजार समितीच्या संत नामदेव मार्केट यार्डात मागील चार दिवसांपासून हळदीच्या दरात क्विंटलमागे पाचशे ते दीड हजार रूपयांची घसरण झाली. सरासरी १५ हजार ६५० रूपयांवर पोहोचलेल्या हळदीला शुक्रवारी सरासरी १३ हजार ८०० रूपये दर मिळाला. आठवड्याच्या तुलनेत आवकही मंदावली आहे.

येथील मार्केट यार्डात जुलैपासून हळदीचे दर वधारले. मे आणि जूनमध्ये मिळालेल्या दराच्या तुलनेत जवळपास दुप्पटीने दर वाढल्यामुळे आवक वाढली होती. ज्या शेतकऱ्यांनी दरवाढीच्या अपेक्षेने हळद विक्रीविना ठेवली होती. त्यांनी दर वाढताच हळद विक्री केली. तर जवळपास दहा टक्के शेतकऱ्यांकडे अजूनही हळद शिल्लक असून, त्यांना आणखी दरवाढीची अपेक्षा आहे.परंतु, मागील चार दिवसांत दरात पाचशे ते दीड हजार रूपयांपर्यंत घसरण झाली आहे.

दर घसरल्यामुळे आवकही मंदावत असून, सरासरी २ हजार ५०० ते ३ हजार क्विंटलची आवक होते. परंतु, भाव घसरल्याने आवक घटत आहे. व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार शेतकऱ्यांकडे आता हळद शिल्लक राहिलेली नाही. त्यामुळे आवक वर परिणाम होत आहे.

अशी दरात घसरण...मार्केट यार्डात ४ ऑगस्ट रोजी २ हजार ५०० क्विंटल हळदीची आवक झाली होती. त्या दिवशी १४ हजार ते १७ हजार ३०० रूपये दर मिळाला होता. तर सरासरी १५ हजार ६५० रूपयाने हळदीची विक्री झाली. ७ ऑगस्टला भावात घसरण होऊन सरासरी १४ हजार ६५० रूपये भाव मिळाला. तर ८ ऑगस्टला १५ हजार ५५० रूपये, ९ ऑगस्ट रोजी सरासरी १५ हजार ३०० रूपये दर मिळाला होता. त्यानंतर मात्र हळदीच्या दरात घसरण झाली. १० ऑगस्टला १५ हजार रूपये तर ११ आणि १४ ऑगस्ट रोजी १४ हजार ४०० रूपयावर भाव आला. १७ आणि १८ ऑगस्टला १३ हजार ८०० रूपये सरासरी दर मिळाला. पंधरवड्यात सरासरी पाचशे ते दीड हजाराने भाव घसरले आहेत.

मार्केट यार्ड तीन दिवस राहणार बंद...हळदीला यंदा चांगला भाव मिळाल्यामुळे शेतकऱ्यांत समाधान व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या हळदीचे पैसे आठवड्यात किंवा पंधरवड्यात द्यावे लागतात. परंतु, खरेदीदारांनी कारखाना किंवा मोठ्या बाजारपेठांमध्ये विक्री केलेल्या हळदीचे पैसे मिळण्यास विलंब होत आहे. त्यामुळे आता खरेदीदारांना ही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यातून काही प्रमाणात दिलासा मिळावा यासाठी सोमवारपासून तीन दिवस मार्केट यार्ड बंद ठेवण्यात येणार आहे. बंद दरम्यान आर्थिक व्यवहार सुरळीत होण्यास मदत होईल, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीHingoliहिंगोली