शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

परस्पर रोहित्र दिल्यास फौजदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 23:56 IST

रोहित्र दुरुस्ती करणाऱ्या एजन्सीज पूर्ण क्षमतेने काम करीत नाहीत. त्यामुळे दररोज दोन ते तीनच्या सरासरीने रोहित्र दुरुस्तीची आकडेवारी समोर येत आहे. मात्र काही जणांना परस्पर रोहित्र दुरुस्त करून दिले जात आहे. मात्र आता दररोज ५ रोहित्रांची दुरुस्ती झालीच पाहिजे, अशा कडक सूचना देत फौजदारीचा इशारा आ.तान्हाजी मुटकुळे यांनी दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : रोहित्र दुरुस्ती करणाऱ्या एजन्सीज पूर्ण क्षमतेने काम करीत नाहीत. त्यामुळे दररोज दोन ते तीनच्या सरासरीने रोहित्र दुरुस्तीची आकडेवारी समोर येत आहे. मात्र काही जणांना परस्पर रोहित्र दुरुस्त करून दिले जात आहे. मात्र आता दररोज ५ रोहित्रांची दुरुस्ती झालीच पाहिजे, अशा कडक सूचना देत फौजदारीचा इशारा आ.तान्हाजी मुटकुळे यांनी दिला.जिल्हाधिकारी कार्यालयात मुटकुळे यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी जगदीश मिनियार यांच्या उपस्थितीत ही बैठक घेतली. यावेळी महावितरणचे प्रभारी कार्यकारी अभियंता औरादे यांच्यासह सर्वच उपअभियंत्यांची उपस्थिती होती. तर रोहित्र दुरुस्तीच्या एजन्सीजही बोलावल्या होत्या. यावेळी मिनियार यांनी महावितणच्या अधिकाºयांना रोहित्र दुरुस्तीतील अडचणी विचारल्या. त्यात आॅईलची समस्या असल्याचे सांगण्यात आले. मात्र १00 रोहित्र दुरुस्ती होतील, एवढे आॅईल परभणीला आले. तेथून आणल्यावर येत्या पाच दिवसांत एवढ्या डीपींची दुरुस्ती होईल, असे सांगण्यात आले. तर दुरुस्तीच्या दराचा प्रश्न आधीच मिटल्याचे सांगण्यात आले. जवळपास १00 डीपी आधीच दुरुस्तीचे पडून असून या एजन्सींना दुरुस्तीस दिलेल्या डीपींची संख्याही ९0 च्या घरात आहे. त्यामुळे एजन्सीकडे डीपी तत्काळ दुरुस्तीसाठी पाठवून त्याची यादी सादर करण्यास मिनियार यांनी सांगितले. तर सध्या २१ डीपी दुरुस्त केलेले असून उद्या १२ आणखी मिळतील, असे सांगण्यात आले.आॅईल पुरवठा झाल्याने रोहीत्र दुरुस्त तत्काळ व्हावी. एक वर्षांच्या गॅरंटी काळात रोहित्र जळाल्यास तत्काळ दुरुस्त करून द्यावे, त्याची वेगळी यादी तयार करावी, अशा सूचनाही मुटकुळे यांनी दिल्या. तर परस्पर रोहित्र वाटपाची चौकशी करण्यासही सांगितले.वेदना समजून घ्या : अधिकाºयांना सुनावलेप्रभारी कार्यकारी अभियंता औरादे यांना मुटकुळे म्हणाले, आपणही शेतकरीपुत्र आहात. एक महिना डीपी न दिल्यास काय घडते, हे माहिती आहे. मग शेतकºयांच्या वेदना का समजून घेत नाहीत, असा सवाल केला. एजन्सीज परस्पर डीपी देतात, वीजचोरी रोखण्याचा पत्ता नाही. वीजचोरांवर कठोर कारवाई करा. यात लक्ष न घालणाºया अभियंत्यावरही कारवाई करा. वीजचोरांमुळे प्रामाणिक लोकांचे मरण नको. प्रतीक्षा यादीनुसार डीपी द्या. परस्पर डीपी देण्याच्या प्रकारामुळे असंतोष निर्माण होत आहे.शासनाने थकबाकी वसुुली करू नये, असा आदेश दिला आहे. त्यामुळे आपण सक्ती करू नका, असे आ.मुटकुळे म्हणाले. तर डीपी जळाल्यास वेगळा निर्णय असल्याचे अभियंत्यांनी सांगितले. त्यावर ही वसुली तर थकबाकीचीच असल्याचे सांगून सक्ती नको, असे मुटकुळे म्हणाले.

टॅग्स :Hingoliहिंगोलीmahavitaranमहावितरण