शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

दखल घेतली नाही तर मुंबईत येऊन रस्त्यावर सगळे अवयव विकू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2023 06:56 IST

कर्ज परतफेडीसाठी हिंगोलीच्या कर्जबाजारी शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा; ही तर शरमेची बाब : विरोधकांची सरकारवर टीका

लोकमत न्यूज नेटवर्क  गोरेगाव (जि. हिंगोली) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनाची दखल घेतली नाही तर थेट मुंबई गाठून आमची किडनी, लिव्हर, डोळे आदी विविध अवयव विकू. त्यातून मिळालेल्या पैशातून आम्ही बँकेचे कर्ज फेडू, असा निर्वाणीचा इशारा हिंगोलीतील काही कर्जबाजारी  शेतकऱ्यांनी सरकारला दिला आहे.  

यंदा खरीप हंगामात पावसाच्या खंडामुळे शेती पिकली नाही. हाती आलेल्या तोडक्या शेतमालाला भावही मिळत नाही. पीकविमा किंवा कुठले शासकीय अनुदानही मिळाले नाही. या अनेक संकटांमुळे शेतकरी सध्या आर्यिक संकटात सापडल्याचे चित्र सध्या आहे. 

nकौटुंबिक उदरनिर्वाह भागविण्यासह सात-बारा उताऱ्यावर असलेले बँकेचे कर्ज फेडायचे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. 

n हिंगोली जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी अवयव विक्रीचा निर्णय घेत तसे निवेदनच बुधवारी मुख्यमंत्र्यांकडे पाठविले आहे.

‘मरता और क्या नही करता...’पीकविम्यापासून शेतकऱ्यांना वंचित राहावे लागत आहे, शेतमालाला योग्य भावही मिळत नाही. सततची नापिकी व कर्जबाजारीला कंटाळून शेतकरी आत्महत्येच्या घटना घडत आहेत.तरीही शेतकऱ्यांच्या समस्यांबद्दल शासनाला थोडेही गांभीर्य नाही. बँक कर्जापाेटी मरणाची वेळ आली असताना आत्महत्या करून बदनामीचे मरण पत्करण्यापेक्षा अवयव विक्रीतून कर्जाची परतफेड करून मरण पत्करू, असे  शेतकऱ्यांनी यावेळी सांगितले. 

हे महाराष्ट्राचे दुर्दैव, दुर्लक्ष नको : वडेट्टीवार nमुंबई : हिंगोलीतील शेतकऱ्यांनी कर्ज फेडायचे कसे या विवंचनेतून अवयव विकायची तयारी दाखवल्याची बातमी ‘लोकमत’ने गुरुवारी प्रकाशित केली. त्यानंतर विरोधकांनी राज्य सरकारला लक्ष्य केले आहे.nलाखभर रुपयांचे कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्यांवर अवयव विकण्याची वेळ यावी, हे छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.nशेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची गरज आहे पण सरकार दुर्लक्ष करत आहे असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला.

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपFarmerशेतकरीMumbaiमुंबईHingoliहिंगोली