शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
2
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
3
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
4
Stock Market Today: विक्रमी तेजीनंतर शेअर बाजारात घसरण; ५०० पेक्षा जास्त अंकांनी आपटला, तरीही फार्मा सेक्टरमध्ये तेजी का?
5
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
6
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
7
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
8
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
9
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
10
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
11
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
12
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
14
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
15
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
16
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
17
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
18
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
19
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
20
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय

..जीव द्यायचा नाय..अन् देऊ द्यायचा नाय..

By admin | Updated: December 22, 2014 15:03 IST

पांडुरंग समृद्धी आणून पावशेराचे सव्वाशेर करेल; पण यासाठी तुम्ही जिवंत असणे आवश्यक असल्याचा संदेश घेवून केमीस्ट अँण्ड ड्रगिस्ट संघटना गावागावातीलशेतकर्‍यांना धीर देत आहे.

हिंगोली : /ज्या /पांडुरंगाने शेराचे पावशेर केला. त्याच्यावर भरवसा ठेवून आपल्या काळ्या माईच्या मेहनतीवर विश्‍वास ठेवून आपल्याला पांडुरंग समृद्धी आणून पावशेराचे सव्वाशेर करेल; पण यासाठी तुम्ही जिवंत असणे आवश्यक असल्याचा संदेश घेवून केमीस्ट अँण्ड ड्रगिस्ट संघटना गावागावातीलशेतकर्‍यांना धीर देत आहे. आजपर्यंत जिल्ह्यातील ८१ गावांत स्वखर्चाने पत्रके वाटून शेतकर्‍यांना एकत्र करून 'जीव द्यायचा नाय..अन् देऊ द्यायचा नाय..' असा संदेश देण्यात येत आहे.
यंदा महिनाभराच्या उशिराने मान्सून दाखल झाल्याने पेरणी लांबली. पुढेही पावसात अनियमिता आणि अनिश्‍चितता झाली. पिके भरात असताना पाऊस कायमचा गायब झाला. हिरवी पिके जाग्यावर करपली. पावसाळ्यात उन्हाळा झाला. आजपर्यंत केलेला खर्चही निघणार नसल्याचे स्पष्ट झाले. पेरणीच सावकाराच्या कर्जावर केली होती. उसनवारी करून खत घातला. अडत्याला माल देण्याच्या कबुलीवर कीटकनाशके खरेदी करून पिकावर फवारणी केली. दुष्काळामुळे पिके काढण्याची गरज राहिली नाही. उत्पादन खर्चासाठी घेतलेले पैसे कसे फेडावे? या विवंचनेत शेतकरी सापडला. मुदत संपताच सावकार घर गाठू लागला. आधीच घरात दोनवेळच्या खाण्याचे वांधे आणि त्यात पैशांचा तगादा लागला. खाणार्‍यांची तोंडे अनेक, आठवडी बाजाराचा खर्च, आजी-आजोबांच्या औषधींचा खर्च, मुलींच्या लग्नाची चिंता त्यातही जनावरांना चारा नाही, पाण्याची व्यवस्था नाही, असे अनेकविध प्रश्न ग्रासू लागले. खरीप निघून गेला असताना रबीच्या पेरणीपूर्वी जमीन कोरडी पडली. रबीची आशा मावळल्याने खाण्यासाठी गहू-ज्वारी विकत घेण्याची वेळ आली. चार्‍याअभावी जनावरे कसायाच्या दावणीला बांधण्यावाचून पर्याय उरला नाही. अनेक संकटांनी घेरला गेला. एकदाच शेकडो प्रश्न उभे राहिल्याने तो घाबरून गेला. त्या विवंचनेत मरणाला कवटाळू लागला. पाहता पाहता अनेक शेतकर्‍यांनी जीवनयात्रा संपविली. हे सत्र सुरूच असल्याने केमीस्ट अँण्ड ड्रगीस्ट असोसिएशनने जागृतीची मोहीम हाती घेतली. दुपारी ग्रामस्थ सापडत नसल्यामुळे सकाळी ७ वाजता पदाधिकारी गाव गाठतात. पाराचा कट्टा, शेकोटी, दुकानावरील गर्दी, विहिरीवर पाणी भरतेवेळीची गर्दी गाठतात. 'काळ्या माईच्या झोळीत मोत्याचे पीक पिकवू अन् सोन्याचे दिवस पुन्हा पाहू. म्हणून जीव तर कधीच द्यायचा नाही अन् देऊ द्याचाही नाही.'असे समजावून सांगतात. गेल्या आठवड्यापासून अनेक गावे पिंजून काढली.प्रामुख्याने आठवडी बाजार, गुरांचे बाजार, सार्वजनिक कार्यक्रम स्थळी गेले असून जिल्ह्यातील प्रत्येक गावात जाण्याचा त्यांचा मानस आहे. /(प्रतिनिधी)
■ कुशल जैन, प्रमोद मुंदडा, सुनील पाटील खिल्लारी, संतोष बाहेती, हंसराज गणवाणी, प्रविण बगडिया, विजय मुधोळ, काबरा, दीपक धूत, राजेश बालदी, संजय टाकळगव्हाणकर, गुलाब घुगे, प्रा.कुमार भालेराव, संजय देशमुख, कैलास शैव, भारती हे पदाधिकारी आलटूनपालटून वेगवेगळ्या गावांत जागृतीसाठी जात आहेत. 
■ सवड, केसापूर, घोटादेवी, पहेनी, पुसेगाव, सेनगाव, भानखेडा, हत्ता नाईक, पाटोदा, उटी ब्रह्मचारी, कापडसिंगी, साखरा, वेलतुरा, कहाकर खुर्द, कवठा, देवळा, लाख, पांगरा, काकडदाभा, फुलदाभा, पिंपळदरी, शिरडशहापूर, जवळा बाजार, खंडाळा, जयपूर, चोंढी (भाकरे), चोंढी (काळे), माझोड, मन्नास पिंपरी, कहाकर खु, म्हाळशी, आजेगाव, वाघजाळी, जवळा बु.