शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
2
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
3
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
4
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
5
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
6
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
7
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
8
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
9
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
10
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
11
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
12
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
13
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
14
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले
15
आयुष्य कसं वळणं घेईल? काहीच सांगता येत नाही; एक स्वप्न तुटलं, सोनम राजला भेटली अन्...! मग त्याच्यासाठी केलं एवढं मोठं कांड!
16
'...तर पाकिस्तानात घुसून हल्ला करू', परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा पाकिस्तानला थेट इशारा
17
Video - "हनिमूनवरुन जिवंत परतणं ही मोठी कामगिरी..."; सोनम-राजा प्रकरणावर मीम्स व्हायरल
18
राजा रघुवंशीची हत्या, सोनम झालेली बेपत्ता; एकाच वेळी १२० पोलीस करत होते 'ऑपरेशन हनिमून'!
19
सॉफ्टवेअर इंजिनिअर झटक्यात कोडिंग करायला गेले अन् चॅटजीपीटी बंद पडले! भारतीय युजर वैतागले 
20
CM फडणवीसांची नितेश राणेंना कठोर शब्दांत समज; म्हणाले, “तुमच्या मनात काही असले तरी...”

संतोष बांगर यांचा लागणार कस, कळमनुरी मतदारसंघात यंदा चौरंगी लढत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2024 14:42 IST

सर्वच उमेदवारांचा बैठकांवर भर, कार्यकर्तेही चौफेर सक्रिय

- इलियास शेखकळमनुरी : ४ नोव्हेंबर रोजी अर्ज मागे घेतल्यानंतर मतदारसंघातील चित्र स्पष्ट झाले असून, मतदारसंघात चौरंगी लढत होईल असेच दिसते. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे डॉ. संतोष टार्फे, महायुतीकडून संतोष बांगर, वंचितकडून डॉ. दिलीप मस्के आणि अपक्ष अजित मगर निवडणूक रिंगणात उभे आहेत. कळमनुरी मतदारसंघात सुरुवातीला वाटले होते की, तिरंगी लढत होईल. परंतु अजित मगर यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवल्यामुळे निवडणूक चौरंगी होईल, हे निश्चित झाले आहे.

गतवेळेस एकगठ्ठा मते काही प्रमुख पक्षांनाच मिळाली होती. परंतु, यावेळेस काही पक्षांचे विभाजन झाल्यामुळे मतांचे विभाजनही होऊन बसले आहे. त्यामुळे या निवडणुकीत चौरंगी लढत होण्याची शक्यता अधिक आहे. मतदानाला अजून दहा दिवस बाकी आहेत. त्यामुळे सर्वच प्रमुख पक्षांचे उमेदवार चुरशीने प्रचार करू लागले आहेत. एवढे असताना अजूनही एकाही नेत्याची सभा झाली नाही. जर मोठ्या नेत्यांची सभा झाली तर चित्र काहीअंशी पालटू शकते, असेही जाणकारांचे म्हणणे आहे.

कळमनुरी विधानसभा मतदारसंघात एकूण १९ उमेदवार निवडणूक रिंगणात असून, यात १० अपक्षांचा समावेश आहे. मतदारसंघात चौरंगी लढत होत असली तरी यात अपक्षांना डावलून चालणार नाही. दुसरीकडे, प्रत्येक उमेदवार आपणच निवडून येतो, असे सांगत आहे. दुसरे म्हणजे, समर्थकांनाही आपला उमेदवार निवडून येईल, असा विश्वास आहे. निवडणुकीत स्पर्धक तेच असून, या निवडणुकीत झेंडे बदलले गेले आहेत. दोन दिवसांपासून ग्रामीण भागात कोणी मोबाइलवर प्रचार करत आहे तर कोणी प्रत्यक्ष मतदारसंघात जाऊन भेटून ‘मी निवडणुकीत उभा आहे, लक्ष असू द्या’, असे सांगू लागला आहे. निवडणुकीत उमेदवारांची संख्या १९ झाली असल्यामुळे मत विभाजनाचा फटका सर्वच प्रमुख राजकीय पक्षांना बसण्याची शक्यता आहे.

उमेदवारांच्या हालचालीवर अधिकाऱ्यांचे लक्षनिवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार निवडणूक अधिकारी उमेदवारांच्या प्रत्यक्ष हालचालीवर लक्ष ठेवून आहेत. उमेदवार कुठे सभा घेतात, कोणाला भेटतात, किती खर्च करतात, कुठे कुठे जाऊन प्रचार करतात या सर्व बारकाईवर निवडणूक विभागाचे अधिकारी लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे उमेदवारही आचारसंहितेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करू लागले आहेत. आता खर्च केला तर पुढे चालून सर्व खर्चाचा हिशेब द्यावा लागेल, जर खर्च हिशेबशीर दिला नाही तर नियमांनुसार कार्यवाही होईल, या भीतीने सर्वच उमेदवार मतदारांना प्रत्यक्ष भेटून प्रचार करू लागले आहेत.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकkalamnuri-acकळमनुरीsantosh bangarसंतोष बांगर