शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

गतवर्षभरात हिंगोलीकरांनी हरवले ७१ मोबाईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:31 IST

हिंगोली: मानवाच्या मुख्य गरजा अन्न, वस्त्र आणि निवारा अशा तीन आहेत. पण आता त्यात चौथी गरज म्हणून मोबाईललची भर ...

हिंगोली: मानवाच्या मुख्य गरजा अन्न, वस्त्र आणि निवारा अशा तीन आहेत. पण आता त्यात चौथी गरज म्हणून मोबाईललची भर पडली आहे. गतवर्षभरात मोबाईल सांभाळण्यात निष्काळजीपणा केल्यामुळे ७१ जणांना मोबाईलपासून दूृर रहावे लागले.

मोबाईल हरवण्याचे आणि चोरी जाण्याचे मुख्य ठिकाण म्हणजे आठवडी बाजार असते. २०२० मध्ये हिंगोली शहरातील ७१ जणांचे मोबाईल चोरीला गेल्याच्या तक्रारी शहर पोलीस ठाण्यात नोंद झाल्याचे सांगण्यात आले. जानेवारी महिन्यात १९, फेब्रुवारी महिन्यात १४, मार्च महिन्यात ८, एप्रिल महिन्यात ३, मे महिन्यात १, जून महिन्यात २, जुलै महिन्यात १, ऑगस्ट महिन्यात ५, सप्टेंबर महिन्यात ४, ऑक्टोबर महिन्यात ९, नोव्हेंबर महिन्यात एकही नाही आणि डिसेंबर महिन्यात ५ अशा ७१ मोबाईल हरवल्याच्या तक्रारींची नोंद झाली आहे. परंतु, मोबाईल किती सापडले याची मात्र नोंद प्राप्त झाली नाही.

गर्दीच्या ठिकाणी मोबाईल सांभाळा

गर्दीचे ठिकाण हे चोरट्यांसाठी चांगले असते. गत काही वर्षापासून काही जण शर्टच्या खिशात मोबाईल ठेवतात. हे धोकादायक असून चोरट्यांसाठी सोयीचे असते. एखाद्या व्यक्तीने मोबाईल शर्टच्या खिशात ठेवल्याचे चोरटा हेरुन असतो. गर्दीच्या ठिकाणी व्यक्ती पोहोचला की चोरटा त्यावर हात मारुन तो मोबाईल अलगतपणे लंपास करतो. मोबाईल खिशात नाही समजल्यानंतर शेवटी पर्याय म्हणून पोलीस ठाणे गाठतो आणि तक्रार दाखल करतो. तेव्हा गर्दीचे ठिकाण टाळा असा सल्ला पोलिसांनी दिला आहे.

महागामोलाचा मोबाईल घेतल्यानंतर तो सांभाळून ठेवणे जोखमीचे काम आहे. मोबाईल हा शर्टच्या वरच्या खिशात ठेवण्याऐवजी पँटच्या खिशात सुरक्षित ठेवावा. महागामोलाच्या वस्तुची काळजी घ्यावी.

-पंडित कच्छवे, पोलीस निरीक्षक, हिंगोली शहर