शहरं
Join us  
Trending Stories
1
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
2
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
3
इकडे PM मोदींचा सज्जड दम, तिकडे सांबा येथे दिसले संशयित ड्रोन; भारतीय सैन्याकडून कारवाई सुरू
4
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
5
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
6
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
7
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
8
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
9
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने शरणागती पत्कारल्यानंतर भारताने युद्धविरामाला सहमती दर्शवली- फडणवीस
10
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
11
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
12
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
13
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
14
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
15
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
16
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
17
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
18
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
19
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
20
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य

गतवर्षभरात हिंगोलीकरांनी हरवले ७१ मोबाईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:31 IST

हिंगोली: मानवाच्या मुख्य गरजा अन्न, वस्त्र आणि निवारा अशा तीन आहेत. पण आता त्यात चौथी गरज म्हणून मोबाईललची भर ...

हिंगोली: मानवाच्या मुख्य गरजा अन्न, वस्त्र आणि निवारा अशा तीन आहेत. पण आता त्यात चौथी गरज म्हणून मोबाईललची भर पडली आहे. गतवर्षभरात मोबाईल सांभाळण्यात निष्काळजीपणा केल्यामुळे ७१ जणांना मोबाईलपासून दूृर रहावे लागले.

मोबाईल हरवण्याचे आणि चोरी जाण्याचे मुख्य ठिकाण म्हणजे आठवडी बाजार असते. २०२० मध्ये हिंगोली शहरातील ७१ जणांचे मोबाईल चोरीला गेल्याच्या तक्रारी शहर पोलीस ठाण्यात नोंद झाल्याचे सांगण्यात आले. जानेवारी महिन्यात १९, फेब्रुवारी महिन्यात १४, मार्च महिन्यात ८, एप्रिल महिन्यात ३, मे महिन्यात १, जून महिन्यात २, जुलै महिन्यात १, ऑगस्ट महिन्यात ५, सप्टेंबर महिन्यात ४, ऑक्टोबर महिन्यात ९, नोव्हेंबर महिन्यात एकही नाही आणि डिसेंबर महिन्यात ५ अशा ७१ मोबाईल हरवल्याच्या तक्रारींची नोंद झाली आहे. परंतु, मोबाईल किती सापडले याची मात्र नोंद प्राप्त झाली नाही.

गर्दीच्या ठिकाणी मोबाईल सांभाळा

गर्दीचे ठिकाण हे चोरट्यांसाठी चांगले असते. गत काही वर्षापासून काही जण शर्टच्या खिशात मोबाईल ठेवतात. हे धोकादायक असून चोरट्यांसाठी सोयीचे असते. एखाद्या व्यक्तीने मोबाईल शर्टच्या खिशात ठेवल्याचे चोरटा हेरुन असतो. गर्दीच्या ठिकाणी व्यक्ती पोहोचला की चोरटा त्यावर हात मारुन तो मोबाईल अलगतपणे लंपास करतो. मोबाईल खिशात नाही समजल्यानंतर शेवटी पर्याय म्हणून पोलीस ठाणे गाठतो आणि तक्रार दाखल करतो. तेव्हा गर्दीचे ठिकाण टाळा असा सल्ला पोलिसांनी दिला आहे.

महागामोलाचा मोबाईल घेतल्यानंतर तो सांभाळून ठेवणे जोखमीचे काम आहे. मोबाईल हा शर्टच्या वरच्या खिशात ठेवण्याऐवजी पँटच्या खिशात सुरक्षित ठेवावा. महागामोलाच्या वस्तुची काळजी घ्यावी.

-पंडित कच्छवे, पोलीस निरीक्षक, हिंगोली शहर