शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
2
अमेरिकेत पॅलेस्टिनींसह इतर ७ देशांवर प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
3
'१२ लाख सैनिकांची गरज काय? त्यांना दुसरे काम लावा'; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं
4
आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर...
5
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
6
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
7
मुंबई-दिल्ली एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात! धडक होताच उडाला भडका, तीन जणांचा आगीत झाला कोळसा
8
कॅरेबियन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांनी 'या' देशाला घेरले; ट्रम्प यांनी दिला थेट युद्धाचा इशारा
9
'बिग बॉस मराठी ६'मध्ये दिसणार गौतमी पाटील? म्हणाली, "शो खूप छान आहे पण..."
10
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
11
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
12
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
13
अग्निवीर आणि अन्य जवान यांच्यामध्ये भेदभाव का होतो?; मुंबई उच्च न्यायालयात याचिका; केंद्र सरकारला हायकोर्टाची नोटीस
14
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
15
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
16
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
17
कोवळ्या वयात मित्राला संपवण्याची मानसिकता येते कुठून? मुलांच्या मानसिक आरोग्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज
18
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
19
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
20
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीच्या भरपाईपोटी हिंगोलीला लागणार १५४ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2020 18:31 IST

२.२७ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान

ठळक मुद्दे शासनाकडे अहवाल सादर आता प्रतीक्षा मदतीची

- सुनील काकडे 

हिंगोली : अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे जून ते आॅक्टोबर या ५ महिन्यांत २ लाख २७ हजार ६८ हेक्टरवरील जिरायती पिकांसह बागायत व फळपिकांचे नुकसान झाले. त्याचा एकत्रित अहवाल २२ आॅक्टोबरला शासनाकडे पाठविण्यात आला आहे. नुकसानग्रस्त ३ लाख ७ हजार ८३० शेतकऱ्यांना नुकसान ारपाई देण्याकरिता १५४ कोटी ७१ लाख ७३ हजार ५१८ रुपये एवढ्या निधीची गरज असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

सतत कोसळलेल्या पावसामुळे मूग, उडीद आणि नंतर सोयाबीन, कापूस यासह बागायती व फळपिकांचे नुकसान झाले. नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे शेतात उभ्या सोयाबीनच्या हिरव्या शेंगांना कोंब फुटण्याचा प्रकारही घडला. दरम्यान, कृषी व महसूल विभागाने संयुक्तरित्या सर्वेक्षण व पंचनामे करून जिल्हाधिकारी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने कृषी आयुक्तांकडे नुकसानीचा अहवाल पाठविला आहे. 

अहवालानुसार, जून ते आॅक्टोबर या ५ महिन्यात अतिवृष्टी व पुरपरिस्थितीमुळे २ लाख ४४९ हेक्टरवरील सोयाबीनचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. यासह २१ हजार ४३२ हेक्टरवरील कापूस, १८७८ हेक्टरवरील ज्वारी, ५.६० हेक्टरवरील तूर, १४१४ हेक्टरवरील मूग आणि १५२० हेक्टरवरील इतर अशा एकूण २ लाख २६ हजार ७०१ हेक्टरवरील जिरायती पिकांचे नुकसान झाले आहे. ३ लाख ६ हजार ७४७ शेतकरी यामुळे बाधीत झाले असून संबंधितांना हेक्टरी ६८०० रुपये याप्रमाणे नुकसान भरपाई देण्याकरिता १ अब्ज ५४ कोटी १५ लाख ६७ हजार ८८८ रुपये निधीची गरज आहे. बागायत पिकांखालील २२५ हेक्टरवरील हळद पिक बाधीत असून, ८७६ शेतकऱ्यांना १३ हजार ५०० रुपये प्रमाणे ३ कोटी ४५ लाख ३३० रुपये, फळपिकाखालील १४२ हेक्टरवरील केळी पिकाचे नुकसान झाले असून, त्यासाठी २ कोटी ५६ लाख रुपये लागतील.

आता प्रतीक्षा मदतीचीजून ते आॅक्टोबर या पाच महिन्यांमध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. प्रशासनाने युद्धपातळीवर सर्वेक्षण आणि पंचनामे करून अहवाल तयार केले आहेत. बाधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

टॅग्स :RainपाऊसHingoliहिंगोलीFarmerशेतकरी