शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

अतिवृष्टीच्या भरपाईपोटी हिंगोलीला लागणार १५४ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2020 18:31 IST

२.२७ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान

ठळक मुद्दे शासनाकडे अहवाल सादर आता प्रतीक्षा मदतीची

- सुनील काकडे 

हिंगोली : अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे जून ते आॅक्टोबर या ५ महिन्यांत २ लाख २७ हजार ६८ हेक्टरवरील जिरायती पिकांसह बागायत व फळपिकांचे नुकसान झाले. त्याचा एकत्रित अहवाल २२ आॅक्टोबरला शासनाकडे पाठविण्यात आला आहे. नुकसानग्रस्त ३ लाख ७ हजार ८३० शेतकऱ्यांना नुकसान ारपाई देण्याकरिता १५४ कोटी ७१ लाख ७३ हजार ५१८ रुपये एवढ्या निधीची गरज असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

सतत कोसळलेल्या पावसामुळे मूग, उडीद आणि नंतर सोयाबीन, कापूस यासह बागायती व फळपिकांचे नुकसान झाले. नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे शेतात उभ्या सोयाबीनच्या हिरव्या शेंगांना कोंब फुटण्याचा प्रकारही घडला. दरम्यान, कृषी व महसूल विभागाने संयुक्तरित्या सर्वेक्षण व पंचनामे करून जिल्हाधिकारी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने कृषी आयुक्तांकडे नुकसानीचा अहवाल पाठविला आहे. 

अहवालानुसार, जून ते आॅक्टोबर या ५ महिन्यात अतिवृष्टी व पुरपरिस्थितीमुळे २ लाख ४४९ हेक्टरवरील सोयाबीनचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. यासह २१ हजार ४३२ हेक्टरवरील कापूस, १८७८ हेक्टरवरील ज्वारी, ५.६० हेक्टरवरील तूर, १४१४ हेक्टरवरील मूग आणि १५२० हेक्टरवरील इतर अशा एकूण २ लाख २६ हजार ७०१ हेक्टरवरील जिरायती पिकांचे नुकसान झाले आहे. ३ लाख ६ हजार ७४७ शेतकरी यामुळे बाधीत झाले असून संबंधितांना हेक्टरी ६८०० रुपये याप्रमाणे नुकसान भरपाई देण्याकरिता १ अब्ज ५४ कोटी १५ लाख ६७ हजार ८८८ रुपये निधीची गरज आहे. बागायत पिकांखालील २२५ हेक्टरवरील हळद पिक बाधीत असून, ८७६ शेतकऱ्यांना १३ हजार ५०० रुपये प्रमाणे ३ कोटी ४५ लाख ३३० रुपये, फळपिकाखालील १४२ हेक्टरवरील केळी पिकाचे नुकसान झाले असून, त्यासाठी २ कोटी ५६ लाख रुपये लागतील.

आता प्रतीक्षा मदतीचीजून ते आॅक्टोबर या पाच महिन्यांमध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. प्रशासनाने युद्धपातळीवर सर्वेक्षण आणि पंचनामे करून अहवाल तयार केले आहेत. बाधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

टॅग्स :RainपाऊसHingoliहिंगोलीFarmerशेतकरी