शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

अतिवृष्टीच्या भरपाईपोटी हिंगोलीला लागणार १५४ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2020 18:31 IST

२.२७ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान

ठळक मुद्दे शासनाकडे अहवाल सादर आता प्रतीक्षा मदतीची

- सुनील काकडे 

हिंगोली : अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे जून ते आॅक्टोबर या ५ महिन्यांत २ लाख २७ हजार ६८ हेक्टरवरील जिरायती पिकांसह बागायत व फळपिकांचे नुकसान झाले. त्याचा एकत्रित अहवाल २२ आॅक्टोबरला शासनाकडे पाठविण्यात आला आहे. नुकसानग्रस्त ३ लाख ७ हजार ८३० शेतकऱ्यांना नुकसान ारपाई देण्याकरिता १५४ कोटी ७१ लाख ७३ हजार ५१८ रुपये एवढ्या निधीची गरज असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

सतत कोसळलेल्या पावसामुळे मूग, उडीद आणि नंतर सोयाबीन, कापूस यासह बागायती व फळपिकांचे नुकसान झाले. नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे शेतात उभ्या सोयाबीनच्या हिरव्या शेंगांना कोंब फुटण्याचा प्रकारही घडला. दरम्यान, कृषी व महसूल विभागाने संयुक्तरित्या सर्वेक्षण व पंचनामे करून जिल्हाधिकारी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने कृषी आयुक्तांकडे नुकसानीचा अहवाल पाठविला आहे. 

अहवालानुसार, जून ते आॅक्टोबर या ५ महिन्यात अतिवृष्टी व पुरपरिस्थितीमुळे २ लाख ४४९ हेक्टरवरील सोयाबीनचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. यासह २१ हजार ४३२ हेक्टरवरील कापूस, १८७८ हेक्टरवरील ज्वारी, ५.६० हेक्टरवरील तूर, १४१४ हेक्टरवरील मूग आणि १५२० हेक्टरवरील इतर अशा एकूण २ लाख २६ हजार ७०१ हेक्टरवरील जिरायती पिकांचे नुकसान झाले आहे. ३ लाख ६ हजार ७४७ शेतकरी यामुळे बाधीत झाले असून संबंधितांना हेक्टरी ६८०० रुपये याप्रमाणे नुकसान भरपाई देण्याकरिता १ अब्ज ५४ कोटी १५ लाख ६७ हजार ८८८ रुपये निधीची गरज आहे. बागायत पिकांखालील २२५ हेक्टरवरील हळद पिक बाधीत असून, ८७६ शेतकऱ्यांना १३ हजार ५०० रुपये प्रमाणे ३ कोटी ४५ लाख ३३० रुपये, फळपिकाखालील १४२ हेक्टरवरील केळी पिकाचे नुकसान झाले असून, त्यासाठी २ कोटी ५६ लाख रुपये लागतील.

आता प्रतीक्षा मदतीचीजून ते आॅक्टोबर या पाच महिन्यांमध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. प्रशासनाने युद्धपातळीवर सर्वेक्षण आणि पंचनामे करून अहवाल तयार केले आहेत. बाधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

टॅग्स :RainपाऊसHingoliहिंगोलीFarmerशेतकरी