शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

हिंगोलीत शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ राष्ट्रीय महामार्ग रोखला, वाहतूक ठप्प

By विजय पाटील | Updated: June 28, 2024 13:55 IST

मागील पाच दिवसांपासून ताकतोडा येथे शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी उपोषणाला बसले आहेत.

हिंगोली : सेनगाव तालुक्यातील ताकतोडा येथे सरसकट कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा म्हणून हिंगोली ते वाशिम राष्ट्रीय महामार्गावर कनेरगावनजीक शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले.

मागील पाच दिवसांपासून ताकतोडा येथे शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी उपोषणाला बसले आहेत. या उपोषणाची अद्याप कोणीच दखल घेतली नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांची प्रकृती खालावत आहे. या आंदोलनाबाबत गजानन कावरखे, नामदेव पतंगे, संदीप मानमोठे, शांताराम सावके, के.के. सावके या शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवून उपोषण सुरू केले होते. मात्र कुणीच दखल घेत नसल्याने काल शांताराम सावके या शेतकऱ्याने स्वत:ची दुचाकी पेटवून देत निषेध नोंदविला. यामुळे या आंदोलनाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

या आंदोलकांच्या समर्थनार्थ आज हिंगोली ते वाशिम राष्ट्रीय महामार्गावर कनेरगावपासून एक किमी अंतरावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या ठिकाणी शेतकऱ्यांनी टायर जाळून वाहतूक थांबविली होती. चोख पोलिस बंदोबस्तही होता. या आंदोलकांनी सरकार आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप केला. तर लोकप्रतिनिधीही टक्केवारीची कामे करण्यात मश्गुल असून त्यांना शेतकरी व शेतमजुरांचे प्रश्न सोडविण्यास वेळ नसल्याचा आरोप केला. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा अन् शेताला कुंपन करून दिल्याशिवाय आंदोलन थांबणार नसल्याचा इशाराही दिला.

वाहनांच्या रांगास्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी सुरू केलेल्या या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. रस्त्यावर टायर जाळलेले असल्याने वाहनांना तेथून रस्ता काढणेही शक्य नाही. शिवाय अनेकांनी तर या वाहनांतून उतरून आंदोलनात सहभाग घेतल्याचेही पहायला मिळाले.

टॅग्स :HingoliहिंगोलीFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र