शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
3
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
4
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
5
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
6
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
7
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
8
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
9
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
10
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
11
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
12
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
13
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
14
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
15
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
16
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
17
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
18
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
19
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
20
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 

तीन जिल्ह्यांना हादरवणाऱ्या भूकंपाचे केंद्र हिंगोलीत, ४.५ रिश्टर स्केलची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2024 07:52 IST

वसमत तालुक्यातील पांगरा (शिंदे) येथे भूकंपाचे केंद्र असल्याची माहिती

- इस्माईल जाहगीरदार.वसमत (जि. हिंगोली): आज सकाळी हिंगोली, नांदेड आणि परभणी जिल्ह्यातील काही भागांना सकाळी ६ वाजून ८ मिनिट ते ६  वाजून २४ मिनिटाच्या दरम्यान भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. वसमत तालुक्यातील पांगरा (शिंदे) येथे भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची माहिती आहे.

हिंगोली जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाला संपर्क केला असता त्यांनी घटनेला दुजोरा दिला आहे. तसेच तालुका प्रशासनाने नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे. वसमत तालुक्यातील पांगरा (शिंदे) येथे भूकंपाचे केंद्र असल्याचे बोलले जात आहे. भुकंपाचे दोन धक्के बसत आज सकाळी जमीन हादरली. गत तीन वर्षांत अनेक वेळा भूकंपाचे धक्के या भागात जाणवले आहेत. पण हा सर्वात मोठा भूकंप असल्याचे या भागातील नागरिकांनी सांगितले. 

हादरे बसले त्यावेळी पक्षांनी किलबिलाट करणे सुरू केले. तर गोठ्यातील जनावरांनी हंबरडा फोडला. जमीन हादरताच नागरीक घराबाहेर पडणे सुरू केल.६:८ वाजेनंतर दुसरा सदरा ६:१९ वाजेदरम्यान बसला.

जिल्हा हादरला...हिंगोली शहरासह जिल्ह्यातील कळमनुरी, औंढा, वसमत, दांडेगाव, पांगरा शिंदे, वारंगा, कुरूंदा, नर्सी, कवठा व इतर अनेक भागांमध्ये भूकंपाचे दोन हदरे लागोपाठ जाणवले.वसमत तालुक्यातील पांग्रा शिंदे,वापटी, परीसर भुकंपाचा केंद्र बिंदू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.सहा वर्षांपासून धक्का...गत पाच ते सहा वर्षा पासुन भुकंपाचे धक्के बसत आहेत. २१ मार्च रोजी सकाळी ६.८ मि ला भुगर्भातुन जोराचा आवाज येत जमीन हादरली. आता पर्यंतचा हा सर्वात मोठा भुकंपाचा धक्का बसला आहे. हिंगोली जिल्ह्यासह  नांदेड व परभणी या जिल्ह्यातील अनेक गावांना पण गुरुवार झालेल्या भुकंपाचे हादरे जाणवले.

वसमत शहरास प्रथमच तिव्र धक्का....तालुक्यातील पांग्रा शिंदे व परीसरातील गावांना मोठा तिव्र धक्का जाणवला वसमत शहरातील नागरीक घरा बाहेर पडले होते,शहर वासीयांनी प्रथमच येवडा मोठा धक्का बसला आसल्याची प्रतिक्रिया दिली, यापुर्वी सौम्य धक्के जाणवत होते.परंतु गुरुवार रोजी सकाळी बसलेला भुकंपाचा धक्का भयभीत करणारा आहे. 

नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी..गुरुवारी सकाळी भूकंपाचे दोन हजारे बसले तालुका प्रशासन नागरिकांची काळजी घेत आहे अशावेळी नागरिकांनीही घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करावे असे आव्हान तहसीलदार शारदा दळवी यांनी केले आहे.

टॅग्स :EarthquakeभूकंपHingoliहिंगोली