शहरं
Join us  
Trending Stories
1
खोटा प्रचार केल्याने वास्तव बदलणार नाही; अरुणाचल प्रदेशावर दावा करणाऱ्या चीनला भारताचे प्रत्युत्तर
2
बुरहान वानीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी दिल्ली बॉम्बस्फोट घडवला? डॉ. उमर बद्दल मोठा खुलासा...
3
T20 World Cup 2026 Schedule Announced : टी-२० वर्ल्ड कपचं वेळापत्रक जाहीर! भारत-पाक एकाच गटात
4
खडसे-महाजन वादात माझा सँडविच होतोय; केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंचे मोठे विधान
5
सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीवर CM फडणवीसांचे भाष्य; म्हणाले, “निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया...”
6
Video: धक्कादायक! माजी आमदार निर्मला गावित यांना अज्ञात कारने उडवले, रुग्णालयात दाखल
7
कुटुंबियांचा लग्नास विरोध; पाकिस्तानी हिंदू प्रेमी युगुल सीमा ओलांडून भारतात, BSF ने घेतले ताब्यात
8
“जोपर्यंत CM आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही”; फडणवीसांनी दिला शब्द
9
बिहार फत्ते; आता 'या' दोन राज्यात NDA चे सरकार स्थापन होणार, अमित शाहांचा मोठा दावा...
10
आम्ही जाण्यापूर्वीच पोस्टमार्टेम, पंचनामा नाही, तिच्या डोक्यावर वळ...; गौरी गर्जे-पालवेच्या आईचे गंभीर आरोप 
11
TET Paper Leak: मराठवाड्यातून गोंदियातील शिक्षकांना कॉल, कुणाकडे दीड लाख, कुणाला मागितले तीन लाख रुपये
12
'सहकुटुंब सहपरिवार' फेम अभिनेत्री अडकली लग्नबेडीत, पुण्यात थाटामाटात पार पडला विवाहसोहळा
13
चीनने पुन्हा गरळ ओकली; अरुणाचल प्रदेश चीनचा भाग असल्याचा पुनरुच्चार...
14
Travel : परदेशात कशाला... भारतातच आहे 'मिनी थायलंड'; कपल्ससाठी 'स्वर्गीय' ठिकाण!
15
तुम्हीही बेडवर लॅपटॉप चालवताय? एक मोठी चूक आणि बसू शकतो हजारोंचा फटका! ताबडतोब वाचा...
16
'...तर देशभरात भाजपचा पाया हादरवून टाकेन', SIR प्रक्रियेवरुन ममता बॅनर्जींचा केंद्रावर हल्लाबोल
17
भेटायला म्हणून गेला अन् भलताच अडकला! गावकऱ्यांनी २ मुलांच्या आईसोबत लावून दिलं तरुणाचं लग्न अन्... 
18
राम मंदिरावर धर्मध्वज डौलानं फडकला, ध्वजावरील ‘ते’ झाड नेमकं कोणतं? इंटरेस्टिंग माहिती...
19
थोडी सभ्यता बाळगा! विमानतळावर पायजमा-स्लिपर घालून येऊ नका! अमेरिकेत निघाला ट्रम्प सरकारचा फतवा
20
"जे होतं ते आम्ही फडणवीस यांच्यासमोर मनमोकळ्या...", महायुतीतील नाराजी नाट्यावर एकनाथ शिंदेंचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीत संततधार पावसाने पिकांचे मोठे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 18:23 IST

जिल्ह्यात ६ जून पासून संततधार पावसाने सर्वदूर हजेरी लावल्यामुळे शेतातील पिकांना  मोठा फटका बसला आहे.

ठळक मुद्दे सोयाबीन पिवळे पडले असून त्याची वाढही खुंटली आहे. ज्वारी, कापूस, उडीद, मूग, हळद या पिकांचेही नुकसान झाले आहे.

हिंगोली : जिल्ह्यात ६ जून पासून संततधार पावसाने सर्वदूर हजेरी लावल्यामुळे शेतातील पिकांना  मोठा फटका बसला आहे. सोयाबीन पिवळे पडले असून त्याची वाढही खुंटली आहे. तर ज्वारी, कापूस, उडीद, मूग, हळद या पिकांचेही नुकसान झाले आहे.

दहा ते बारा दिवसांपासून सूर्यदर्शन झाले नसल्याने पिकांना उन्हाचीही आवश्यकता असते. मात्र १० दिवसांपासून ऊन नसल्याने पिकांना पिवळेपण आले आहे. दररोजच पाऊस बरसत असल्याने काही ठिकाणी  शेतात पाणी साचल्यामुळे तूर, सोयाबीन पिवळी पडून वाढ खुंटल्याचे चित्र आहे. पाणी साचलेल्या ठिकाणी कुठेकुठे जागीच थिजले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे या संततधार पावसाने मोठे नुकसान झाले आहे. शेतामध्ये पाणी साचले आहे. त्यातच वन्यप्राणीही फिरत असल्याने पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. पावसाने काही दिवस उघडीप दिल्यास शेतीचे कामे करता येतील, अशी अशा शेतकरी बाळगून आहेत. 

पावसामुळे आंतर मशागतीला ब्रेककळमनुरी  शहर व परिसरात मागील आठ ते दहा दिवसांपासून पावसाची रिमरिप सुरूच आहे. आतापर्यंत तालुक्यात ४४६ मी.मी. पाऊस पडला आहे. दररोजच पाऊस पडत असल्याने शेतातील आंतरमशागतीला ब्रेक लागला आहे. जमिनीतून पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे सोयाबीन, ज्वारी, तुर, मुग, उडीद आदी पिके पिवळी पडत आहेत.  

संततधार पावसामुळे पिके पाण्यात जवळा बाजार  परिसरात गत दहा ते बारा दिवसांपासून सतत रिमझीम पाऊस तर अधूनमधून दमदार पाऊस होत असल्यामुळे शेतीची कामे ठप्प झाली असून शेतातील पिकांना तलावाचे स्वरुप आले आहे.

पिके कुजून जाण्याच्या मार्गावर वसमत तालुक्यातील कौठा  परिसरात संततधार पावसाचा आजचा तेरावा दिवस उजाडला असून या सततच्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतातील सर्वच पिकांवर परिणाम झाला आहे. अतिपावसाने हळद, कापूस, सोयाबीन इ. पिकांना धोका निर्माण झाला आहे. 

ओल्या दुष्काळाचे सावट सेनगाव तालुक्यातील कडोळी परिसरातील गारखेडा, तपोवन, भगवती, माझोड, गुगूळपिंपरी आदी गावांवर यंदा ओल्या दुष्काळाचे सावट आहे. अतिपावसामुळे या भागातील हळद, कापूस, ज्वारी, सोयाबीन, तुरीसह सर्वच पिकांचे नुकसान होत आहे.  या भागात पावसाने दहा ते बारा दिवसांपासून आतापर्यंत उघडीप दिली नाही. दररोज पाऊस पडत आहे. यामुळे शेतात ज्या ठिकाणी पाणी साचते, अशा ठिकाणची पिके हातची गेली. 

 

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊसFarmerशेतकरी