शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
4
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
5
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
8
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
9
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
10
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
12
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
13
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
14
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
15
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
16
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
17
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
18
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
19
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
20
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप

हिंगोलीत संततधार पावसाने पिकांचे मोठे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 18:23 IST

जिल्ह्यात ६ जून पासून संततधार पावसाने सर्वदूर हजेरी लावल्यामुळे शेतातील पिकांना  मोठा फटका बसला आहे.

ठळक मुद्दे सोयाबीन पिवळे पडले असून त्याची वाढही खुंटली आहे. ज्वारी, कापूस, उडीद, मूग, हळद या पिकांचेही नुकसान झाले आहे.

हिंगोली : जिल्ह्यात ६ जून पासून संततधार पावसाने सर्वदूर हजेरी लावल्यामुळे शेतातील पिकांना  मोठा फटका बसला आहे. सोयाबीन पिवळे पडले असून त्याची वाढही खुंटली आहे. तर ज्वारी, कापूस, उडीद, मूग, हळद या पिकांचेही नुकसान झाले आहे.

दहा ते बारा दिवसांपासून सूर्यदर्शन झाले नसल्याने पिकांना उन्हाचीही आवश्यकता असते. मात्र १० दिवसांपासून ऊन नसल्याने पिकांना पिवळेपण आले आहे. दररोजच पाऊस बरसत असल्याने काही ठिकाणी  शेतात पाणी साचल्यामुळे तूर, सोयाबीन पिवळी पडून वाढ खुंटल्याचे चित्र आहे. पाणी साचलेल्या ठिकाणी कुठेकुठे जागीच थिजले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे या संततधार पावसाने मोठे नुकसान झाले आहे. शेतामध्ये पाणी साचले आहे. त्यातच वन्यप्राणीही फिरत असल्याने पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. पावसाने काही दिवस उघडीप दिल्यास शेतीचे कामे करता येतील, अशी अशा शेतकरी बाळगून आहेत. 

पावसामुळे आंतर मशागतीला ब्रेककळमनुरी  शहर व परिसरात मागील आठ ते दहा दिवसांपासून पावसाची रिमरिप सुरूच आहे. आतापर्यंत तालुक्यात ४४६ मी.मी. पाऊस पडला आहे. दररोजच पाऊस पडत असल्याने शेतातील आंतरमशागतीला ब्रेक लागला आहे. जमिनीतून पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे सोयाबीन, ज्वारी, तुर, मुग, उडीद आदी पिके पिवळी पडत आहेत.  

संततधार पावसामुळे पिके पाण्यात जवळा बाजार  परिसरात गत दहा ते बारा दिवसांपासून सतत रिमझीम पाऊस तर अधूनमधून दमदार पाऊस होत असल्यामुळे शेतीची कामे ठप्प झाली असून शेतातील पिकांना तलावाचे स्वरुप आले आहे.

पिके कुजून जाण्याच्या मार्गावर वसमत तालुक्यातील कौठा  परिसरात संततधार पावसाचा आजचा तेरावा दिवस उजाडला असून या सततच्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतातील सर्वच पिकांवर परिणाम झाला आहे. अतिपावसाने हळद, कापूस, सोयाबीन इ. पिकांना धोका निर्माण झाला आहे. 

ओल्या दुष्काळाचे सावट सेनगाव तालुक्यातील कडोळी परिसरातील गारखेडा, तपोवन, भगवती, माझोड, गुगूळपिंपरी आदी गावांवर यंदा ओल्या दुष्काळाचे सावट आहे. अतिपावसामुळे या भागातील हळद, कापूस, ज्वारी, सोयाबीन, तुरीसह सर्वच पिकांचे नुकसान होत आहे.  या भागात पावसाने दहा ते बारा दिवसांपासून आतापर्यंत उघडीप दिली नाही. दररोज पाऊस पडत आहे. यामुळे शेतात ज्या ठिकाणी पाणी साचते, अशा ठिकाणची पिके हातची गेली. 

 

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊसFarmerशेतकरी