शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

हिंगोली जिल्ह्यात वर्षभरात ९९३ क्षयरूग्णांचा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 23:38 IST

क्षयरोग समूळ उच्चाटनासाठी आरोग्य यंत्रणेकडून क्षयरोग नियंत्रण मोहीम राबवून जनजागृती केली जात आहे. जानेवारी ते डिसेंबर २०१७ या वर्षात आरोग्य विभागाने मोहीम राबवून ९९३ क्षयरूगणांचा शोध घेतला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : क्षयरोग समूळ उच्चाटनासाठी आरोग्य यंत्रणेकडून क्षयरोग नियंत्रण मोहीम राबवून जनजागृती केली जात आहे. जानेवारी ते डिसेंबर २०१७ या वर्षात आरोग्य विभागाने मोहीम राबवून ९९३ क्षयरूगणांचा शोध घेतला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.भारतात दिवसेंदिवस क्षयरोग रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे देशातून टीबी हद्दपार करण्यासाठी २०२५ हे टार्गेट ठेवले आहे. परंतु खासगी रुग्णालयात टीबीवर उपचार घेणाऱ्या रुग्णांबाबत सरकारकडे माहिती नाही. त्यामुळे सरकारने टीबी रुग्णांची माहिती देणाºया खासगी डॉक्टरांना ५०० रूपये तर फार्मासिस्टना १००० रुपय मानधन देण्याचा निर्णय घेतला आहे. क्षयरोगबाधित रुग्ण पूर्णपणे उपचार घेत नाहीत, त्यामुळे क्षयरोग बरा होत नाही. जे की, रूग्णांना डॉक्टरांनी दिलेला संपूर्ण डोस वेळेत व नियमित घेणे आवश्यक आहे. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.राहूल गिते, प्रशांत तुपकरी यांनी केले आहे.जिल्ह्यात क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत ५ टिबी युनिट कार्यरत असून २९ आरोग्य संस्थेमार्फत कार्यक्रम राबविला जात आहे. क्षयरोग निदानासाठी १५ थुंकी तपासणी केंद्र कार्यरत आहेत. शासकीय आरोग्य संस्था, खासगी-व्यावसायीक, आशा, अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत रूग्णांना औषधोपचार दिला जात आहे. क्षयरोगाच्या अचूक व त्वरित निदानासाठी जिल्हा क्षयरोग्य केंद्र येथे जिन एक्सपर्ट सुविधेद्वारे १००३ चाचण्या केल्या. त्यापैकी २०३ रूग्ण शोधले असून १८ एमडीआर रूग्णांचा यात समावेश आहे. वर्षभरात ९९३ रूग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ताप, भूक मंदावणे, छातीत दुखणे असे लक्षणे दिसल्यास क्षयरोगाची चाचणी करून घ्यावी.क्षयरोगाचे जंतू मुख्यत: हवेतून पसरतात. फुुफुसाचा क्षयरोग झालेली रूग्ण ज्यावेळी खोकतो किंवा शिंकतो तेव्हा ते जंतू शरीरात प्रवेश करतात. जंतू सूक्ष्म थेंबाद्वारे हवेत पसरतात. निरोगी व्यक्ती जेव्हा श्वास घेतो, तेव्हा जंतू शरीरात प्रवेश करतात व क्षयरोग होऊन जंतूसंसर्ग होतो. मात्र संसर्ग झालेल्या सर्वच व्यक्तींना क्षयरोग होत नाही. त्या व्यक्तीच्या शरीरात हे जंतू वर्षानुवर्ष सुप्त अवस्थेत असतात. अशा संसर्गित व्यक्तीला बाधा होण्याची आयुष्यात १० टक्के शक्यता असते.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरHealthआरोग्यHingoliहिंगोली