शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
4
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
5
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
6
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
7
चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
8
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
9
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
10
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
11
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
12
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
13
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान
14
दिवाळीची भेट! सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा बोनस जाहीर; दसऱ्यापूर्वीच रक्कम हातात येणार
15
चमत्कार दाखवा आणि २१ लाख जिंका! अंनिसचे बुवा-बाबांना आव्हान; ३६ वर्षांत कोणीच पुढे आले नाही
16
Man-Animal Conflict: "आमचं सरकार तुमच्या प्रत्येक दुःखात सोबत", मुख्यमंत्री योगींचे पीडितांना आश्वासन
17
नमाज पढत होते विद्यार्थी, तेवढ्यात झाला मोठा आवाज, शाळेची इमारत कोसळून ६५ विद्यार्थी अडकले 
18
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
19
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो
20
खून करुन आलोय, मुलींकडे लक्ष द्या; पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकून केले वार, कोल्हापुरात हत्येचा थरार

हिंगोली जिल्ह्यात वर्षभरात ९९३ क्षयरूग्णांचा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 23:38 IST

क्षयरोग समूळ उच्चाटनासाठी आरोग्य यंत्रणेकडून क्षयरोग नियंत्रण मोहीम राबवून जनजागृती केली जात आहे. जानेवारी ते डिसेंबर २०१७ या वर्षात आरोग्य विभागाने मोहीम राबवून ९९३ क्षयरूगणांचा शोध घेतला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : क्षयरोग समूळ उच्चाटनासाठी आरोग्य यंत्रणेकडून क्षयरोग नियंत्रण मोहीम राबवून जनजागृती केली जात आहे. जानेवारी ते डिसेंबर २०१७ या वर्षात आरोग्य विभागाने मोहीम राबवून ९९३ क्षयरूगणांचा शोध घेतला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.भारतात दिवसेंदिवस क्षयरोग रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे देशातून टीबी हद्दपार करण्यासाठी २०२५ हे टार्गेट ठेवले आहे. परंतु खासगी रुग्णालयात टीबीवर उपचार घेणाऱ्या रुग्णांबाबत सरकारकडे माहिती नाही. त्यामुळे सरकारने टीबी रुग्णांची माहिती देणाºया खासगी डॉक्टरांना ५०० रूपये तर फार्मासिस्टना १००० रुपय मानधन देण्याचा निर्णय घेतला आहे. क्षयरोगबाधित रुग्ण पूर्णपणे उपचार घेत नाहीत, त्यामुळे क्षयरोग बरा होत नाही. जे की, रूग्णांना डॉक्टरांनी दिलेला संपूर्ण डोस वेळेत व नियमित घेणे आवश्यक आहे. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.राहूल गिते, प्रशांत तुपकरी यांनी केले आहे.जिल्ह्यात क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत ५ टिबी युनिट कार्यरत असून २९ आरोग्य संस्थेमार्फत कार्यक्रम राबविला जात आहे. क्षयरोग निदानासाठी १५ थुंकी तपासणी केंद्र कार्यरत आहेत. शासकीय आरोग्य संस्था, खासगी-व्यावसायीक, आशा, अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत रूग्णांना औषधोपचार दिला जात आहे. क्षयरोगाच्या अचूक व त्वरित निदानासाठी जिल्हा क्षयरोग्य केंद्र येथे जिन एक्सपर्ट सुविधेद्वारे १००३ चाचण्या केल्या. त्यापैकी २०३ रूग्ण शोधले असून १८ एमडीआर रूग्णांचा यात समावेश आहे. वर्षभरात ९९३ रूग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ताप, भूक मंदावणे, छातीत दुखणे असे लक्षणे दिसल्यास क्षयरोगाची चाचणी करून घ्यावी.क्षयरोगाचे जंतू मुख्यत: हवेतून पसरतात. फुुफुसाचा क्षयरोग झालेली रूग्ण ज्यावेळी खोकतो किंवा शिंकतो तेव्हा ते जंतू शरीरात प्रवेश करतात. जंतू सूक्ष्म थेंबाद्वारे हवेत पसरतात. निरोगी व्यक्ती जेव्हा श्वास घेतो, तेव्हा जंतू शरीरात प्रवेश करतात व क्षयरोग होऊन जंतूसंसर्ग होतो. मात्र संसर्ग झालेल्या सर्वच व्यक्तींना क्षयरोग होत नाही. त्या व्यक्तीच्या शरीरात हे जंतू वर्षानुवर्ष सुप्त अवस्थेत असतात. अशा संसर्गित व्यक्तीला बाधा होण्याची आयुष्यात १० टक्के शक्यता असते.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरHealthआरोग्यHingoliहिंगोली