शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

हिंगोली जिल्ह्यात २५४ पाणीनमुने दूषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 00:17 IST

हिंगोली : जिल्ह्यात पावसाळ्यानंतर अनेक जलस्त्रोतांना पाणी आले. मात्र अशा स्त्रोतांमध्ये ब्लिचिंग पावडरचा वापर न केल्याने दूषित पाण्याचे प्रमाण वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. जिल्ह्यात ९३२ पैकी २७८ पाणीनमुने दूषित आढळले. यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य धोक्यात येण्याची भीती आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात पावसाळ्यानंतर अनेक जलस्त्रोतांना पाणी आले. मात्र अशा स्त्रोतांमध्ये ब्लिचिंग पावडरचा वापर न केल्याने दूषित पाण्याचे प्रमाण वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. जिल्ह्यात ९३२ पैकी २७८ पाणीनमुने दूषित आढळले. यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य धोक्यात येण्याची भीती आहे.जिल्ह्यात यंदा चांगले पर्जन्यमान होत आहे. तर ढगाळ वातावरण कायम राहात आहे. अशा परिस्थितीत आरोग्यविषयक समस्या निर्माण होण्याची भीती असते. त्यातच पाणी दूषित प्यायल्यास साथीच्या आजारांना निमंत्रण देण्यासारखेच असते. मात्र तरीही अनेक ठिकाणी ग्रामपंचायतींकडून पाण्यात ब्लिचिंग पावडरचा वापर केला जात नाही. परिणामी, ग्रामस्थांना तेच पाणी पिण्याची वेळ येते. मागील महिन्यात केलेल्या पाणीनमुने तपासणीत ही बाब समोर आली आहे. यात प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय तपासलेल्या नमुन्यांसह दूषित आढळलेल्या नमुन्यांचे चित्र पुढीलप्रमाणे आहे. हिंगोली तालुक्यात नर्सी नामदेव ३८ पैकी १८, भांडेगाव ४५ पैकी ०, सिरसम ३० पैकी ११, फाळेगाव ३६ पैकी ०, तर वसतममध्ये हट्ट्यात २५ पैकी ०, कुरूंद्यात ५५ पैकी ४, हयातनगर ३४ पैकी ९, गिरगाव १७ पैकी १0, टेंभूर्णी ३७ पैकी ५, पागंरा शिंदे ४८ पैकी ९, कळमनुरीमध्ये आखाडा बाळापूर २० पैकी १०, डोंगरकड्यात ४२ पैकी ११, रामेश्वर तांडा ४८ पैकी २८, पोतरा ५२ पैकी २८, मसोड ३८ पैकी ५, वाकोडी ९३ पैकी ५३, तर सेनगावमध्ये गोरेगाव ३१ पैकी ५, कवठा २३ पैकी १६, साखरा ६१ पैकी ८, कापडसिंगी ४० पैकी २५, तर औंढा नागनाथ तालुक्यात जवळा बाजार ३९ पैकी ४, शिरड शहापूर ३० पैकी ५, पिंपळदरी ३१ पैकी ७, लोहरा १९ पैकी ७ असे ९३२ पैकी २७८ पाणीनमुने दूषित आढळून आले आहेत.ब्लिचिंग पावडर : १ नमुना अप्रमाणितजिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये ब्लिचिंग पावडर नाही. मात्र ६३ ग्रामपंचायतींच्या ब्लिचिंग पावडवरचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीस पाठविण्यात आले होते. त्यापैकी एक अप्रमाणित असल्याचे आढळून आले आहे. जवळा बाजार प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गतचे हे गाव आहे.आखाडा बाळापूर, गिरगाव, हयातनगर या आरोग्य केंद्रांनी तर एकाही ठिकाणी ब्लिचिंग पावडरची तपासणी केली नाही. इतरांनीही एक-दोन नमुने घेत औपचारिता पूर्ण केली. डोंगरकड्यात सर्वाधिक ८ नमुने तपासण्यात आले आहेत.ग्रामपंचायतींनी पावसाळ्याचे दिवस असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून ब्लिचिंग पावडरचा वापर करून शुद्ध पाणीपुरवठा होईल, याची काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडुन करण्यात आले.

टॅग्स :HingoliहिंगोलीWaterपाणी