शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

हिंगोलीत मंडप डेकोरेटर्स आणि कामगारांचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2020 15:22 IST

५०० जणांच्या उपस्थितीत विवाह सोहळा साजरा करण्यास परवानगी देण्याची मागणी

ठळक मुद्देआंदोलकांनी जिल्हा कचेरीसमोर बॅण्ड, डी.जे, विवाह सोहळ्यासाठी लागणारे साहित्यही आणून ठेवले

हिंगोली : जिल्ह्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे.  तरीही ५०० लाेकांच्या उपस्थितीत विवाह सोहळ्याला परवानगी दिली नसल्याने हिंगोली जिल्हा टेन्ट अॅण्ड डेकोरेटर असोसिएशन तथा विवाह सेवा संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. 

मागील काही दिवसांपासून हिंगोली जिल्ह्यात ५०० जणांच्या उपस्थितीत विवाह सोहळा साजरा करण्यास परवानगी देण्याची मागणी केली जात आहे. सध्या तशी परवानगी नसल्याने मंडप, डेकोरेटर्स, आचारी, फुल-हार विक्रेते, फेटेवाले, वाढपी, ऑर्केस्ट्राॅ, छायाचित्रकार, बॅण्डपथक, डीजेवाले, वाढपी, स्वागत पथके, लॉन्सवाले, मंगल कार्यालये अशा विविध घटकांचे नुकसान होत असल्याचे म्हटले आहे. आज सकाळी दहाच्या सुमारास या सर्व घटकांनी एकत्रितपणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. 

यात संबंधितांनी जिल्हा कचेरीसमोर बॅण्ड, डी.जे, विवाह सोहळ्यासाठी लागणारे साहित्यही आणून ठेवले असल्याचे पहायला मिळाले. तर या व्यवसायात काम करणारे शेकडो कामगारही या आंदोलनात सहभागी झाले आहेत. यावेळी शासनाने ५०० लोकांच्या उपस्थितीत विवाह सोहळा घेण्यासाठी परवानगी देण्याच्या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजीही करण्यात येत होती. या घोषणांनी जिल्हा कचेरीचा परिसर दणाणून गेला होता. काळे टीशर्ट घालून आंदोलक सहभागी झाले होते. तर विविध प्रकारचे फलकही लावण्यात आले होते.

टॅग्स :agitationआंदोलनCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकHingoliहिंगोली