शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

हिंगोलीत धरणग्रस्तांनी काढला जिल्हा कचेरीवर मोर्चा

By विजय पाटील | Updated: October 2, 2023 19:13 IST

कुटुंबांना न्याय देण्यासाठी पुन्हा सर्व्हे करण्याची मागणी धरणग्रस्तांनी केली.

हिंगोली : धरणग्रस्त विकास संघर्ष समितीच्या वतीने २ ऑक्टोबर रोजी विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चात विविध भागातून आलेले विस्थापित मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

जिल्ह्यात इसापूर, येलदरी, सिद्धेश्वर धरणांमध्ये अनेक गावे गेली. या सर्व बाधितांचे सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक सर्व्हे करून जीवनमान तपासण्याची मागणी करण्यात आली. तर त्यांचे शासकीय नियमाप्रमाणे पुनर्वसन झाले नाही. त्या तुलनेत आर्थिक मोबदला मिळाला नाही. धरणग्रस्तांना प्रकल्पग्रस्ताचे प्रमाणपत्र मिळाले नाही. त्या तुलनेत नोकरीत संधी मिळाल्या नाहीत. हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली गेली. आता भूमिहीन झालेली ही मंडळी वेठबिगारीचे दिवस कंठत आहे. त्यामुळे अजूनही या कुटुंबीयांचे हाल होत आहेत.

या कुटुंबांना न्याय देण्यासाठी पुन्हा सर्व्हे करण्याची मागणी धरणग्रस्तांनी केली. यामध्ये आठ ते दहा प्रकारच्या विविध मागण्या मांडण्यात आल्या आहेत. अहिल्यादेवी होळकर चौकात आधी धरणग्रस्तांची परिषद झाली. या परिषदेत मान्यवरांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर परिषदेत सहभागी झालेली सर्व मंडळी मोर्चा काढून जिल्हा कचेरीवर धडकली. तेथे नायब तहसीलदार जोशी यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी धरणग्रस्तांनी आपल्या विविध मागण्या घोषणा देत मांडल्या. यामध्ये विविध पक्षांची नेतेमंडळीही सहभागी झाली होती. धरणग्रस्तांच्या या मागण्यांना काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, भाजप, प्रहार जनशक्ती आदी पक्षांच्या मंडळींनी पाठिंबा दिल्याचे दिसून येत होते.

टॅग्स :Hingoliहिंगोली