शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

हिंगोलीत धरणग्रस्तांनी काढला जिल्हा कचेरीवर मोर्चा

By विजय पाटील | Updated: October 2, 2023 19:13 IST

कुटुंबांना न्याय देण्यासाठी पुन्हा सर्व्हे करण्याची मागणी धरणग्रस्तांनी केली.

हिंगोली : धरणग्रस्त विकास संघर्ष समितीच्या वतीने २ ऑक्टोबर रोजी विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चात विविध भागातून आलेले विस्थापित मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

जिल्ह्यात इसापूर, येलदरी, सिद्धेश्वर धरणांमध्ये अनेक गावे गेली. या सर्व बाधितांचे सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक सर्व्हे करून जीवनमान तपासण्याची मागणी करण्यात आली. तर त्यांचे शासकीय नियमाप्रमाणे पुनर्वसन झाले नाही. त्या तुलनेत आर्थिक मोबदला मिळाला नाही. धरणग्रस्तांना प्रकल्पग्रस्ताचे प्रमाणपत्र मिळाले नाही. त्या तुलनेत नोकरीत संधी मिळाल्या नाहीत. हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली गेली. आता भूमिहीन झालेली ही मंडळी वेठबिगारीचे दिवस कंठत आहे. त्यामुळे अजूनही या कुटुंबीयांचे हाल होत आहेत.

या कुटुंबांना न्याय देण्यासाठी पुन्हा सर्व्हे करण्याची मागणी धरणग्रस्तांनी केली. यामध्ये आठ ते दहा प्रकारच्या विविध मागण्या मांडण्यात आल्या आहेत. अहिल्यादेवी होळकर चौकात आधी धरणग्रस्तांची परिषद झाली. या परिषदेत मान्यवरांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर परिषदेत सहभागी झालेली सर्व मंडळी मोर्चा काढून जिल्हा कचेरीवर धडकली. तेथे नायब तहसीलदार जोशी यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी धरणग्रस्तांनी आपल्या विविध मागण्या घोषणा देत मांडल्या. यामध्ये विविध पक्षांची नेतेमंडळीही सहभागी झाली होती. धरणग्रस्तांच्या या मागण्यांना काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, भाजप, प्रहार जनशक्ती आदी पक्षांच्या मंडळींनी पाठिंबा दिल्याचे दिसून येत होते.

टॅग्स :Hingoliहिंगोली