शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

हिंगोलीत २२ तास ताटकळले ‘त्या’ बालकाचे प्रेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 15:26 IST

भूमिगत गटार योजनेच्या खोदकामाच्या खड्ड्यातील पाण्यात बुडून मंगळवारी (दि.१९ ) सायंकाळी शेख इब्राहिम शेख खिजर या बालकाचा मृत्यू झाला.

हिंगोली : भूमिगत गटार योजनेच्या खोदकामाच्या खड्ड्यातील पाण्यात बुडून मंगळवारी (दि.१९ ) सायंकाळी शेख इब्राहिम शेख खिजर या बालकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी बालकाचा २२ तास अंत्यविधी थांबला होता. अखेर कंदाटदारावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया  सुरू झाल्याने प्रकरण शांत झाले. 

१९ जून रोजी रिसाला बाजार भागात जिल्हा रूग्णालयासमोर सायंकाळी ५ वाजता ही घटना घडली. रात्री उशिरा शवविच्छेदन झाले होते. मात्र गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता. त्यातच रात्र उलटून आज दुपारी २ वाजेपर्यंत यावर निर्णय झाला नव्हता. हिंगोली शहर पोलीस ठाण्यात अतिरिक्त पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांनी केवळ कंत्राटदारावरच गुन्हा दाखल होवू शकते हे समजावले. मात्र जमाव ऐकत नव्हता. शेवटी मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. 

शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने पोलीस बंदोबस्त वाढवला होता. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सुद्धा तणाव होता. जिल्हा कचेरीत जाऊनही निवेदन न देता शिष्टमंडळ नंतर परत आले. काही जणांनी मयताच्या नातेवाइकांना समजावले. शेवटी कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यास नातेवाईक पोलीस ठाण्यात आले. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. 

टॅग्स :Deathमृत्यूHingoli policeहिंगोली पोलीस