शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

हिंगोली शहरातील वाहतुकीचा प्रश्न बनला गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 01:14 IST

शहरातील वाहतुकीचा प्रश्न दिवसेेंदिवस गंभीर बनत चालला आहे. चौका-चौकात वाहने शिस्तीत लावली जात नाहीत. जड वाहतूकही शहरातून धावते. याचा फटका सर्वसामान्य जनतेला सहन करावा लागतो. यामुळे गांधी चौकासारख्या गजबजलेल्या भागात दररोज किरकोळ अपघात घडत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शहरातील वाहतुकीचा प्रश्न दिवसेेंदिवस गंभीर बनत चालला आहे. चौका-चौकात वाहने शिस्तीत लावली जात नाहीत. जड वाहतूकही शहरातून धावते. याचा फटका सर्वसामान्य जनतेला सहन करावा लागतो. यामुळे गांधी चौकासारख्या गजबजलेल्या भागात दररोज किरकोळ अपघात घडत आहेत.हिंगोली शहरातील वाहतुकीचा प्रश्न कायमच गंभीर असतो. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या दिवशी तर चांगलेच वाभाडे निघाले होते. त्यानंतर पुन्हा दोन दिवस सुधारणेचे वारे वाहू लागले होते. वरिष्ठ पोलीस अधिकारी मनावर घेत असल्याचे दाखवून एका दिवसापुरते या प्रश्नाकडे पाहतात. पुन्हा त्यांनी पाठ फिरविली की, खालची मंडळी याकडे दुर्लक्ष करीत आहे. या विभागाला कधीच पूर्णवेळ अधिकारी मिळत नाही. पोलीस निरीक्षक सुडके यांच्या रुपाने काही काळ पूर्णवेळ अधिकारी मिळाला होता. आता सुडके यांना ग्रामीण पोलीस ठाण्याचा अतिरिक्त पदभार दिला आहे. त्यामुळे त्यांना दोन्हीकडचा कारभार सांभाळणे अवघड झाले आहे. जिल्ह्यात अधिकाऱ्यांची कमतरता आहे, ही बाब मान्य. मात्र हिंगोली शहरात आता पूर्णवेळ अधिकारी नियुक्त करून वाहतूक शिस्त निर्माण करणे गरजेचे आहे. शहराचा होणारा विस्तार लक्षात घेता परिस्थिती अशीच राहिली तर आगामी काळात हा प्रश्न आणखी गंभीर होणार आहे. मात्र ही बाब मनावर घेणारा अधिकारी हिंगोलीत येण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीस