शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

हिंगोलीत वाळूघाट लिलावाला पुन्हा ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 01:17 IST

मागील दोन वर्षांत वाळू घाट लिलाव होत नसल्याने यंदा तरी वाळूघाटाचे लिलाव होतील, अशी अपेक्षा होती. मात्र एका न्यायालय याचिकेनंतर घाट लिलावाची प्रक्रिया पुन्हा ठप्प झाली आहे.

ठळक मुद्दे २६ घाटांसाठी सुरू होती प्रक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : मागील दोन वर्षांत वाळू घाट लिलाव होत नसल्याने यंदा तरी वाळूघाटाचे लिलाव होतील, अशी अपेक्षा होती. मात्र एका न्यायालय याचिकेनंतर घाट लिलावाची प्रक्रिया पुन्हा ठप्प झाली आहे. २६ घाटांच्या लिलावासाठी जिल्हा कचेरीतील गौण खनिज विभागाने तयारी पूर्ण केली होती.मागील दोन वर्षांत वाळू घाट लिलावात जात नसल्याने मोठी बोंब होत होती. वाळूघाटांचे दर लिलावातील स्पर्धेत वाढले. आता ते दर परवडत नसल्याचे सांगून कंत्राटदार लिलावाकडे कानाडोळा करीत आहेत. यामुळे जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी शासनास प्रस्ताव पाठवून दर कमी करण्याची मागणी केली होती. जवळपास १२ रुपये प्रतिब्रास एवढे दर खाली आले आहेत. मात्र लिलावात स्पर्धा झाल्यास ते वाढण्याचीही भीती आहे. आता पुन्हा बांधकामांचा हंगाम सुरू होण्याची वेळ आली असली तरीही घाटच बंद असल्याने वाळू मिळत नाही. काही ठिकाणचे साठे विकल्यानंतर आता कुठेच वाळू शिल्लक नाही. त्यामुळे बांधकामे ठप्प आहेत. वाळू घाटांचे लिलाव करण्याची मागणी करणारी निवेदने प्रशासनाला दिली जात आहेत. हिंगोली, कळमनुरीत काही कारागिरांनी निवेदने दिली होती. यंदा वाळूघाट लिलावाच्या पहिल्या टप्प्याची प्रक्रिया सुरू झालीही होती. मात्र नागपूर खंडपीठात दाखल झालेल्या याचिकेनंतर ती ठप्प झाली. उलट लिलाव झाला असल्यास ते घाटही शासनाच्या ताब्यात घेण्याचा आदेश दिलेला आहे. त्यामुळे यंदाही वाळूघाट लिलाव न झाल्यास कारागिरांवर उपासमार कायम राहणार आहे. सध्या काही भागात चोरटी वाहतूक होत आहे. मात्र या वाळूचे दर सामान्यांना न परवडणारे आहेत. ही वाहतूक रोखण्याच्या प्रयत्नात काही जणांनी तर तलाठ्यावरच जीवघेणा हल्ला केला आहे. औंढा पोलिसांत याबाबत गुन्हा दाखल झाला.वाळू घाटांचा लिलाव न झाल्यास कामगारांचे स्थलांतरयंदा सर्वच घाटांच्या लिलावाची प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. एकूण २८ हजार वाळू सर्व घाटांतून उपलब्ध होणार आहे. कंत्राटदारांमध्ये जीवघेणी स्पर्धा न लागल्यास सामान्यांना आवाक्यातील दर मिळू शकतील. मात्र त्यांच्यातील नाहक स्पर्धेत सामान्यांना फटका बसत आहे. ३५ ते ४0 हजार रुपयांत टिप्पर हा दर देवून वाळू विकत घेणे म्हणजे सोन्याचाच भाव देण्यासारखे घडत आहे. यंदा दुष्काळामुळे बांधकामांकडे आधीच तेवढा कल नाही. त्यात वाळू घाट लिलावही न झाल्यास बांधकाम कारागिरांना मात्र स्थलांतराशिवाय कोणताच पर्याय दिसत नाही.

 

टॅग्स :HingoliहिंगोलीsandवाळूCourtन्यायालय