शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

हिंगोलीत वाळूघाट लिलावाला पुन्हा ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 01:17 IST

मागील दोन वर्षांत वाळू घाट लिलाव होत नसल्याने यंदा तरी वाळूघाटाचे लिलाव होतील, अशी अपेक्षा होती. मात्र एका न्यायालय याचिकेनंतर घाट लिलावाची प्रक्रिया पुन्हा ठप्प झाली आहे.

ठळक मुद्दे २६ घाटांसाठी सुरू होती प्रक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : मागील दोन वर्षांत वाळू घाट लिलाव होत नसल्याने यंदा तरी वाळूघाटाचे लिलाव होतील, अशी अपेक्षा होती. मात्र एका न्यायालय याचिकेनंतर घाट लिलावाची प्रक्रिया पुन्हा ठप्प झाली आहे. २६ घाटांच्या लिलावासाठी जिल्हा कचेरीतील गौण खनिज विभागाने तयारी पूर्ण केली होती.मागील दोन वर्षांत वाळू घाट लिलावात जात नसल्याने मोठी बोंब होत होती. वाळूघाटांचे दर लिलावातील स्पर्धेत वाढले. आता ते दर परवडत नसल्याचे सांगून कंत्राटदार लिलावाकडे कानाडोळा करीत आहेत. यामुळे जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी शासनास प्रस्ताव पाठवून दर कमी करण्याची मागणी केली होती. जवळपास १२ रुपये प्रतिब्रास एवढे दर खाली आले आहेत. मात्र लिलावात स्पर्धा झाल्यास ते वाढण्याचीही भीती आहे. आता पुन्हा बांधकामांचा हंगाम सुरू होण्याची वेळ आली असली तरीही घाटच बंद असल्याने वाळू मिळत नाही. काही ठिकाणचे साठे विकल्यानंतर आता कुठेच वाळू शिल्लक नाही. त्यामुळे बांधकामे ठप्प आहेत. वाळू घाटांचे लिलाव करण्याची मागणी करणारी निवेदने प्रशासनाला दिली जात आहेत. हिंगोली, कळमनुरीत काही कारागिरांनी निवेदने दिली होती. यंदा वाळूघाट लिलावाच्या पहिल्या टप्प्याची प्रक्रिया सुरू झालीही होती. मात्र नागपूर खंडपीठात दाखल झालेल्या याचिकेनंतर ती ठप्प झाली. उलट लिलाव झाला असल्यास ते घाटही शासनाच्या ताब्यात घेण्याचा आदेश दिलेला आहे. त्यामुळे यंदाही वाळूघाट लिलाव न झाल्यास कारागिरांवर उपासमार कायम राहणार आहे. सध्या काही भागात चोरटी वाहतूक होत आहे. मात्र या वाळूचे दर सामान्यांना न परवडणारे आहेत. ही वाहतूक रोखण्याच्या प्रयत्नात काही जणांनी तर तलाठ्यावरच जीवघेणा हल्ला केला आहे. औंढा पोलिसांत याबाबत गुन्हा दाखल झाला.वाळू घाटांचा लिलाव न झाल्यास कामगारांचे स्थलांतरयंदा सर्वच घाटांच्या लिलावाची प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. एकूण २८ हजार वाळू सर्व घाटांतून उपलब्ध होणार आहे. कंत्राटदारांमध्ये जीवघेणी स्पर्धा न लागल्यास सामान्यांना आवाक्यातील दर मिळू शकतील. मात्र त्यांच्यातील नाहक स्पर्धेत सामान्यांना फटका बसत आहे. ३५ ते ४0 हजार रुपयांत टिप्पर हा दर देवून वाळू विकत घेणे म्हणजे सोन्याचाच भाव देण्यासारखे घडत आहे. यंदा दुष्काळामुळे बांधकामांकडे आधीच तेवढा कल नाही. त्यात वाळू घाट लिलावही न झाल्यास बांधकाम कारागिरांना मात्र स्थलांतराशिवाय कोणताच पर्याय दिसत नाही.

 

टॅग्स :HingoliहिंगोलीsandवाळूCourtन्यायालय