शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

हिंगोलीत १६ परीक्षार्थी रेस्टिकेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 23:31 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे २०१८ वर्षातील दहावी बारावीची परीक्षा घेण्यात आली. जिल्ह्यात इयत्ता बारावी ३१ तर दहावीच्या ५३ परीक्षा केंद्रावरून विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येत आहे. परीक्षेत नक्कल करणाऱ्या एकूण १६ जणांना पकडण्यात आले असून त्यांना रेस्टिकेट केल्याची माहिती शिक्षण विभागातर्फे देण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : महाराष्ट्र माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे २०१८ वर्षातील दहावी बारावीची परीक्षा घेण्यात आली. जिल्ह्यात इयत्ता बारावी ३१ तर दहावीच्या ५३ परीक्षा केंद्रावरून विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येत आहे. परीक्षेत नक्कल करणाऱ्या एकूण १६ जणांना पकडण्यात आले असून त्यांना रेस्टिकेट केल्याची माहिती शिक्षण विभागातर्फे देण्यात आली.औरंगाबाद बोर्डातर्फे शैक्षणिक वर्ष २०१८ दहावीची परीक्षा घेण्यात येत आहे. आज २४ मार्च रोजी ११ ते २ यावेळेत दहावीचा ‘आयसीटी’ शेवटचा पेपर घेण्यात येणार आहे. दहावी-बारावी परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पडावी यासाठी शिक्षण विभाग व प्रशासकीय यंत्रणेकडून नियोजन करण्यात आले. फिरत्या पथकाने विविध केंद्रांना भेटी दिल्या. जिल्हाधिकारी अनिल भंडारी, मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड यांनीही परीक्षा केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली. परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पडावी यासाठी माध्यमिक शिक्षणाधिकारी, डायटचे प्राचार्य प्रा. शिक्षणाधिकारी, महसूल विभाग असे ५ फिरते पथक नेमण्यात आले. बैठे पथकाद्वारेही परीक्षास्थळी कॉपी करणाºयांवर वॉच ठेवण्यात आला.परंतु जिल्ह्यातील अनेक परीक्षा केंद्रावर नक्कल करताना विद्यार्थी आढळुन आले. कॉपी बहाद्दरांना भरारी पथकाने रस्टिकेट केले. परीक्षेतून हद्दपार केल्याने या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या नियमानुसार सहा महिने परीक्षा देता येणार नाही, असे शिक्षण विभागातर्फे सांगण्यात आले.१३५५ विद्यार्थी गैरहजर२१ फेबु्रवारी ते मार्च २० कालावधीत बारावीतील विद्यार्थ्यांची तर १ ते २४ मार्चदरम्यान दहावीतील विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली. दहावीतील १७ हजार ८६९ पैकी १६ हजार ९३४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ९३५ विद्यार्थी परीक्षेस गैरहजर होते. बारावीतील १२ हजार ५७१ पैकी १२ हजार १५१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर ४२० एकूण १३५५ विद्यार्थ्यांनी परीक्षेस गैरहजर राहिले.दहावी व बारावीची परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी परीक्षा विभागातर्फे नियोजन करण्यात आले. दक्षता समितीचे अध्यक्ष मा. शिक्षणाधिकारी दीपक चवणे तसेच प्रा. शिक्षणाधिकारी डी. के. इंगोले, डायटचे प्राचार्य गणेश शिंदे, उपशिक्षणाधिकारी तानाजी भोसले आदींनी परीक्षा केंद्रांना भेट देऊनसुरळीत सुरू आहे, किंवा नाही याबाबत प्रत्यक्षपणे पाहणी केली. तर काही संशयित परीक्षा केंद्रावर पथकातील अधिकारी तळ ठोकून होते. परीक्षा विभागातील पी. वाय. कटके, एस. जे. वडकुते, एम. ए. सय्यद, जी. पी. पळसकर, विनोद करंडे आदींनी काम पाहिले.जिल्ह्यातील विविध केंद्रावरून घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीतील एकूण ७ विद्यार्थ्यांना तर बारावीतील एकूण ९ परीक्षार्थ्यांना कॉपी करताना पथकाने पकडले.

टॅग्स :examपरीक्षाStudentविद्यार्थीHingoliहिंगोली