शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
3
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
4
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
5
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
6
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
7
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
8
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
9
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
10
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
11
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
12
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
13
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
14
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
15
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
16
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
17
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
18
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
19
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
20
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान

हिंगोलीत वर्षभरात वीजेचा धक्का लागून १४ गतप्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2019 16:12 IST

अचानक वीजेचा शॉक लागुन मृत्यू ओढवल्यास मयताच्या कुटुंबियांना महावितरणकडून आर्थिक मदत जाहिर केली जाते.

हिंगोली : पावसाळ्यात विद्युत अपघातामुळे जीवित व वित्तहानीच्या वाढत्या घटना ही चिंताजनक बाब बनली आहे. विद्युत अपघात टाळण्यासाठी सर्वांनीच सावधानता बाळगणे आवश्यक आहे. मात्र अनेकदा वीज उपकरणे हाताळताना हयगयी केली जाते. शिवाय महावितरणच्या बेजबाबदार अधिकारी कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळेही अनेक दुर्घटना घडतात. त्यामुळे वीजेचा शॉक लागून मृत्यू होतो.

जिल्ह्यामध्ये एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ या कालावधीत १४ जणांचा वीजेचा शॉक लागून मृत्यू झाला आहे. तर विविध घटनेत ५ जनावरे दगावल्याची नोंद महावितरण दरबारी करण्यात आली आहे. त्यामुळे  प्रत्येकाने घरात, शेतात विद्युत उपकरणे हाताळताना सावधानता बाळगावी असे आवाहन केले जात आहे. वादळी वाऱ्यामुळे पावसाळ्यात वीजेच्या तारा तुटणे, खांब वाकणे, पडणे, रोहित्र वाकणे वा पडणे, वीजतारांवर झाड किंवा झाडांची फांदी तुटून पडणे अशा घटना घडतात. अशावेळी महावितरणने वेळीच खबदारी घेऊन दुरूस्तीचे कामे हाती घेणे आवश्यक आहे. तसेच पाऊस चालु असताना रोहित्र, खांबाजवळ किंवा वीजतारांखाली थांबणे टाळले पाहिजे.

अचानक वीजेचा शॉक लागुन मृत्यू ओढवल्यास मयताच्या कुटुंबियांना महावितरणकडून आर्थिक मदत जाहिर केली जाते. परंतु ही प्रक्रिया किचकट असल्याने अनेकांना याचा लाभ मिळत नाही. किंवा यात बराच कालावधी जाते. घरातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास मयताचे कुटुंब उघड्यावर येते. अशावेळी महावितरण प्रशासनाने वेळोवेळी दखल घेणे गरजेचे असून तशी मागणीही नागरिकांतून केली जात आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीDeathमृत्यूelectricityवीज