शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

हिंगोली जिल्ह्यात कोसळधार; पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला, पिकांसह जमीन खरडली

By रमेश वाबळे | Updated: July 22, 2023 13:02 IST

असोला शिवारात बंधारा वाहून गेला तर साटंबा येथे शेततळे फुटल्याने पिकांसह जमीन खरडली

हिंगोली : जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून पावसाचा जोर कायम असून नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत. २२ जुलै रोजी सेनगाव तालुक्यात गोरेगाव -कडोळी तर कळमनुरी तालुक्यात आखाडा बाळापूर- पिपंरी मार्गावरील गावांचा पुरामुळे संपर्क तुटला आहे. औंढा नागनाथ तालुक्यातील असोला शिवारात बंधारा वाहून गेला. तसेच हिंगोली तालुक्यातील साटंबा शिवारात शेततळे फुटल्याने नुकसान झाले. वसमत तालुक्यातील आसना नदीचे पाणीही शेतात शिरल्याने नुकसान झाले.

जिल्ह्यात यंदा सुमारे वीस दिवस लांबलेल्या पावसाने १८ जुलैपासून जोरदार सुरूवात केली. मागील दोन दिवसांपासून संततधार सुरू असून, शेतशिवारातील ओढे- नाले भरून वाहत आहेत. तर हिंगोली शहराजवळील कयाधू नदीचे पात्रही दुथडी भरून वाहत आहे. तसेच सततच्या पावसामुळे औंढा तालुक्यातील असोला शिवारातील बंधारा वाहून गेल्यामुळे शेतात पाणी शिरल्याने पिकांसह जमीन खरडून गेली. तर साटंबा शिवारात शेततळे फुटले. तसेच वसमत तालुक्यातील आसना नदीचे पाणीही शेतात शिरल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. या पावसाचा बाजारपेठेवरही परिणाम झाला आहे.

सेनगाव तालुक्यातील गोरेगाव भागात शुक्रवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे गोरेगाव - कडोळी मार्गावरील ओढ्याला पूर आल्याने पुलावरून दोन ते तीन फुटापर्यंत पाणी वाहत आहे. त्यामुळे या मार्गावरील कडोही, गारखेडा, तपोवन, भगवती, माझोड, गुगुळ पिंपरी या गावचा संपर्क तुटला आहे. गोरेगाव येथील शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांनाही पुरामुळे शाळा गाठता आली नाही.तसेच कळमनुरी तालुक्यात आखाडा बाळापूरनजीक पिंपरी जवळील पुलावरून दोन फुटापर्यंत पाणी वाहत असल्याने आखाडा बाळापूरशी कान्हेगाव, चिखली, पिंपरी गावचा संपर्क तुटला आहे.

टॅग्स :RainपाऊसHingoliहिंगोलीFarmerशेतकरी