शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

बाजारपेठेत जाताय मोबाइल सांभाळा; महिन्यात दहा तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:36 IST

हिंगोली : शहरातील गांधी चौक बाजार, जवाहर रोड, भाजी मंडई, बसस्थानक परिसरात जाताय तर आपला मोबाइल सांभाळून ठेवा, अशी ...

हिंगोली : शहरातील गांधी चौक बाजार, जवाहर रोड, भाजी मंडई, बसस्थानक परिसरात जाताय तर आपला मोबाइल सांभाळून ठेवा, अशी सांगण्याची वेळ आली आहे. शहरातील या भागात नागरिकांचे मोबाइल चोरीला, हरवल्याच्या तक्रारी आहेत.

मोबाइल प्रत्येकाकडे आला असून, अत्यावश्यक वस्तू बनली आहे. महत्त्वाच्या कागदपत्रांची कुंडली मोबाइलमध्ये जतन करून ठेवणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे महागडा मोबाइल वापरण्याची क्रेझ तयार झाली आहे. त्यामुळे मोबाइल चोरणाऱ्यांची टोळीही सक्रिय झाली असून, दररोज मोबाइल चोरीच्या अथवा गहाळ होण्याच्या घटना घडत आहेत. हिंगोली शहरातील गांधी चौक, जवाहर रोड, भाजी मंडई, बसस्थानक, रेल्वेस्थानक, मोंढा परिसरात मोबाइ गहाळ होण्याच्या घटना घडल्या आहेत. २०२० मध्ये शहरातील विविध भागातून ७१ नागरिकांनी आपले मोबाइल हरवले आहेत तर २०२१ मध्ये जूनपर्यंत ५७ जणांनी आपले मोबाइल गहाळ केले आहेत. गहाळ झालेले मोबाइल सहसा सापडतीलच याची शाश्वती नसते.

मोबाइल चोरी झाल्यास प्रथम हे करा...

मोबाइल चोरी झाल्यास प्रथम पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवा, मोबाइल सीमकार्ड ब्लॉक करण्यासाठी कंपनीच्या नंबरवर कळवा. चोरीला गेलेला मोबाइल पासवर्ड ऑनलाइनद्वारे बदला. पंधरा अंकी आयएमएआय नंबर माहिती असल्यास तो प्रथम पोलीस ठाण्यात कळवा. एफआयआर नोंदविल्यानंतर तुमच्या चोरीला गेलेल्या मोबाइलवरून काही चूक झाल्यास त्यासाठी तुम्हाला जबाबदार धरले जात नाही.

सहा महिन्यात २० मोबाइल शोधण्यात यश

चोरीला अथवा गहाळ झालेला मोबाइल सापडणे कठीणच आहे. सायबर सेलच्या मदतीने आयएमएआय नंबर ट्रेस झाल्यास मोबाइल सापडण्याची शक्यता असते. मात्र अनेक महिने मोबाइल ट्रेस होण्यास वेळ लागतो. तरीही हिंगोली शहर पोलिसांनी जून महिन्यात एका चोरट्यांकडून २० मोबाइल जप्त केले असून, त्यातील काही मोबाइल मूळमालकांना परतही केले आहेत.

मागील महिन्यातच एका मोबाइल चोरट्याचा शोध घेऊन त्याच्याकडून २० मोबाइल जप्त केले आहेत. यातील काही मोबाइल मूळमालकांना परतही केले. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी आपला मोबाइल जपून ठेवणे महत्त्वाचे आहे.

- पंडित कच्छवे, पोलीस निरीक्षक, हिंगोली शहर

या ठिकाणी सांभाळा मोबाइल

गांधी चौक बाजार

गांधी चौक बाजार भागात नागरिकांची खरेदीसाठी गर्दी होते. गर्दीचा फायदा घेऊन काही चोरटे मोबाइल चोरण्याचा प्रयत्न करतात. मागील वर्षी या भागातून दोन मोबाइल चोरीला गेले आहेत.

जवाहर रोड

शहरातील जवाहर रोड भागातून वाहनांची वर्दळ असते. या भागातून मागील वर्षी दोन मोबाइल चोरीला गेले असल्याची नोंद शहर पोलीस ठाण्यात आहे.

रेल्वे स्टेशन

हिंगोली येथील रेल्वे स्टेशन नियमित गजबजलेले राहत नसले तरी रेल्वे आल्यानंतर प्रवाशांची गर्दी होते. त्यामुळे मोबाइल गहाळ होण्याची शक्यता जास्त आहे.

बसस्थानक

येथील बसस्थानक भागातूनही प्रवाशांचे मोबाइल गहाळ झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांनी या ठिकाणी आपला मोबाइल जपून ठेवणे गरजेचे आहे.

मोबाइल गहाळ, चोरीला गेल्याच्या तक्रारी

वर्ष, महिना गहाळ चोरीला गेले

२०२० ७१ ०४

२०२१ जानेवारी ०६ ००

फेब्रुवारी ०८ ००

मार्च ०४ ००

एप्रिल ११ ००

मे १४ ०१

जून १४ ००

जुलै ०२ ००