शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
3
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
4
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
5
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
6
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
7
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
8
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
9
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
10
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
11
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
12
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
13
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
14
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
15
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
16
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
17
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
18
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
19
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
20
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!

भूजल पातळीत १.२७ मीटरने घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 23:34 IST

दिवसेंदिवस सूर्य आग ओकत असून जिल्ह्याची भूजल पातळी १.२७ मीटरने खालावली आहे. वाढत्या तापमानामुळे जिल्ह्यात भिषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : दिवसेंदिवस सूर्य आग ओकत असून जिल्ह्याची भूजल पातळी १.२७ मीटरने खालावली आहे. वाढत्या तापमानामुळे जिल्ह्यात भिषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. शहरासह ग्रामीण भागातील विहिरी व बोअर आटत चालल्या असून भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडून मे महिन्या शेवटच्या आठवड्यात भूजल पातळीचे मोजमाप केले जाणार आहे.दरवर्षी अत्यल्प पर्जन्यमान होत असून भूजलपातळी खालावत चालली आहे. भूजल सर्वेक्षण यंत्रणेमार्फत जिल्ह्यातील ५ तालुक्यांतील ५० निरीक्षण विहिरींतील पाणीपातळीच्या नोंदी घेतल्या जातात. भूजल सर्वेक्षण यंत्रणेकडून मार्चमध्ये घेण्यात आलेल्या नोंदीनुसार हिंगोली तालुक्यातील भूजलपातळी १.५० मीटर खोलीवर गेल्याचे दिसून आले. औंढा नागनाथ तालुक्यात १.४९ मीटर, वसमत तालुक्याची २.०७ मीटर, कळमनुरी ०.२५ मीटर, १.०३ मीटर असून जिल्ह्याची भूजल पातळी -१.२७ मीटरने खालावली आहे. यात औंढा-९.६४ मीटर, वसमत-१४.५0, हिंगोली ९.७७, कळमनुरी-९.0६, सेनगाव ९.९७ मीटर या खोलीवर पाणी आहे. भूजलपातळी खालावत असल्यामुळे विहिरी, बोअर कोरडे पडत चालले आहेत. त्यामुळे अनेक गावांत वाड्या-वस्त्या, तांड्यावर पाणीटंचाई निर्माण झाली आहे. भूजलपातळीतील घट जलसंकट निर्माण करणार हे निश्चित आहे. यावर उपाय-योजना केल्या जात आहेत. जि. प.च्या यांत्रिकी विभागातर्फे ग्रामीण भागात २४ एप्रिलपासून बोअर घेण्याचे काम सुरू आहे. परंतु अनेक बोअर कोरडे जात असून काही बोअरला पाणी लागत आहे, अशी माहिती मिळाली. भूजल सर्वेक्षण यंत्रणेमार्फत घेतलेल्या निरीक्षण विहिरीतील नोंदीवरून तालुकानिहाय भूजल पातळीतील घट जाहीर करण्यात आली आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ५० गावांतील निरीक्षण विहिरींची भूजल पातळी घेण्यात येणार असल्याचे यंत्रणेमार्फत सांगण्यात आले.जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागातर्फे २४ एप्रिलपासून ग्रामीण भागात नवीन बोअर घेण्याचे कामे सुरू आहेत. बोअरसाठी एकूण जवळपास १७७ प्रस्ताव प्रशासनाकडे प्राप्त झाले होते. त्यापैकी ९४ प्रस्तावांना मंजुरी मिळाली असून सध्या बोअरची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले.आतापर्यंत ४० बोअरची कामे पूर्ण झाली आहेत. लवकरच बोअरवर हातपंप बसविले जाणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागातर्फे देण्यात आली आहे. परंतु भूजलपातळीच घटल्याने अनेक ठिकाणचे बोअर कोरडे जात आहेत.जिल्ह्यात भूजल सर्वेक्षण यंत्रणेमार्फत ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचे स्रोत बळकट करण्यासाठी तसेच शासनाच्या विविध उपाय-योजना राबविण्यात येत आहेत.

टॅग्स :HingoliहिंगोलीWaterपाणी