शहरं
Join us  
Trending Stories
1
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
2
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
3
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
4
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
5
Navi Mumbai Rains: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
6
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
7
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
9
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
10
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
11
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
12
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
13
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
14
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
15
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
16
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
17
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
18
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
19
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

भूजल पातळीत १.२७ मीटरने घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 23:34 IST

दिवसेंदिवस सूर्य आग ओकत असून जिल्ह्याची भूजल पातळी १.२७ मीटरने खालावली आहे. वाढत्या तापमानामुळे जिल्ह्यात भिषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : दिवसेंदिवस सूर्य आग ओकत असून जिल्ह्याची भूजल पातळी १.२७ मीटरने खालावली आहे. वाढत्या तापमानामुळे जिल्ह्यात भिषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. शहरासह ग्रामीण भागातील विहिरी व बोअर आटत चालल्या असून भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडून मे महिन्या शेवटच्या आठवड्यात भूजल पातळीचे मोजमाप केले जाणार आहे.दरवर्षी अत्यल्प पर्जन्यमान होत असून भूजलपातळी खालावत चालली आहे. भूजल सर्वेक्षण यंत्रणेमार्फत जिल्ह्यातील ५ तालुक्यांतील ५० निरीक्षण विहिरींतील पाणीपातळीच्या नोंदी घेतल्या जातात. भूजल सर्वेक्षण यंत्रणेकडून मार्चमध्ये घेण्यात आलेल्या नोंदीनुसार हिंगोली तालुक्यातील भूजलपातळी १.५० मीटर खोलीवर गेल्याचे दिसून आले. औंढा नागनाथ तालुक्यात १.४९ मीटर, वसमत तालुक्याची २.०७ मीटर, कळमनुरी ०.२५ मीटर, १.०३ मीटर असून जिल्ह्याची भूजल पातळी -१.२७ मीटरने खालावली आहे. यात औंढा-९.६४ मीटर, वसमत-१४.५0, हिंगोली ९.७७, कळमनुरी-९.0६, सेनगाव ९.९७ मीटर या खोलीवर पाणी आहे. भूजलपातळी खालावत असल्यामुळे विहिरी, बोअर कोरडे पडत चालले आहेत. त्यामुळे अनेक गावांत वाड्या-वस्त्या, तांड्यावर पाणीटंचाई निर्माण झाली आहे. भूजलपातळीतील घट जलसंकट निर्माण करणार हे निश्चित आहे. यावर उपाय-योजना केल्या जात आहेत. जि. प.च्या यांत्रिकी विभागातर्फे ग्रामीण भागात २४ एप्रिलपासून बोअर घेण्याचे काम सुरू आहे. परंतु अनेक बोअर कोरडे जात असून काही बोअरला पाणी लागत आहे, अशी माहिती मिळाली. भूजल सर्वेक्षण यंत्रणेमार्फत घेतलेल्या निरीक्षण विहिरीतील नोंदीवरून तालुकानिहाय भूजल पातळीतील घट जाहीर करण्यात आली आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ५० गावांतील निरीक्षण विहिरींची भूजल पातळी घेण्यात येणार असल्याचे यंत्रणेमार्फत सांगण्यात आले.जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागातर्फे २४ एप्रिलपासून ग्रामीण भागात नवीन बोअर घेण्याचे कामे सुरू आहेत. बोअरसाठी एकूण जवळपास १७७ प्रस्ताव प्रशासनाकडे प्राप्त झाले होते. त्यापैकी ९४ प्रस्तावांना मंजुरी मिळाली असून सध्या बोअरची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले.आतापर्यंत ४० बोअरची कामे पूर्ण झाली आहेत. लवकरच बोअरवर हातपंप बसविले जाणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागातर्फे देण्यात आली आहे. परंतु भूजलपातळीच घटल्याने अनेक ठिकाणचे बोअर कोरडे जात आहेत.जिल्ह्यात भूजल सर्वेक्षण यंत्रणेमार्फत ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचे स्रोत बळकट करण्यासाठी तसेच शासनाच्या विविध उपाय-योजना राबविण्यात येत आहेत.

टॅग्स :HingoliहिंगोलीWaterपाणी