शहरं
Join us  
Trending Stories
1
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
2
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
3
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
4
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
5
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
6
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
7
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
8
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
9
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
10
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
11
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
12
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
13
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
14
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
15
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
16
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

१८.१८ कोटींचा टंचाई आराखडा मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 23:23 IST

जानेवारी २0१८ ते जून २0१८ या कालावधीसाठीचा पाणीटंचाई आराखडा नुकताच मंजूर करण्यात आला. यामध्ये १८.१८ कोटी रुपयांच्या २३१९ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. यंदा अल्पपर्जन्यामुळे टंचाईच्या झळा मोठ्या प्रमाणात सोसाव्या लागतील, असे चित्र आहे.

ठळक मुद्दे१७७ गावांत टॅँकरची शक्यता : ५४८ गावांसाठी १४९१ अधिग्रहणे प्रस्तावित

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जानेवारी २0१८ ते जून २0१८ या कालावधीसाठीचा पाणीटंचाई आराखडा नुकताच मंजूर करण्यात आला. यामध्ये १८.१८ कोटी रुपयांच्या २३१९ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. यंदा अल्पपर्जन्यामुळे टंचाईच्या झळा मोठ्या प्रमाणात सोसाव्या लागतील, असे चित्र आहे.हिंगोली जिल्ह्यात दरवर्षीच आरंभशूर अधिकारी मंडळी पाणीटंचाई आराखडा तयार करण्याची लगबग डिसेंबरच्याही अगोदरच दाखवायची. मात्र हा आराखडा मंजूर होण्यास जानेवारीच उजाडायचा. यंदा हा आराखडा वेळेत मंजूर तर झाला आहे. मात्र अंमलबजावणीही त्याच गतीने होणे अपेक्षित आहे. यंदा अल्पपर्जन्यामुळे टंचाईच्या झळा लवकर बसण्याची भीती आहे. शेवटच्या टप्प्यात झालेल्या पर्जन्यामुळे टंचाईचा काळ लांबला, हेही तेवढेच खरे.जानेवारी ते मार्च या कालावधीत १३.0९ कोटींच्या १३८५ उपाययोजना प्रस्तावित केल्या आहेत. यात २८ गावे-वाडी तांड्यांना २८ तात्पुरत्या पूरक नळयोजनेचा प्रस्ताव आहे. तर १११ गावांतील नळयोजनेच्या दुरुस्तीचा ५.१३ कोटींचा प्रस्ताव आहे. तर ७५ हजारांची तीन विंधन विहिरींची दुरुस्ती प्रस्तावित केली आहे. ३४८ गावांत २.८१ कोटींच्या ५0३ नवीन विंधन विहिरींचा प्रस्तावही आराखड्यात आहे. ४३२ गावांसाठी ६७५ विहीर-बोअर अधिग्रहणासाठी २.४३ कोटी प्रस्तावित केले आहेत. तर विहिरींतील गाळ काढणे, खोलीकरण या कामांसाठी ६ गावांना १२ लाख प्रस्तावित केले आहेत. तर ५४ गावांसाठी ५९ टँकरला १.0८ कोटी प्रस्तावित केले आहेत.