शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
4
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
5
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
6
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
7
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
8
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
9
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
10
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
11
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
12
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
13
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
14
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
15
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
16
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
17
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
18
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
19
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
20
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा

पदवीधराने सरकारी नोकरी सोडून हायटेक फुलशेतीचा ठेवला आदर्श

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 12:11 IST

यशकथा : कृषी पदवीधर तरुणाने कृषी सहायकाची नोकरी सोडून हायटेक फुलशेतीचा आदर्श शेतकऱ्यांसमोर ठेवला आहे.

- शेख इलियास (कळमनुरी, हिंगोली)

कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथील कृषी पदवीधर तरुणाने कृषी सहायकाची नोकरी सोडून हायटेक फुलशेतीचा आदर्श शेतकऱ्यांसमोर ठेवला आहे. नागेश खांडरे यांनी कृषी सहायकाची सहा महिने नोकरी केली; परंतु तेथे त्यांचे मन रमले नाही. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून हायटेक शेती करण्याचा विचार त्यांनी केला. २०१५ मध्ये खांडरे यांनी १० गुंठ्यांत जरबेरा फुलाची शेती केली. एकदा लावलेले जरबेराच्या रोपांपासून चार वर्षे फुले मिळतात. १० गुंठ्यांत त्यांनी खर्च वजा जाता १६ लाखांचे उत्पन्न मिळवले आहे.

जरबेरा फूल उत्पादक शेतकरी कमी असल्याने बाजारात स्पर्धा कमी असते. त्यामुळे साधारणत: ३ ते ७ रुपये प्रतिनग दर त्यांना मिळाला. पुणे येथील कंपनीकडून ३५ रुपये प्रतिझाड जेरबेराची रोपे आणली. अडीच फूट रुंदीच्या बेडवर ही रोपे लावली. वर्षभर या रोपट्यांना फुले येतात. महिन्याकाठी १४ ते १५ हजार फुले येतात. प्रतिफुलाला ३ रुपयांप्रमाणे किंमत असते. सण, उत्सव, लग्न समारंभाच्या दिवशी ही फुले प्रतिनग १२ ते १५ रुपयांपर्यंत विकली जातात. जरबेरा या फुलांना बाराही महिने मागणी असते. उन्हापासून या फुलांचे संरक्षण व्हावे यासाठी खांडरे यांनी पॉलीहाऊस उभारले आहे.

मागील चार वर्षांपासून ते फुलशेतीचा व्यवसाय करतात. राष्ट्रीय फलोत्पादन विकास अभियानांतर्गत त्यांना पॉलीहाऊस टाकण्यासाठी अनुदानही मिळाले होते. शेती तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण व्हावी, यासाठी खांडरे यांनी कृषी व्यवसाय व्यवस्थापन हा दोन वर्षांचा अभ्यासक्रम हैदराबाद येथून पूर्ण केला. पूर्ण जिल्ह्याचा अभ्यासदौरा करून फुलशेती पॉलीहाऊस शेडनेट आदीबाबतची परिपूर्ण माहिती घेतली. मागील काही वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. सिंचनासाठी पाणी कमी पडत आहे. हे बघून त्यांनी त्यांच्या शेताजवळील एक कि.मी. नाल्याचे स्वखर्चातून खोलीकरण केले. त्यावर वनराई बंधारे बांधले. त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरून पाणीपातळीत वाढ झाली आहे. खांडरे यांच्या शेतात आधुनिक  यंत्रसाम्रगी आहे.

सुधारित हळद लागवड, ढोबळी मिरची, टोमॅटो आदींची लागवडही ते करतात. याकामी त्यांना तालुका कृषी अधिकारी गोविंद कल्याणपाड यांचे सहकार्य लाभते. फुलशेतीसाठी त्यांनी उच्च तंत्रज्ञानाचा वापर केला. जरबेराची फुले त्यांनी नांदेड, नागपूर, हैदराबाद आदी बाजारपेठांत विक्री केली. खांडरे हे फुलशेतीसोबतच ढोबळी मिरची, केळी, हळद यासह भाजीपाला पिके घेतात. खर्च वजा जाता त्यांना १२ एकर शेतीतून ८ ते ९ लाख रुपये निव्वळ नफा मिळत असल्याचे खांडरे यांनी सांगितले. शेतात पाण्याची सोय असल्याने ठिंबक सिंचनाचा वापर ते करतात. शेतकऱ्यांना  सर्वच १२ एकर शेतीला पाणी वर्षभर पुरावे यासाठी त्यांचे काटेकोर नियोजन असते. बारमाही पिके घेत असल्याने त्यांच्याकडे सतत पैसा खेळत असतो. वनराई बंधारे, नालाखोलीकरण, पुनर्भरण आदी कामे त्यांनी केली आहेत.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी